शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

औरंगाबादच नव्हे; अनेक भागांत ‘सारी’

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2020 06:16 IST

‘आयसीएमआर’चे संशोधन; राज्यातील ५५३ पैकी २१ जणांना कोरोना

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) देशभर केलेल्या अभ्यासात सिव्हीअर अ‍ॅक्यूट रेस्पीरेटरी इलनेस म्हणजेच ‘सारी’ हा आजार असलेल्या ५ हजार ९११ पैकी १०४ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यात महाराष्ट्रातील आठ जिल्ह्यांतील २१ जणांचा समावेश आहे.राज्यातील ‘सारी’च्या ५५३ रुग्णांची ‘कोरोना’ची चाचणी करण्यात आली होती. दरम्यान, कोरोनाची लागण झालेल्या ‘सारी’च्या रुग्णांच्या जिल्ह्यात अधिक तीव्रतेने सर्वेक्षण करण्याची गरज असून त्याचा कोरोना रोखण्यासाठी फायदा होईल, असेही अभ्यासात म्हटले आहे.‘सारी’ हा श्वसनाचा आजार आहे. तसेच कोरोनामध्ये ही अनेक रुग्णांना श्वसनास त्रास होतो. त्यामुळे ‘आयसीएमआर’च्या शास्त्रज्ञांच्या टीमने १५ फेब्रुवारी ते १९ मार्चमध्ये देशभरातील रुग्णालयांमध्ये दाखल सारीच्या रुग्णांच्या घशातील स्त्रावाची तपासणी केली. त्यामध्ये ५ हजार ९११ रुग्णांचा समावेश होता.त्यापैकी १.८ टक्के म्हणजे केवळ १०४ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले. त्यात महाराष्ट्रासह २० राज्यातील ५२ जिल्ह्यांतील रुग्णांचा समावेश होता. गुजरात (७९२) व तामिळनाडू (५७७) पाठोपाठ महाराष्ट्र(५५३) सर्वाधिक रुग्णांची तपासणी करण्यात आली. महाराष्ट्रात सर्वाधिक ३.८ टक्के म्हणजे २१ जण कोरोनाबाधित होते.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस