शहरं
Join us  
Trending Stories
1
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
2
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
3
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
4
IND A vs SA A : पंत कॅप्टन्सीसह कमबॅक करणार! रोहित-विराट मात्र 'या' वनडे मालिकेपासून दूरच राहणार?
5
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
6
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
7
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
8
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
9
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
10
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
11
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
12
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
13
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
14
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
15
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
16
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
17
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
18
श्रीदेवीचा सुपरहिट सिनेमा 'मॉम'च्या सीक्वेलमध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री, सेटवरील फोटो लीक
19
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
20
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ

काँग्रेसच्या हातून वेळ गेलेली नाही; भाजप खासदार संभाजीराजेंचा सूचक इशारा !

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2019 12:39 IST

धनंजय महाडिकच भाजपमध्ये आल्याने संभाजीराजे नाराज असल्याचे दिसून येते. त्या नाराजीतूनच त्यांनी काँग्रेसविषयी आपली भावना बोलून दाखवल्याचे सांगण्यात येते.

मुंबई - आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमधील अनेक नेत्यांनी भाजप आणि शिवसेनेत प्रवेश केला. त्याचे परिणाम आता समोर येऊ लागले आहेत. विरोधी पक्षातील नेत्यांनी मोठ्या प्रमाणात भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मात्र आयारामांचं नियोजन करताना भाजप नेत्यांमधील खदखद बाहेर येण्याची शक्यता आहे. याची सुरुवात भाजपच्या कोट्यातून खासदार झालेले छत्रपती संभाजीराजे यांच्यापासून सुरू झाली का, असा प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित होत आहे.

कोल्हापूरचे माजी खासदार धनंजय महाडीक यांनी नुकताच केंद्रीयमंत्री अमित शाह यांच्या उपस्थिती भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे खासदार संभाजीराजे नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे. मुंबईत झालेल्या मराठा सेवा संघाच्या कार्यक्रमात संभाजीराजे यांनी आपली नाराजी व्यक्त केली. यावेळी त्यांनी भाजपला घरचा आहेर देत काँग्रेसला लढ्यासाठी प्रोत्साहन दिले. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात देखील उपस्थित होते.

संभाजीराजे म्हणाले की, काँग्रेस आपले विचार आणि केलेल्या कामांची मांडणी करण्यात कमी पडले हे सत्य आहे. परंतु, अजुनही काँग्रेसच्या हातून वेळ गेलेली नाही. काँग्रेसने आपल्या विचारांची योग्य रितीने मांडणी करावी. आमचे वडिल, लहान भाऊ काँग्रेसमध्येच आहेत. माझं मन कुठय हे सर्वांना ठावूक आहे, असा सूचक इशाराही संभाजी राजे यांनी दिले. परंतु, काम करून घेणे आणि शिवाजी महाराजांचा विचार सर्वांपर्यंत पोहोचविणे माझी जबाबदारी आहे. तसेच महाराजांच्या किल्ल्यांचं संवर्धन करण्यासाठी आपण दिल्लीत असल्याचं संभाजी राजे म्हणाले.

राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी २००९ मध्ये तत्कालीन खासदार दिवंगत सदाशिवराव मंडलिक यांना डावलून संभाजीराजे यांना उमेदवारी दिली होती. त्यावेळी उमेदवारीसाठी महाडीक देखील स्पर्धेत होते. मात्र स्वच्छ प्रतिमा असूनही संभाजीराजेंचा पराभव झाला होता. महाडिक गटाकडून संभाजीराजेंसोबत दगाफटका झाला असे आरोपही त्यावेळी झाले. काही दिवसांनी यासंदर्भात खुद्द आमदार महादेवराव महाडिक यांनीच संभाजीराजेंना मदत न केल्याचा गौप्यस्फोट केला होता. तेव्हापासून संभाजी राजे महाडिकांपासून अंतर ठेवून आहेत. परंतु, आता धनंजय महाडिकच भाजपमध्ये आल्याने संभाजीराजे नाराज असल्याचे दिसून येते. त्या नाराजीतूनच त्यांनी काँग्रेसविषयी आपली भावना बोलून दाखवल्याचे सांगण्यात येते.