शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

दहावीच्या प्रमाणपत्रावर आता जन्मस्थळही, मार्च २०१७ मध्ये झालेल्या परीक्षेपासून होणार निर्णयाची अंमलबजावणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2017 20:53 IST

इयत्ता दहावी परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत दिल्या जाणा-या प्रमाणपत्रावर आता जन्मस्थळाचीही नोंद होणार आहे. मार्च २०१७ मध्ये झालेल्या परीक्षेपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे.

पुणे : इयत्ता दहावी परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत दिल्या जाणा-या प्रमाणपत्रावर आता जन्मस्थळाचीही नोंद होणार आहे. मार्च २०१७ मध्ये झालेल्या परीक्षेपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. त्यामुळे प्रमाणपत्रावर आता जन्मतारीखेसोबत जन्मस्थळही झळकणार आहे. परिणामी, यापुढील काळात अधिवास (डोमिसाईल) प्रमाणपत्राला हे दहावीचे प्रमाणपत्र पर्याय ठरू शकते.विविध कामांसाठी जन्मतारखेचा दाखला द्यावा लागतो. मात्र, अनेकांना हा दाखला न मिळाल्यास इयत्ता दहावीचे राज्य मंडळाने दिलेले प्रमाणपत्र त्यासाठी ग्राह्य धरले जाते. या प्रमाणपत्रावर नमूद केलेली जन्मतारीख सर्वच ठिकाणी पुरावा म्हणून मान्यता दिली जाते. शाळेकडे नोंद असलेली ही तारीख प्रमाणपत्रावर येते. त्यामुळे स्वतंत्र जन्मदाखला काढावा लागत नाही. त्याअनुषंगाने आता राज्य मंडळाने प्रमाणपत्रावर जन्मतारखेप्रमाणेच जन्मस्थळ नमूद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार यापुढे विद्यार्थ्यांना जन्मस्थळाचीही नोंद असलेले प्रमाणपत्र दिले जाणार आहे. याबाबतची कार्यवाही मंडळाकडून सुरू करण्यात आली आहे.प्रमाणपत्रावर जन्मस्थळाची नोंद झाल्यास विद्यार्थ्यांना अधिवासाचा पुरावा म्हणूनही त्याचा वापर करता येऊ शकतो. शाळेमध्ये प्रवेश घेताना विद्यार्थ्यांच्या जन्मतारखेबरोबरच स्थळाचीही नोंद केली जाते. त्यानुसार शाळा सोडल्याचा दाखला व इतर कामांसाठी ही माहिती ग्राह्य धरली जाते. एकाच प्रमाणपत्रावर जन्मतारीख व जन्मस्थळाचीही नोंद होणार असल्याने विद्यार्थ्यांना पुढील काळात अधिवास दाखला स्वतंत्रपणे काढण्याची गरज भासणार नाही, अशी शक्यता आहे. अधिवास दाखला काढताना जन्मतारीख, जन्मठिकाणाची नोंद असलेले पुरावे सादर करावे लागतात. आता या दोन्ही नोंदी दहावीच्या प्रमाणपत्रावर असल्याने अधिवास प्रमाणपत्र म्हणूनही हे ग्राह्य धरले जावू शकते, अशी चर्चा आहे.दरम्यान, याविषयी माहिती देताना मंडळाच्या अध्यक्षा डॉ. शकुंतला काळे म्हणाल्या, दहावीच्या प्रमाणपत्रावर जन्मस्थळाचीही नोंद केली जाणार आहे. प्रमाणपत्रांवर नमूद जन्मतारीख शाळेत नोंद असलेली असते. तसेच शाळेकडे जन्मस्थळाचीही नोंद असते. तेच ठिकाण प्रमाणपत्रावर नमूद केले जाणार आहे. मार्च २०१७ परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देताना हा बदल केला जाणार आहे. नवीन प्रमाणपत्रावर जन्मतारखेबरोबच जन्मस्थळही नमूद केले जाणार आहे.------------परीक्षा अर्जावर भिन्नलिंगी पर्यायइयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षा अर्जांवर आतापर्यंत लिंग या रकान्यात केवळ स्त्री व पुरुष असे पर्याय दिले जात होते. मात्र, आता राज्य मंडळाने त्यामध्ये भिन्नलिंगी (ट्रान्सजेंडर) हा पर्यायही दिला आहे. मार्च २०१८ मध्ये होणा-या परीक्षांसाठी भरण्यात येणा-या अर्जांवर पहिल्यांदाच असा उल्लेख करण्यात आला आहे.

टॅग्स :Studentविद्यार्थी