शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil : "मी थोड्या दिवसांचा पाहुणा..."; मनोज जरांगे पाटील यांना अश्रू अनावर, मराठ्यांना भावनिक साद
2
"गोपीनाथ मुंडेंनी मराठा आरक्षणाला विरोध केला नाही, पण..."; पंकजा मुंडे दसरा मेळाव्यात स्पष्टच बोलल्या
3
Goldman Sachs चे 'हे' ४ शेअर्स बनले सुपरस्टार; एका वर्षात १५५ टक्क्यांपर्यंतची तेजी, तुम्ही घेतलाय का?
4
'आग तो लगी थी घर में...."; धनंजय मुंडेंनी शायरीतून भावना व्यक्त केली, मंत्रिपदाबाबत खंतही बोलून दाखवली
5
२ घास कमी खा पण स्वाभिमानाने राहा, कुणाचे तुकडे उचलू नका; पंकजा मुंडेंचं मेळाव्यात आवाहन
6
कराड आमचे दैवत...; पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्यात झळकले वाल्मिक कराडचे पोस्टर
7
Gold Silver Price: सोन्या-चांदीच्या दरात विक्रमी वाढ; गुंतवणूकदारांनी मात्र टाळाव्यात 'या' ५ चुका
8
"खोटे धंदे करू नका, गुंड पाळू नका, काही गरज नाही", पंकजा मुंडे भगवान गडावर काय बोलल्या?
9
Jasprit Bumrah: जसप्रीत बुमराहचा मोठा पराक्रम, घरच्या मैदानावर 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
10
७५ वर्षांचा नवरा अन् ३५ वर्षांची नवरी! लग्नाच्या रात्रीच पतीचा मृत्यू; गूढ उलगडलं, समोर आलं सत्य
11
१९ वर्षे शनि, १८ वर्षे राहु महादशा: शनि महादशेत राहु अंतर्दशा आली? भाग्योदय; अपार पैसा-लाभ!
12
अभिनेता विजयला सोबत घेण्याचा भाजपाचा प्रयत्न; चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर समोर आली नवीन रणनीती
13
Gensol Engineering Ltd: ₹२४०० वरुन ₹४१ वर आला 'हा' शेअर, आता ट्रेडिंग झालं बंद; संकटात कंपनी, तुमच्याकडे आहे का शेअर?
14
WhatsApp वापरकर्त्यांची प्रतीक्षा संपली! फक्त नंबर डायल करा आणि कॉल करा, नवीन फिचर आले
15
डोक्याला ताप! दिवसभर इन्स्टाग्रामवर रील बनवायची बायको; नवरा ओरडल्यावर मुलासह गायब
16
शुक्रवारपासून पंचक प्रारंभ: ५ दिवस अत्यंत प्रतिकूल, अशुभ; ‘या’ गोष्टी करूच नयेत, अमंगल काळ!
17
TATA Motors च्या गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी; डीमर्जरची तारीख आली समोर, एकावर १ शेअर मिळणार
18
अश्विन पाशांकुशा एकादशी २०२५: श्रीविष्णूंचे पद्मनाभ स्वरुप पूजन, ‘असे’ करा व्रत; शुभ-लाभ!
19
"बेबी, स्वीटी, तू माझ्यासोबत...!" विद्यार्थीनीसोबत एवढ्या घाणेरड्या गप्पा, समोर आलं चैतन्यानंदचं घृणास्पद चॅट
20
IMD: बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ धडकणार; ओडिशा किनारपट्टीला धोका!

"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2025 17:10 IST

"५ जुलैचा मोर्चा केवळ भव्य मोर्चा नसेल, तर महा भव्य मोर्चा असेल. तसेच,  हिंदीला विरोध नसला, तरी हिंदीची सक्ती आम्ही लादू देणार नाही," असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

संध्या संपूर्ण राज्यात पहिलीच्या वर्गापासूनच 'हिंदी भाषा' सक्तीची करण्यावरून जबरदस्त राजकारण सुरू झाले आहे. खरे तर, राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार राज्यात त्रिभाषा सूत्र लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याविरोधात आज आझाद मैदान परिसरात आंदोलन करत शिवसेना ठाकरे गटाकडून राज्य सरकारने काढलेल्या हिंदी सक्तीच्या जीआरची प्रतिकात्मक होळी करण्यात आली. यानंतर, यामुद्द्यावरून आता पाच तारखेला मोर्चाचेही आयोजन करण्यात आला आहे. या मोर्चात ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याची चर्चा आहे. यासंदर्भात बोलताना, "५ जुलैचा मोर्चा केवळ भव्य मोर्चा नसेल, तर महा भव्य मोर्चा असेल. तसेच,  हिंदीला विरोध नसला, तरी हिंदीची सक्ती आम्ही लादू देणार नाही," असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. ते मुंबईत पत्रकारांसोबत बोलत होते.

उद्यापासून राज्य सरकारचे विधीमंडळाचे अधिवेशन सुरू होत आहे. त्यापूर्वीच ठाकरे गटाने हे आंदोलन केले आहे. यासंदर्भात बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, "आम्ही सरकारवर कसलाही दबाव आणू इच्छित नाही. आम्ही हे स्वीकारतच नाही. त्यामुळे एखादी गोष्ट ते लादत असतील, तर आम्ही आमच्या वतीने हा विषय संपवला आहे. आम्ही  या जीआरची होळी केली आहे. त्यामुळे आता तो जीआर आहे, असे मानण्याचे कारण नाही. मी वारंवार म्हटले आहे की, हिंदीला विरोध नसला, तरी हिंदीची सक्ती आम्ही लादू देणार नाही."

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, मोर्चा काढण्याची वेळ येऊ नये, यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत? असा प्रश्न एका पत्रकारने केला असता, ठाकरे म्हणाले, "आनंदाची गोष्ट आहे. कुणी तरी एक जण धाडस दाखवत आहे. सर्वच जण गुलाम झालेले नाहीत. त्याबद्दल कौतुक आहे. मोर्चा कशाकाढी काढावा लागत आहे, हे त्यांच्या लक्षात आलेले नाहीये. महाराष्ट्रात मराठीवरते हा जो काही अत्याचार होत आहे, मी असे म्हणेन की, मुलांवर त्या वयात आपण किती भार टाकणार? हा सुद्धा एक विषय आहे."

तज्ज्ञांच्या समिती स्थापनेसंदर्भातील चर्चेवर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, "त्यावेळेला आम्ही एक अभ्यासगट केला होता. मात्र त्याचे पुढे काय झाले? यासंदर्भात काहीच कुणी सांगत नाही. त्याची एकही बैठक झाली नाही. आणि कुणी अभास न करता हा निर्णय अचानकपणे का लादला गेला? हा कुणी लादला? कुणाचा दुराग्रह आहे? हे सुद्धा अजित पवारांनी जाहीर केलं तर बरं होईल."

 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेhindiहिंदीShiv SenaशिवसेनाState Governmentराज्य सरकारAjit Pawarअजित पवार