शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
2
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
3
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
4
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
5
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
6
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
7
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
8
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
9
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
10
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
11
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
12
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
13
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
14
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
15
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
16
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
17
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू
18
अहमदाबाद प्लेन क्रॅशसंदर्भात बाबा रामदेव यांना वेगळाच संशय, स्पष्टच बोलले! केली मोठी मागणी
19
Maharashtra Rain Alert: कोकणाला रेड अलर्ट! मुंबई-ठाण्यासह 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा
20
Tarot Card: कष्ट करावे लागतील, तडकाफडकी कोणतेही निर्णय घेऊ नका; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!

आता मध्य रेल्वे होणार हागणदारीमुक्त; मध्य रेल्वेच्या साडेपाच हजार बोगीत ‘बायोटॉयलेट’

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2017 10:20 IST

रेल्वे रूळावर पडणाऱ्या मानवनिर्मित कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी सर्व लांब पल्ल्याच्या ट्रेनमध्ये बायोटोयलेट कार्यान्वित करणार आहे.

ठळक मुद्दे केंद्र सरकारने जुलै महिन्यात दिलेल्या प्रमाणपत्रानुसार मुंबई शहर हागणदारीमुक्त आहे. याच धर्तीवर मध्य रेल्वेदेखील हागणदारीमुक्त होण्यासाठी 'फास्ट' पावले उचलत आहे. रेल्वे रूळावर पडणाऱ्या मानवनिर्मित कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी सर्व लांब पल्ल्याच्या ट्रेनमध्ये बायोटोयलेट कार्यान्वित करणार आहे.

- महेश चेमटे मुंबई, दि.11 : केंद्र सरकारने जुलै महिन्यात दिलेल्या प्रमाणपत्रानुसार मुंबई शहर हागणदारीमुक्त आहे. याच धर्तीवर मध्य रेल्वेदेखील हागणदारीमुक्त होण्यासाठी 'फास्ट' पावले उचलत आहे. रेल्वे रूळावर पडणाऱ्या मानवनिर्मित कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी सर्व लांब पल्ल्याच्या ट्रेनमध्ये बायोटोयलेट कार्यान्वित करणार आहे. मध्य रेल्वेच्या ५५३२ बोगीत बायोटॉयलेट कार्यान्वित करण्यात आले आहे. मध्य रेल्वेत एकूण १४ हजार ५६५ बायोटॉयलेट बसविण्यात येणार आहे. त्यापैकी यंदा (२०१७-१८) वर्षासाठी २४०० बायोटॉयलेट बसविण्याचे लक्ष दिले आहे. त्यापैकी जुलैपर्यंत ४२५ बायोटॉयलेट बसविण्यात आले आहेत.

स्वच्छ रेल्वे-स्वच्छ भारत उपक्रमांतर्गत देशातील सर्व रेल्वे विभागातील लांब पल्ल्यांच्या ट्रेनमध्ये एकूण १ लाख ४० हजार बायोटॉयलेट बसविण्यात येणार आहे. हे लक्ष पूर्ण करण्यासाठी २०१९ पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. रेल्वे बजेटमध्ये बायोटॉयलेटसाठी विशेष तरतूद करण्यात आली आहे. त्यानुसार मध्य रेल्वेच्या ताफ्यात एकूण १४ हजार ५६५ बायोटॉयलेट कार्यान्वित होणार आहे. यापैकी जुलै २०१७ पर्यंत ५५३२ बायोटॉयलेट कार्यान्वित झाल्याची माहिती रेल्वे सुत्रांनी दिली.

बायोटॉयलेट विकसित करण्यासाठी रेल्वे आणि डिफेन्स रिसर्च अ‍ॅन्ड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (डीआरडीओ) यांच्यात करार करण्यात आला आहे. यानुसार २०१९ पर्यंत लांब पल्ल्यांच्या गाड्यांमधून पारंपरिक शौचगृह हद्दपार करण्यात येणार आहे. त्याजागी बायोटॉयलेट बसविण्यात येणार आहे. स्टेनलेस स्टिल बनावटीच्या ६ चेंबर्ससहीत बायोटॉयलेटचे संचाचे मूल्य ९० हजार इतके आहे.लांब पल्ल्यांच्या प्रवाशांकडून प्रवासादरम्यान पारंपरिक शौचालयाच्या अनेक तक्रारी मिळत होत्या. बायोटॉयलेटमुळे प्रवाशांच्या तक्रारींचे निवारण होणार असल्याचा दावा रेल्वेकडून करण्यात येत आहे. बायोटॉयलेटमुळे पाण्याचा देखील योग्य वापर होतो. परिणामी पाण्याचे संवर्धन देखील करता येणे शक्य असल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले.  

टॅग्स :central railwayमध्ये रेल्वेIndian Railwayभारतीय रेल्वे