शहरं
Join us  
Trending Stories
1
India Lifts First ODI World Cup Trophy: हरमनप्रीतसह संघातील खेळाडूंनी खास अंदाजात उंचावली ट्रॉफी (VIDEO)
2
लेख: एकीकडे शांततेच्या गप्पा, दुसरीकडे अणुबॉम्ब परीक्षण! डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा चेहरा उघड
3
जोधपूरमध्ये भीषण अपघात, टेम्पो ट्रॅव्हलर उभ्या असलेल्या ट्रकला धडकला, १५ जणांचा मृत्यू
4
भारताच्या लेकींनी 'जग जिंकलं'! द. आफ्रिकेला हरवून टीम इंडिया अजिंक्य; स्वप्ननगरीत अधुरं स्वप्न साकार!
5
धक्कादायक! बंगालमध्ये सातवीत शिकणाऱ्या मुलीवर सामुहिक अत्याचार; तिघांना अटक
6
IND vs SA Final :अमनजोत कौरनं घेतलेल्या लॉराच्या कॅचवर फिरली मॅच; व्हिडिओ बघाच
7
निवडणुकांमुळे हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलले जाणार ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
8
Womens World Cup Final:'वाइल्ड कार्ड' एन्ट्रीसह आली अन् बॅटिंगनंतर बॉलिंगमध्येही 'ट्रम्प कार्ड' ठरली (VIDEO)
9
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
10
IND vs SA Womens World Cup 2025 Final : ...अन् अमनजोतच्या 'रॉकेट थ्रो'सह मिळाला मोठा दिलासा (VIDEO)
11
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
12
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
13
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
14
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
15
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
16
Fact Check: आधार कार्ड दाखवून फुकटात मिळतेय बाईक? मोदींचा व्हिडीओ व्हायरल! सत्य समोर!
17
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
18
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
19
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
20
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले

आता मंत्रीपद देण्यासंदर्भातील निर्णय घेण्यातही काँग्रेसची वाटचाल संथ !

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2019 12:14 IST

मंत्रीमंडळात कुणाला स्थान द्यायचे हे शिवसेनेचे स्पष्ट झालं आहे. तर राष्ट्रवादीची यादी अंतिम टप्प्यात आहे. मात्र काँग्रेसकडून अद्याप मंत्रीपदासंदर्भातील निर्णय अंतिम झाला नाही.

मुंबई - राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आले आहे. निवडणुकीचा निकाल लागून एक महिना उलटून गेल्यानंतर तसेच अनेक संकटे बाजुला सारत महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यात यशस्वी झाली. अजित पवार यांनी अचानक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत जावून सरकार स्थापन्याची हालचाल केल्याने महाविकास आघाडी फिस्कटल्याचे चित्र होते. त्यावेळी आघाडी फिस्कटण्यास काँग्रेसचा संथ कारभारच जबाबदार असल्याचे बोलले जात होते. आता मंत्रीपदांचे वाटप करण्यातही काँग्रेसकडून तसाच विलंब होत असल्याची चर्चा मित्रपक्षांमध्ये सुरू आहे. 

शिवसेना आणि काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस एकमेकांविरुद्ध लढले होते. तर शिवसेना आणि भाजप एकत्र निवडणुकीला सामोरे गेले होते. त्यामुळे शिवसेना-भाजपने सरकार स्थापने आपेक्षीत होते. मात्र शिवसेनेच्या मुख्यमंत्रीपदाच्या मागणीमुळे युती तुटली. त्यानंतर शिवसेनेने नवीन मित्र शोधण्यास सुरुवात केली होती. त्यानुसार सेनेला आधी राष्ट्रवादीची साथ मिळाली. मात्र बहुमतासाठी काँग्रेसचा पाठिंबा आवश्यक होता. त्यासाठी पाठपुरावा करण्यात आला. मात्र काँग्रेसकडून वेळेत प्रतिसाद मिळत नसल्याचा दावा अनेक नेत्यांनी केला होता. 

दरम्यान अनेक संकटानंतर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले आहे. नव्या सरकारमध्ये शिवसेनेला 15, राष्ट्रवादी काँग्रेसला 16 आणि काँग्रेसला 13 मंत्रीपदं देण्याचं ठरल आहे. पहिल्या टप्प्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह तीनही पक्षांच्या प्रत्येकी दोन नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. तर उर्वरित मंत्रीमंडळाचा विस्तार अद्याप होऊ शकला नाही. 

मंत्रीमंडळात कुणाला स्थान द्यायचे हे शिवसेनेचे स्पष्ट झालं आहे. तर राष्ट्रवादीची यादी अंतिम टप्प्यात आहे. मात्र काँग्रेसकडून अद्याप मंत्रीपदासंदर्भातील निर्णय अंतिम झाला नाही. त्यातच अधिवेशन जवळ आले असून पहिल्या अधिवेशनाला सरकार सहा मंत्र्यांवरच सामोरे जाणार अशी स्थिती निर्माण झाली आहे.