शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

"भाजपाला आता आमची गरज वाटत नाही"; मित्रपक्षाचा एकला चलो नारा, महायुतीला धक्का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2023 16:44 IST

राज्यात सध्या शिवसेना-राष्ट्रवादीत दोन गट पडलेत. त्याचा फायदा आपल्या पक्षाने घेतला तर उद्या महाराष्ट्रात येणारे चित्र बदलेल असं मत महादेव जानकर यांनी व्यक्त केले.

मुंबई – शिवसेना-भाजपा-रासप-आरपीआय अशा विविध पक्षांनी एकत्र येत राज्यात महायुतीची घोषणा केली होती. त्यातील आता आगामी निवडणुकीत महायुतीला पहिला धक्का बसला आहे. महायुतीतील घटक पक्ष असलेल्या महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाने एकला चलो रे ची भूमिका घेत निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे. ना इंडिया, ना एनडीए आपण स्वबळावर लढू असं माजी मंत्री महादेव जानकर यांनी म्हटलं आहे.

महादेव जानकर म्हणाले की, राज्यात आणि देशात आपला पक्ष वाढला पाहिजे, यासाठी गेल्या दीड महिन्यापासून राष्ट्रीय समाज पक्षाकडून जनस्वराज्य यात्रा काढली आहे. विठुरायाच्या दर्शनापासून आम्ही लोकांना जागे करण्यासाठी ही यात्रा काढत आहोत. अलीकडेच एनडीएची बैठक झाली त्यात आम्हाला निमंत्रण देण्यात आले नव्हते. सुरुवात त्यांची आहे. आम्हाला एनडीए असो वा इंडिया कुणी बैठकीला निमंत्रण केले नाही. त्यामुळे आपण स्वत: पुढे चालले पाहिजे.  भीक मागून हक्क मिळत नाही. सत्ता घ्यायची असेल तर स्वत:च्या हिमतीवर घेतली पाहिजे असं त्यांनी म्हटलं.

त्याचसोबत मोठा मासा छोट्या मासाला खातो, तसे मोठा पक्ष छोट्या पक्षांना खातो, त्यामुळे छोट्या पक्षानेही मला मोठे व्हायचे आहे हे ठरवले पाहिजे. आता रासपाने मोठं व्हायचं ठरवले आहे. या देशात भाजपा, काँग्रेस मोठे पक्ष आहेत. त्यांच्याबद्दल टीकाटिप्पणी करणे आवश्यक नाही. राज्यात सध्या शिवसेना-राष्ट्रवादीत दोन गट पडलेत. त्याचा फायदा आपल्या पक्षाने घेतला तर उद्या महाराष्ट्रात येणारे चित्र बदलेल. ही आमच्यासाठी संधी म्हणून पाहतोय. पक्ष वाढल्याशिवाय ही मंडळी आम्हाला विचारणार नाही. भाजपाला माझी, राजू शेट्टी, विनायक मेटे, रामदास आठवले यांची गरज होती. आता ती गरज वाटत नाही. त्यामुळे आपली ताकद वाढवली पाहिजे अशी भूमिका माजी मंत्री महादेव जानकर यांनी मांडली आहे.

टॅग्स :BJPभाजपाMahadev Jankarमहादेव जानकर