शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
4
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
5
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
6
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
7
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
8
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
9
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
10
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
11
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
12
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
13
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
14
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
15
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
16
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
17
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
18
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
19
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
20
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली

आता मंत्रीपद देण्यासंदर्भातील निर्णय घेण्यातही काँग्रेसची वाटचाल संथ !

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2019 12:14 IST

मंत्रीमंडळात कुणाला स्थान द्यायचे हे शिवसेनेचे स्पष्ट झालं आहे. तर राष्ट्रवादीची यादी अंतिम टप्प्यात आहे. मात्र काँग्रेसकडून अद्याप मंत्रीपदासंदर्भातील निर्णय अंतिम झाला नाही.

मुंबई - राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आले आहे. निवडणुकीचा निकाल लागून एक महिना उलटून गेल्यानंतर तसेच अनेक संकटे बाजुला सारत महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यात यशस्वी झाली. अजित पवार यांनी अचानक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत जावून सरकार स्थापन्याची हालचाल केल्याने महाविकास आघाडी फिस्कटल्याचे चित्र होते. त्यावेळी आघाडी फिस्कटण्यास काँग्रेसचा संथ कारभारच जबाबदार असल्याचे बोलले जात होते. आता मंत्रीपदांचे वाटप करण्यातही काँग्रेसकडून तसाच विलंब होत असल्याची चर्चा मित्रपक्षांमध्ये सुरू आहे. 

शिवसेना आणि काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस एकमेकांविरुद्ध लढले होते. तर शिवसेना आणि भाजप एकत्र निवडणुकीला सामोरे गेले होते. त्यामुळे शिवसेना-भाजपने सरकार स्थापने आपेक्षीत होते. मात्र शिवसेनेच्या मुख्यमंत्रीपदाच्या मागणीमुळे युती तुटली. त्यानंतर शिवसेनेने नवीन मित्र शोधण्यास सुरुवात केली होती. त्यानुसार सेनेला आधी राष्ट्रवादीची साथ मिळाली. मात्र बहुमतासाठी काँग्रेसचा पाठिंबा आवश्यक होता. त्यासाठी पाठपुरावा करण्यात आला. मात्र काँग्रेसकडून वेळेत प्रतिसाद मिळत नसल्याचा दावा अनेक नेत्यांनी केला होता. 

दरम्यान अनेक संकटानंतर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले आहे. नव्या सरकारमध्ये शिवसेनेला 15, राष्ट्रवादी काँग्रेसला 16 आणि काँग्रेसला 13 मंत्रीपदं देण्याचं ठरल आहे. पहिल्या टप्प्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह तीनही पक्षांच्या प्रत्येकी दोन नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. तर उर्वरित मंत्रीमंडळाचा विस्तार अद्याप होऊ शकला नाही. 

मंत्रीमंडळात कुणाला स्थान द्यायचे हे शिवसेनेचे स्पष्ट झालं आहे. तर राष्ट्रवादीची यादी अंतिम टप्प्यात आहे. मात्र काँग्रेसकडून अद्याप मंत्रीपदासंदर्भातील निर्णय अंतिम झाला नाही. त्यातच अधिवेशन जवळ आले असून पहिल्या अधिवेशनाला सरकार सहा मंत्र्यांवरच सामोरे जाणार अशी स्थिती निर्माण झाली आहे.