शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
6
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
7
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
8
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
9
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
10
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
11
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
12
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
13
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
14
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
15
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
16
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
17
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
18
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
19
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
20
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार

"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2025 17:10 IST

"५ जुलैचा मोर्चा केवळ भव्य मोर्चा नसेल, तर महा भव्य मोर्चा असेल. तसेच,  हिंदीला विरोध नसला, तरी हिंदीची सक्ती आम्ही लादू देणार नाही," असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

संध्या संपूर्ण राज्यात पहिलीच्या वर्गापासूनच 'हिंदी भाषा' सक्तीची करण्यावरून जबरदस्त राजकारण सुरू झाले आहे. खरे तर, राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार राज्यात त्रिभाषा सूत्र लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याविरोधात आज आझाद मैदान परिसरात आंदोलन करत शिवसेना ठाकरे गटाकडून राज्य सरकारने काढलेल्या हिंदी सक्तीच्या जीआरची प्रतिकात्मक होळी करण्यात आली. यानंतर, यामुद्द्यावरून आता पाच तारखेला मोर्चाचेही आयोजन करण्यात आला आहे. या मोर्चात ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याची चर्चा आहे. यासंदर्भात बोलताना, "५ जुलैचा मोर्चा केवळ भव्य मोर्चा नसेल, तर महा भव्य मोर्चा असेल. तसेच,  हिंदीला विरोध नसला, तरी हिंदीची सक्ती आम्ही लादू देणार नाही," असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. ते मुंबईत पत्रकारांसोबत बोलत होते.

उद्यापासून राज्य सरकारचे विधीमंडळाचे अधिवेशन सुरू होत आहे. त्यापूर्वीच ठाकरे गटाने हे आंदोलन केले आहे. यासंदर्भात बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, "आम्ही सरकारवर कसलाही दबाव आणू इच्छित नाही. आम्ही हे स्वीकारतच नाही. त्यामुळे एखादी गोष्ट ते लादत असतील, तर आम्ही आमच्या वतीने हा विषय संपवला आहे. आम्ही  या जीआरची होळी केली आहे. त्यामुळे आता तो जीआर आहे, असे मानण्याचे कारण नाही. मी वारंवार म्हटले आहे की, हिंदीला विरोध नसला, तरी हिंदीची सक्ती आम्ही लादू देणार नाही."

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, मोर्चा काढण्याची वेळ येऊ नये, यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत? असा प्रश्न एका पत्रकारने केला असता, ठाकरे म्हणाले, "आनंदाची गोष्ट आहे. कुणी तरी एक जण धाडस दाखवत आहे. सर्वच जण गुलाम झालेले नाहीत. त्याबद्दल कौतुक आहे. मोर्चा कशाकाढी काढावा लागत आहे, हे त्यांच्या लक्षात आलेले नाहीये. महाराष्ट्रात मराठीवरते हा जो काही अत्याचार होत आहे, मी असे म्हणेन की, मुलांवर त्या वयात आपण किती भार टाकणार? हा सुद्धा एक विषय आहे."

तज्ज्ञांच्या समिती स्थापनेसंदर्भातील चर्चेवर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, "त्यावेळेला आम्ही एक अभ्यासगट केला होता. मात्र त्याचे पुढे काय झाले? यासंदर्भात काहीच कुणी सांगत नाही. त्याची एकही बैठक झाली नाही. आणि कुणी अभास न करता हा निर्णय अचानकपणे का लादला गेला? हा कुणी लादला? कुणाचा दुराग्रह आहे? हे सुद्धा अजित पवारांनी जाहीर केलं तर बरं होईल."

 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेhindiहिंदीShiv SenaशिवसेनाState Governmentराज्य सरकारAjit Pawarअजित पवार