शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

मराठा आरक्षणावरील निर्णय होईपर्यंत नोकरभरती नाही; राज्य सरकारची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2020 07:00 IST

राज्यात १५ सप्टेंबरपर्यंत कुठलही भरती करण्यात येणार नसल्याचे राज्य सरकारने स्पष्ट केले. न्यायालयाने आजपासून पुढील तीन दिवस अंतिम सुनावणीसाठी निश्चित केले होते.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : मराठा आरक्षणावर सुनावणी १ सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली असून, तोपर्यंत राज्य सरकारने मान्य केल्याप्रमाणे महाराष्ट्रात नोकर भरती होणार नाही, हे सोमवारी सर्वोच्च न्यायालयात स्पष्ट झाले.

अंतिम सुनावणी होईपर्यंत भरती केली जाणार नाही, असे महाराष्ट्र सरकारने मान्य केले असून, वैद्यकीय प्रवेश परीक्षेत मराठा आरक्षणाला न्यायालयाने स्थगिती दिलेली नाही. मराठा विद्यार्थ्यांना हा दिलासाच आहे. पुढील सुनावणी १ सप्टेंबरला सुनावणी होईल, असे न्या. एल. नागेश्वर राव, न्या. हेमंत गुप्ता, न्या. रवींद भट यांच्या पीठाने स्पष्ट केले.

या प्रकरणावर पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे सुनावणी घ्यायची काय, यावर २५ ऑगस्ट रोजी विशेष सुनावणी होणार आहे. त्यासाठी सर्व पक्षकारांना म्हणणे सादर करावे लागेल. घटनापीठाकडे प्रकरण न गेल्यास १ सप्टेंबरपासून सुनावणी होईल.राज्यात १५ सप्टेंबरपर्यंत कुठलही भरती करण्यात येणार नसल्याचे राज्य सरकारने स्पष्ट केले. न्यायालयाने आजपासून पुढील तीन दिवस अंतिम सुनावणीसाठी निश्चित केले होते. परंतु, व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे अडचणी येत असल्याचे राज्य सरकारतर्फे सांगण्यात आले.

आज सुप्रीम कोर्टात काय घडले?कागदपत्रे सादर करणे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमध्ये अवघड असल्याने सुनावणी प्रत्यक्ष व्हावी असा युक्तिवाद ज्येष्ठ वकील पटवालिया यांनी राज्य सरकारच्या वतीने केला. मुकुल रोहतगी यांनीही हीच बाब नमूद केली. कोरोना संकटामुळे सध्या नोकरभरती होत नाही. त्यामुळे हे प्रकरण तातडीने घेण्याची गरज नाही असे राज्य सरकारच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात सांगण्यात आले. निकाल लागेपर्यंत भरती करणार नाही, असे सांगू शकाल का? असा सवाल खंडपीठाने विचारला. यावर मुकुल रोहतगी यांनी राज्य सरकारने ४ मे रोजी जारी केलेल्या आदेशाचा दाखला दिला, ज्यात कोरोना संकटात कोणतीही नोकरभरती होणार नाही, असे स्पष्ट केले आहे.

‘सुनावणी समाधानकारक’प्रकरणाची व्याप्ती पाहता सुनावणी ऑनलाईनऐेवजी प्रत्यक्ष करावी, याबाबतही न्यायालय गंभीर दिसत आहे. त्यामुळे ही सुनावणी समाधानकारक आहे.- अशोक चव्हाण,अध्यक्ष, मंत्रिमंडळ उपसमिती

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षण