शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
4
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
5
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
6
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
7
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
8
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
9
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
10
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
11
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
12
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
13
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
14
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
15
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
16
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
17
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
18
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
19
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
20
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण

... तर सेनेची पळता भुई थाेडी हाेईल!; आशिष शेलारांचा उद्धव ठाकरेंना इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2022 05:53 IST

ठाण्यात घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत शेलार बोलत होते.

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या वक्तव्याशी भाजप सहमत नाही. सत्तेत आल्यानंतर काँग्रेसने स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान केला होता. त्यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे कोणाला सलाम करत होते, असा सवाल भाजप नेते आशिष शेलार यांनी शनिवारी केला आहे. तसेच राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड हे गृहनिर्माणमंत्री असताना किती मराठी विकासक त्यांच्या कार्यालयात येत होते? अमराठी विकासकांची रांग का होती? उद्धव ठाकरे यांनी मुंबई महापालिकेत किती मराठी कंत्राटदारांना काम दिले, असा सवालही त्यांनी केला.

ठाण्यात घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत शेलार बोलत होते. मुंबई आणि महाराष्ट्र मराठी माणसाच्या कष्टाने घामाने, हौतात्म्याने, मुंबई देशाची आर्थिक राजधानी झाली आहे. त्यामुळे कोणीही कुठल्याही पदावर बसून मराठी माणूस, संस्कृती, भाषा याचा विपर्यास होईल, अशी स्थिती आणू नये, असे आमचे स्पष्ट मत असल्याचेही त्यांनी सांगितले. आव्हाड आणि मराठी माणसाच्या हिताचा संबंध काय? गृहनिर्माणमंत्री असताना त्यांच्या दालनात अमराठी विकासकांची रांग का होती?, माफीचा उद्योग करायचा असेल तर बऱ्याच माफी मागाव्या लागतील, तुमच्या पक्षाचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री असताना कोणत्या विकासकाला थंड हवेचे ठिकाण विकसित करायला दिले होते?, मुंबई महापालिकेत २५ वर्षांत एकाही मराठी कंत्राटदाराला येऊ दिले नाही, याचे उत्तर सेनेने द्यावे.

... तर सेनेची पळता भुई थाेडी हाेईल!कोल्हापुरी चप्पल आणि जोडे मारो आंदोलनाची एवढीच खुमखुमी असेल, तर सावरकरांचा अपमान केल्यावर मणीशंकर यांना जोडे मारण्याचा कार्यक्रम बाळासाहेबांनी केला. काँग्रेसबरोबर महाविकास आघाडीत आल्यावर काँग्रेसने जी अभद्र भाषा वापरली, त्यानंतर तुमच्या हातात ते जोडे का नाही आले, असा सवाल त्यांनी उद्धव ठाकरे यांना केला. जोडे मारायचेच असतील आणि माफीची मागणीच करायची असेल तर बरेच विषय समोर येतील आणि शिवसेनेची पळता भुई थोडी होईल, असा टोलाही शेलार यांनी लगावला.

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडAshish Shelarआशीष शेलार