शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
3
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
4
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
5
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
6
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
7
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
8
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
9
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
10
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
11
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
12
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
13
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
14
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
15
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
16
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
17
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
18
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
19
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
20
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."

आता मध्य रेल्वे होणार हागणदारीमुक्त; मध्य रेल्वेच्या साडेपाच हजार बोगीत ‘बायोटॉयलेट’

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2017 10:20 IST

रेल्वे रूळावर पडणाऱ्या मानवनिर्मित कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी सर्व लांब पल्ल्याच्या ट्रेनमध्ये बायोटोयलेट कार्यान्वित करणार आहे.

ठळक मुद्दे केंद्र सरकारने जुलै महिन्यात दिलेल्या प्रमाणपत्रानुसार मुंबई शहर हागणदारीमुक्त आहे. याच धर्तीवर मध्य रेल्वेदेखील हागणदारीमुक्त होण्यासाठी 'फास्ट' पावले उचलत आहे. रेल्वे रूळावर पडणाऱ्या मानवनिर्मित कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी सर्व लांब पल्ल्याच्या ट्रेनमध्ये बायोटोयलेट कार्यान्वित करणार आहे.

- महेश चेमटे मुंबई, दि.11 : केंद्र सरकारने जुलै महिन्यात दिलेल्या प्रमाणपत्रानुसार मुंबई शहर हागणदारीमुक्त आहे. याच धर्तीवर मध्य रेल्वेदेखील हागणदारीमुक्त होण्यासाठी 'फास्ट' पावले उचलत आहे. रेल्वे रूळावर पडणाऱ्या मानवनिर्मित कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी सर्व लांब पल्ल्याच्या ट्रेनमध्ये बायोटोयलेट कार्यान्वित करणार आहे. मध्य रेल्वेच्या ५५३२ बोगीत बायोटॉयलेट कार्यान्वित करण्यात आले आहे. मध्य रेल्वेत एकूण १४ हजार ५६५ बायोटॉयलेट बसविण्यात येणार आहे. त्यापैकी यंदा (२०१७-१८) वर्षासाठी २४०० बायोटॉयलेट बसविण्याचे लक्ष दिले आहे. त्यापैकी जुलैपर्यंत ४२५ बायोटॉयलेट बसविण्यात आले आहेत.

स्वच्छ रेल्वे-स्वच्छ भारत उपक्रमांतर्गत देशातील सर्व रेल्वे विभागातील लांब पल्ल्यांच्या ट्रेनमध्ये एकूण १ लाख ४० हजार बायोटॉयलेट बसविण्यात येणार आहे. हे लक्ष पूर्ण करण्यासाठी २०१९ पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. रेल्वे बजेटमध्ये बायोटॉयलेटसाठी विशेष तरतूद करण्यात आली आहे. त्यानुसार मध्य रेल्वेच्या ताफ्यात एकूण १४ हजार ५६५ बायोटॉयलेट कार्यान्वित होणार आहे. यापैकी जुलै २०१७ पर्यंत ५५३२ बायोटॉयलेट कार्यान्वित झाल्याची माहिती रेल्वे सुत्रांनी दिली.

बायोटॉयलेट विकसित करण्यासाठी रेल्वे आणि डिफेन्स रिसर्च अ‍ॅन्ड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (डीआरडीओ) यांच्यात करार करण्यात आला आहे. यानुसार २०१९ पर्यंत लांब पल्ल्यांच्या गाड्यांमधून पारंपरिक शौचगृह हद्दपार करण्यात येणार आहे. त्याजागी बायोटॉयलेट बसविण्यात येणार आहे. स्टेनलेस स्टिल बनावटीच्या ६ चेंबर्ससहीत बायोटॉयलेटचे संचाचे मूल्य ९० हजार इतके आहे.लांब पल्ल्यांच्या प्रवाशांकडून प्रवासादरम्यान पारंपरिक शौचालयाच्या अनेक तक्रारी मिळत होत्या. बायोटॉयलेटमुळे प्रवाशांच्या तक्रारींचे निवारण होणार असल्याचा दावा रेल्वेकडून करण्यात येत आहे. बायोटॉयलेटमुळे पाण्याचा देखील योग्य वापर होतो. परिणामी पाण्याचे संवर्धन देखील करता येणे शक्य असल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले.  

टॅग्स :central railwayमध्ये रेल्वेIndian Railwayभारतीय रेल्वे