शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

ना शिंदे ना फडणवीस, कोल्हापूरच्या सभेत कन्हैया कुमारांचं टार्गेट अजितदादा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2023 18:43 IST

जर कुणी चुकीचे असेल तर तो चुकीचाच आहे. तो भाजपात जाऊन बरोबर ठरत नाही असा टोला कन्हैया कुमार यांनी भाजपाला लगावला.

कोल्हापूर – आज व्यासपीठावर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आहेत. आम्ही तुम्ही कुठल्या पवारांचे हे विचारणार नाही. तर तुम्ही खऱ्या राष्ट्रवादीचे आहात तर ते विकलेल्या राष्ट्रवादीचे आहेत. भाजपाचे इलेक्शन डिपार्टमेंट म्हणजे ED, त्यातून राजकारण केले जाते. ईडी पाठवतात अन्यथा सीडी पाठवतात. ज्यांची ईडी, सीडी नाही तो खरा आहे आणि ज्यांची ईडी, सीडी आहे ते खोटे आहेत, ते जाऊन असत्यासोबत उभे राहिलेत अशा शब्दात काँग्रेस नेते कन्हैया कुमार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर निशाणा साधला आहे.

कोल्हापूरात सद्भावना रॅलीत कन्हैया कुमार यांनी लोकांना संबोधित केले. त्यावेळी कन्हैया कुमार म्हणाले की, गुजरात से आया मेरा दोस्त, दोस्त को सलाम करो...सध्या अजितदादा सलाम ठोकतायेत. पंतप्रधानांनी त्यांच्या भाषणात म्हटलं ७० हजार कोटींचा घोटाळा केला. इलेक्शन डिपार्टमेंट सक्रीय झाले. आता अजितदादा तिथे गेल्या वर कुठला घोटाळा झाला नाही. भाजपाच्या वॉशिंग मशिनमध्ये सर्वकाही साफ झाले. आता डाग अच्छे है, हा खेळ समजून घ्या. बाहेरून येणारे महाराष्ट्रात एकमेकांविरोधात लढवले जात आहे. शिवसेना, NCP आणि काँग्रेसची ही लढाई नाही तर सत्याची लढाई आहे. महाराष्ट्राला सत्यासोबत राहावे लागेल असं त्यांनी म्हटलं.

तसेच जर कुणी चुकीचे असेल तर तो चुकीचाच आहे. तो भाजपात जाऊन बरोबर ठरत नाही. हे पहिले ईडी पाठवतात. इलेक्शन डिपार्टमेंट जातो, नेत्याला घाबरवलं जाते. जर नेता घाबरला तर लगेच त्याला भाजपाचे उपरणे घालून त्याचे सर्व गुन्हे माफ केले जातात. नेत्यांच्या घरी पाहुणे पाठवतात. ईडी जाते तेव्हा चोर चोर ओलडले जाते. घाबरून ते भाजपात गेले संत आहे, साधू, महात्मा आहेत बोलले जाते. हे सर्व तुमच्या डोळ्यासमोर घडतंय. भाजपाच्या खोट्याचा पर्दाफाश झाला तर खोटी चाणक्यनीती उघड होईल. महाराष्ट्राच्या सर्वसामान्यांच्या आत्मसन्मानाचा हा मुद्दा आहे. तुम्ही एका पक्षाचा लोकप्रतिनिधी निवडून देता, तिथून इलेक्शन डिपार्टमेंट येते, नेता घाबरला तर भाजपात, नाही गेला तर इथे राहतो. देशातील विरोधी पक्षाला संपवण्याचा घाट घातला जातोय. कारण मित्रासाठी होणारी देशाची लूट यावर कुणालाही प्रश्न विचारता येऊ नये असा आरोप कन्हैया कुमार यांनी केला.

महाराष्ट्राचा विचार देशाचा विचार बनतो

दरम्यान, आम्ही कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत भारत जोडो यात्रेत चालत होतो, तेव्हा हिंगोलीजवळ हजारो लोक कोल्हापुरी फेटा बांधून रस्त्याच्या बाजूला उभे होते. त्याठिकाणी आमची भेट राहुल पाटील, बंटी पाटील भेटले. ही हजारो माणसं कुठून आली हा प्रश्न मला पडला, एका कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यात लोकं आली होती. भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात पोहचली. तेव्हा खरोखरच महाराष्ट्र देशाला दिशा देणारी भूमी आहे. महाराष्ट्राचा विचार देशाचा विचार बनतो. एका शिस्तीने विचार ऐकायला लोकं येतात. ही ओळख शाहू-फुले-आंबेडकर आणि संताची आहे. आंदोलनाची भूमी महाराष्ट्राची आहे. ही लोकं आमच्या कोल्हापुरची आहे. समता भूमीची लोकं आहेत असं मला सांगितले. पुढे कोल्हापूरात या असं मला निमंत्रण दिले. मी तेव्हाच सांगितले यापुढे कधीही येईन कोल्हापूरला आवश्यक येईन असं कन्हैया कुमार यांनी म्हटलं.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारcongressकाँग्रेस