शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
2
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
3
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
4
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
5
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
6
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
7
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
8
ICC Rankings : हातात विश्वचषकाचा 'दागिना'; पण जाता जाता लॉरानं 'वनडे क्वीन’ स्मृतीचा मुकूट हिसकावला!
9
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
10
सलग चौथ्या दिवशी बाजारात घसरण! गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी पाण्यात; 'ही' आहेत ५ कारणे
11
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
12
मंदिराच्या गर्भगृहाची दुरुस्ती करताना सापडलं घबाड, कलशात होती सोन्याची एवढी नाणी...  
13
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
14
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
15
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
16
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
17
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
18
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
19
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
20
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?

बर्फवृष्टीनंतर उत्तरेकडील शीतवारे महाराष्ट्राकडे; लवकरच अवतरणार थंडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2023 10:00 IST

ख्रिसमसच्या तोंडावर मुंबईतील हवेला पुन्हा प्रदुषणाचे ग्रहण

लोकमत न्यूज नेटवर्कमुंंबई : गेल्या सहा दिवसांपूर्वी मुंबईत थंडीची चाहूल लागली होती. मात्र, पुन्हा तापमानात वाढ झाली. आता ख्रिसमसनंतर मुंबईत थंडी पडेल, अशी शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे शुक्रवारी मुंबईत ढगाळ वातावरण होते.

पूर्वेकडून वाहणाऱ्या वाऱ्याचा प्रभावही दिवसभर कायम राहिल्याने पश्चिमेकडून वाहणाऱ्या वाऱ्याला अटकाव राहिला. त्यामुळे समुद्री वाऱ्याबरोबर वाहून जाणारी प्रदूषके हवेत स्थिर राहिल्याने मुंबईतील दृश्यमानता कमी झाली होती. गेल्या काही दिवसांपासून मुंबईच्या वातावरणात बदल जाणवत आहेत. आठवड्याभरापूर्वी मुंबईचे किमान तापमान १९ अंश नोंदविण्यात आले होते. त्यामुळे थंडीचा प्रभाव वाढला होता. 

थंडीचा कडाका वाढेलकिमान तापमान २३ अंशांवर गेल्याने थंडी किंचित कमी झाली. या आठवड्यात किमान तापमान पुन्हा १९ अंशांवर घसरल्याने थंडी वाढली. आता किमान तापमान २१ अंश असून, उत्तरेकडे होणाऱ्या बर्फवृष्टीनंतर उत्तरेकडील शीतवारे महाराष्ट्राकडे वाहतील. त्यामुळे किमान तापमान २५ डिसेंबरनंतर १९ अंशांवर घसरेल आणि थंडीचा कडाका वाढेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.

कमी दाबाच्या क्षेत्रामुळे वातावरणात बदल झाले आहेत. मुंबईसह गुजरातमध्येही ढगाळ वातावरण नोंदविण्यात आले आहे. मात्र, या वातावरणामुळे मोठ्या पावसाची शक्यता नाही. आर्द्रता वाढल्याने हवेत बदल झाला. शनिवारीही असेच ढगाळ वातावरण राहील.- राजेश कपाडीया, वेगरिज ऑफ दी वेदर

मध्य महाराष्ट्र, गुजरात, मुंबईत किमान तापमानात सरासरी तुलनेत दोन डिग्रीने वाढ झाली आहे. गेल्या १५ दिवसांपासून मध्य महाराष्ट्र, गुजरात, मुंबईत सरासरीच्या खाली घटलेले कमाल तापमान आता सरासरीच्या पातळीवर पोहोचले आहे. म्हणजे कमाल तापमान वाढले आहे. हिवाळ्यात सकाळच्या वेळी कमी उंचीवर ढगांचे मळभ तयार होते. सूर्यकिरणे वर आली की, ढगाळ वातावरण निवळून पुन्हा सर्वत्र निरभ्रता येते.- माणिकराव खुळे, हवामानतज्ज्ञ

टॅग्स :pollutionप्रदूषण