शहरं
Join us  
Trending Stories
1
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
2
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
3
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
4
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
5
एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
6
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
7
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
8
Nagpur Murder: गुटखा न देण्यावरून पेटला वाद, रागाच्या भरात मित्रालाच संपवलं, दोघांना अटक!
9
Finn Allen: अवघ्या ४९ चेंडूत १५० धावा! फिन अ‍ॅलेननं इतिहास रचला, ख्रिस गेलचाही विक्रम मोडला 
10
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
11
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
12
Ahmedabad Plane Crash :विद्यार्थी जेवण करत होते अन् अंगावर पडले विमान 
13
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
14
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
15
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
16
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
17
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
18
अहमदाबादनंतर मुंबईत दुर्घटना घडण्याची वाट बघायची का? मुंबई विमानतळ परिसरातील झोपड्या, फनेल झाेनमधील इमारतींचे पुनर्वसन रखडले
19
प्रभाग रचना सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार; पालिका निवडणुका ऑक्टोबरनंतरच! ९ टप्प्यांमध्ये प्रक्रिया पूर्ण होणार; २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान होणार शिक्कामोर्तब
20
मुंब्रा स्टेशनजवळील रुळांचे ‘ते’ वळण तसेच राहणार ! मध्य रेल्वेनं सांगितलं कारण; जमिनीच्या अधिग्रहणाची मोठी अडचण

‘अभिजात दर्जासाठी निकषांची गरज नाही’

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2020 02:48 IST

परकीय आक्रमणांची पर्वा न करणाऱ्या मराठीचे वैभव मौलिक आहे, ते वाढविण्याचा प्रयत्न करू या, असे प्रतिपादन मुख्यमंत्र्यांनी केले.

मुंबई : मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला पाहिजे आणि तो देण्यासाठी मराठी भाषेला निकषांची गरज नाही. अभिजात भाषेचा दर्जा मिळणे हा आपला हक्कच असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. मराठी भाषा लयाला जात आहे अशी परिस्थिती नसून मराठी भाषेची चिंता करू नका. परकीय आक्रमणांची पर्वा न करणाऱ्या मराठीचे वैभव मौलिक आहे, ते वाढविण्याचा प्रयत्न करू या, असे प्रतिपादन मुख्यमंत्र्यांनी केले.ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कविवर्य कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनानिमित्त मराठी भाषेच्या गौरवार्थ, भाषा व साहित्याच्या विकासासाठी कार्यरत मान्यवरांच्या सन्मानार्थ गौरव व पुरस्कार प्रदान सोहळा यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात गुरुवारी सायंकाळी पार पडला. या कार्यक्रमाला मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई, मराठी भाषा राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, खासदार अरविंद सावंत, आमदार राहुल नार्वेकर यांची विशेष उपस्थिती होती.उद्धव ठाकरे म्हणाले, मराठी भाषा अनिवार्य कायद्याला दोन्ही सभागृहांत मान्यता मिळाल्याचा आनंद आहे. मराठी भाषेच्या रूपाने आपल्याकडे अमूल्य अक्षरधन आहे ही महत्त्वाची संपत्ती आहे. सध्या सर्वच पुस्तकांपासून दूर जाऊन ‘मोबाइलवेडे’ आणि ‘गुगलगाय’ झाले आहेत. मात्र प्रत्यक्षात आपण ‘माहिती’ आणि ‘ज्ञान’ यातला फरक समजून घेतला पाहिजे. त्यामुळे मराठी भाषेची गोडी ही लहानपणापासूनच लावायला हवी. तुम्हा सर्वांचे विचार घेऊन आम्ही पुढे जाणार आहोत, असे सांगत मुख्यमंत्र्यांनी पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन केले.मराठी साहित्य निर्मितीत लक्षणीय कामगिरी करणाºया पद्मगंधा प्रकाशनाच्या अरुण जाखडे यांच्या प्रकाशन संस्थेस या वेळी ‘श्री. पु. भागवत पुरस्कार’ देण्यात आला, तर ज्येष्ठ साहित्यिका अनुराधा पाटील यांना ‘विंदा करंदीकर जीवन गौरव’ पुरस्काराने गौरविण्यात आले. प्रा. आर. विवेकानंद गोपाळ यांना ‘डॉ. अशोक केळकर मराठी भाषा अभ्यासक’ म्हणून गौरविण्यात आले, तर ‘भाषा संवर्धक’ पुरस्कार अनिल गोरे यांना देण्यात आला. सर्व पुरस्कारांचे वितरण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. याशिवाय, यशवंतराव चव्हाण वाङ्मय पुरस्कारांचेही वितरण मराठी भाषा विभाग सचिव प्राजक्ता लवंगारे, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, साहित्य अकादमी विजेते सलीम मुल्ला आणि सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते या वेळी करण्यात आले.‘गोरे’ इंग्रजीला विरोध करतात हा विरोधाभासभाषा संवर्धक म्हणून पुण्याच्या अनिल गोरे यांना गौरविण्यात आले. त्यांचा उल्लेख मनोगतात करून मुख्यमंत्री म्हणाले, इंग्रजी भाषा आपल्या भाषेवर अतिक्रमण करते असे आपण नेहमीच म्हणतो. पण काळाचा महिमा पाहा की, आता ‘गोरे’ इंग्रजीला विरोध करून मराठीची कास धरत आहेत. मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यानंतर सभागृहात उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरे