शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसच्या हातून वेळ गेलेली नाही; भाजप खासदार संभाजीराजेंचा सूचक इशारा !

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2019 12:39 IST

धनंजय महाडिकच भाजपमध्ये आल्याने संभाजीराजे नाराज असल्याचे दिसून येते. त्या नाराजीतूनच त्यांनी काँग्रेसविषयी आपली भावना बोलून दाखवल्याचे सांगण्यात येते.

मुंबई - आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमधील अनेक नेत्यांनी भाजप आणि शिवसेनेत प्रवेश केला. त्याचे परिणाम आता समोर येऊ लागले आहेत. विरोधी पक्षातील नेत्यांनी मोठ्या प्रमाणात भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मात्र आयारामांचं नियोजन करताना भाजप नेत्यांमधील खदखद बाहेर येण्याची शक्यता आहे. याची सुरुवात भाजपच्या कोट्यातून खासदार झालेले छत्रपती संभाजीराजे यांच्यापासून सुरू झाली का, असा प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित होत आहे.

कोल्हापूरचे माजी खासदार धनंजय महाडीक यांनी नुकताच केंद्रीयमंत्री अमित शाह यांच्या उपस्थिती भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे खासदार संभाजीराजे नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे. मुंबईत झालेल्या मराठा सेवा संघाच्या कार्यक्रमात संभाजीराजे यांनी आपली नाराजी व्यक्त केली. यावेळी त्यांनी भाजपला घरचा आहेर देत काँग्रेसला लढ्यासाठी प्रोत्साहन दिले. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात देखील उपस्थित होते.

संभाजीराजे म्हणाले की, काँग्रेस आपले विचार आणि केलेल्या कामांची मांडणी करण्यात कमी पडले हे सत्य आहे. परंतु, अजुनही काँग्रेसच्या हातून वेळ गेलेली नाही. काँग्रेसने आपल्या विचारांची योग्य रितीने मांडणी करावी. आमचे वडिल, लहान भाऊ काँग्रेसमध्येच आहेत. माझं मन कुठय हे सर्वांना ठावूक आहे, असा सूचक इशाराही संभाजी राजे यांनी दिले. परंतु, काम करून घेणे आणि शिवाजी महाराजांचा विचार सर्वांपर्यंत पोहोचविणे माझी जबाबदारी आहे. तसेच महाराजांच्या किल्ल्यांचं संवर्धन करण्यासाठी आपण दिल्लीत असल्याचं संभाजी राजे म्हणाले.

राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी २००९ मध्ये तत्कालीन खासदार दिवंगत सदाशिवराव मंडलिक यांना डावलून संभाजीराजे यांना उमेदवारी दिली होती. त्यावेळी उमेदवारीसाठी महाडीक देखील स्पर्धेत होते. मात्र स्वच्छ प्रतिमा असूनही संभाजीराजेंचा पराभव झाला होता. महाडिक गटाकडून संभाजीराजेंसोबत दगाफटका झाला असे आरोपही त्यावेळी झाले. काही दिवसांनी यासंदर्भात खुद्द आमदार महादेवराव महाडिक यांनीच संभाजीराजेंना मदत न केल्याचा गौप्यस्फोट केला होता. तेव्हापासून संभाजी राजे महाडिकांपासून अंतर ठेवून आहेत. परंतु, आता धनंजय महाडिकच भाजपमध्ये आल्याने संभाजीराजे नाराज असल्याचे दिसून येते. त्या नाराजीतूनच त्यांनी काँग्रेसविषयी आपली भावना बोलून दाखवल्याचे सांगण्यात येते.