शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
2
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
3
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
4
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
5
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
6
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
7
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
8
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
9
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
10
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
11
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
12
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
13
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
14
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
15
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...
16
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
17
Mumbai: 'मुंबई वन' अ‍ॅप वापरता? 'असं' काढा तिकीट, महिन्यात सहा वेळा वाचेल २० टक्के रक्कम!
18
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
19
"...तर भाजपा नेत्यांना झाडाला बांधून ठेवा"; TMC आमदाराच्या विधानाने राजकारण तापलं
20
साप तरुणाला चावला, रागाच्याभरात तरुणानेही सापाचा चावा घेतला! प्रकरण ऐकून डॉक्टरही हैराण

“ठाकरे सरकारकडून 'अर्थसंकल्पीय अधिवेशना'तून जनतेला काहीच मिळालं नाही”

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2020 11:06 IST

जनतेच्या घोर निराशेने अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सांगता झाली, असल्याचा टोला चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे सरकाराला लगावला.

मुंबई : राज्यात नव्यानेच स्थापन झालेल्या महाविकास आघाडी सरकारचा पहिलाच अर्थसंकल्पीय अधिवेशन कोरोनाच्या प्रादुभार्वामुळे मुदतीपूर्वीच संस्थगित करावे लागेले. तर ठाकरे सरकारकडून अर्थसंकल्पीय अधिवेशना'तून जनतेला काहीच मिळालं नसल्याचा आरोप भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

राज्याला विकासाकडे घेऊन जाणारं हे अधिवेशन असेल, अशी आमची अपेक्षा होती. तसेच या अधिवेशनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपली छाप दाखवतील असं वाटलं होतं. पण तसं काही झालं नाही. आमच्या प्रश्नांना उत्तर द्यायला नको, म्हणून उद्धव ठाकरे यांनी सभागृहातून नेहमी पळ काढायचा प्रयत्न केला. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारकडून राज्यातील जनतेच्या घोर निराशेने अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सांगता झाली असल्याचा टोला चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे सरकाराला लगावला.

तर शेतकऱ्यांच्या मुद्यावरून सुद्धा चंद्रकांत पाटील यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. राज्यातील अवाकाळीग्रस्त शेतकरी व सांगली, कोल्हापूरमध्ये अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अधिवेशनातून काहीही मिळालं नसल्याचं त्यांनी म्हंटलं आहे. तर पुढील अधिवेशनात तरी मुख्यमंत्री हे संपूर्ण काळ सभागृहात उपस्थित राहून, आम्ही उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तरे देतील, अशी अपेक्षा असल्याचं पाटील म्हणाले.

२४ फेब्रुवारी पासून सुरु झालेलं अर्थसंकल्पीय अधिवेशन, जगभरात पसरलेल्या कोरोना साथीच्या भीतीमुळे एक आठवडा आधीच गुंडाळण्यात आले. या अधिवेशनात विधान परिषदेत २०१८ तारांकित प्रश्न आले होते. त्यातील ९०० प्रश्न स्वीकृत झाले तर अवघ्या ६३ प्रश्नांना मंत्र्यांनी सभागृहात उत्तरे दिली.