शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

'ठाकरे' सरकार नव्हे, तर महाराष्ट्र सरकार म्हणा- नारायण राणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2019 13:25 IST

शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या महाविकास आघाडीचं पहिलंच अधिवेशन नागपुरात सुरू आहे.

नागपूरः शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या महाविकास आघाडीचं पहिलंच अधिवेशन नागपुरात सुरू आहे. या अधिवेशनात भाजपा आणि शिवसेनेमध्ये चांगलीच खडाजंगी झालेली पाहायला मिळत आहे. या अधिवेशनासाठी दोन दिवसांपूर्वीच शरद पवार दाखल झाले, त्यांच्या पाठोपाठ एकनाथ खडसेही पोहोचले. त्यानंतर आता नारायण राणेसुद्धा दाखल झाले आहेत. राणे नागपुरात आले असता पत्रकारांनी त्यांना घेरलं आणि काही प्रश्न विचारले. राणेंना ठाकरे सरकारबद्दल विचारले असता त्यांनी आक्षेप नोंदवला आहे. राणेंनी 'ठाकरे सरकार' या शब्दप्रयोग करू नका, असा सल्लाच पत्रकारांना दिला आहे.'हे महाराष्ट्र सरकारचं अधिवेशन आहे. कोणाचं नाव त्याला जोडू नका,' अशी सूचना त्यांनी उपस्थित पत्रकारांना केली आहे. तसेच हे अधिवशेन असल्याचं वाटतच नाही. सगळं कसं घरगुती वाटतंय. सत्ताधाऱ्यांकडून कुठलीही गोष्ट नियमाला धरून होत नाही आहे, अशी टीकाही राणेंनी केली आहे. सरकारच्या कामगिरीबद्दल विचारले असता, राणेंनी माहिती घेऊन बोलेन, असं सांगितलं. नारायण राणे आज पत्रकार परिषद घेऊन असून, ते काय बोलतात याबाबत उत्कंठा आहे. तत्पूर्वी नितेश राणेंनीही उद्धव ठाकरेंवर टीका केली होती.  आमदार नितेश यांनीही काल उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. उद्धव ठाकरे हे सभागृहात मातोश्रीवर असल्यासारखे भाषण करत होते. त्यामुळे शिवसेना आणि मित्र पक्षांचं पुढील विधिमंडळ अधिवेशन त्यांनी मातोश्रीवर बोलवावं. त्यांचे एकंदर भाषण हे प्रवचनी अंदाजातलं होतं. प्रवचनं ही कानाला ऐकायला बरी वाटतात. मात्र, त्यातून प्रश्नांचं समाधान होत नसल्याचं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.  

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे Uddhav Thackerayउद्धव ठाकरे