शहरं
Join us  
Trending Stories
1
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
2
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
5
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
6
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
7
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
8
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
9
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
10
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
11
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
12
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
13
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
14
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
15
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
16
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
17
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
18
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
19
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
20
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश

आता मध्य रेल्वे होणार हागणदारीमुक्त; मध्य रेल्वेच्या साडेपाच हजार बोगीत ‘बायोटॉयलेट’

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2017 10:20 IST

रेल्वे रूळावर पडणाऱ्या मानवनिर्मित कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी सर्व लांब पल्ल्याच्या ट्रेनमध्ये बायोटोयलेट कार्यान्वित करणार आहे.

ठळक मुद्दे केंद्र सरकारने जुलै महिन्यात दिलेल्या प्रमाणपत्रानुसार मुंबई शहर हागणदारीमुक्त आहे. याच धर्तीवर मध्य रेल्वेदेखील हागणदारीमुक्त होण्यासाठी 'फास्ट' पावले उचलत आहे. रेल्वे रूळावर पडणाऱ्या मानवनिर्मित कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी सर्व लांब पल्ल्याच्या ट्रेनमध्ये बायोटोयलेट कार्यान्वित करणार आहे.

- महेश चेमटे मुंबई, दि.11 : केंद्र सरकारने जुलै महिन्यात दिलेल्या प्रमाणपत्रानुसार मुंबई शहर हागणदारीमुक्त आहे. याच धर्तीवर मध्य रेल्वेदेखील हागणदारीमुक्त होण्यासाठी 'फास्ट' पावले उचलत आहे. रेल्वे रूळावर पडणाऱ्या मानवनिर्मित कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी सर्व लांब पल्ल्याच्या ट्रेनमध्ये बायोटोयलेट कार्यान्वित करणार आहे. मध्य रेल्वेच्या ५५३२ बोगीत बायोटॉयलेट कार्यान्वित करण्यात आले आहे. मध्य रेल्वेत एकूण १४ हजार ५६५ बायोटॉयलेट बसविण्यात येणार आहे. त्यापैकी यंदा (२०१७-१८) वर्षासाठी २४०० बायोटॉयलेट बसविण्याचे लक्ष दिले आहे. त्यापैकी जुलैपर्यंत ४२५ बायोटॉयलेट बसविण्यात आले आहेत.

स्वच्छ रेल्वे-स्वच्छ भारत उपक्रमांतर्गत देशातील सर्व रेल्वे विभागातील लांब पल्ल्यांच्या ट्रेनमध्ये एकूण १ लाख ४० हजार बायोटॉयलेट बसविण्यात येणार आहे. हे लक्ष पूर्ण करण्यासाठी २०१९ पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. रेल्वे बजेटमध्ये बायोटॉयलेटसाठी विशेष तरतूद करण्यात आली आहे. त्यानुसार मध्य रेल्वेच्या ताफ्यात एकूण १४ हजार ५६५ बायोटॉयलेट कार्यान्वित होणार आहे. यापैकी जुलै २०१७ पर्यंत ५५३२ बायोटॉयलेट कार्यान्वित झाल्याची माहिती रेल्वे सुत्रांनी दिली.

बायोटॉयलेट विकसित करण्यासाठी रेल्वे आणि डिफेन्स रिसर्च अ‍ॅन्ड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (डीआरडीओ) यांच्यात करार करण्यात आला आहे. यानुसार २०१९ पर्यंत लांब पल्ल्यांच्या गाड्यांमधून पारंपरिक शौचगृह हद्दपार करण्यात येणार आहे. त्याजागी बायोटॉयलेट बसविण्यात येणार आहे. स्टेनलेस स्टिल बनावटीच्या ६ चेंबर्ससहीत बायोटॉयलेटचे संचाचे मूल्य ९० हजार इतके आहे.लांब पल्ल्यांच्या प्रवाशांकडून प्रवासादरम्यान पारंपरिक शौचालयाच्या अनेक तक्रारी मिळत होत्या. बायोटॉयलेटमुळे प्रवाशांच्या तक्रारींचे निवारण होणार असल्याचा दावा रेल्वेकडून करण्यात येत आहे. बायोटॉयलेटमुळे पाण्याचा देखील योग्य वापर होतो. परिणामी पाण्याचे संवर्धन देखील करता येणे शक्य असल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले.  

टॅग्स :central railwayमध्ये रेल्वेIndian Railwayभारतीय रेल्वे