शहरं
Join us  
Trending Stories
1
२४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, दुबार मतदारावरही उचललं पाऊल
2
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
3
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
4
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
5
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
6
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
7
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?
8
'एक गरिबांचा, तर दुसरा श्रीमंतांचा; दोन देश निर्माण केले', राहुल गांधींचा PM मोदींवर निशाणा
9
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठी घसरण, Silver ₹३५०० तर Gold किती रुपयांनी झालं स्वस्त?
10
DSP Rishikant Shukla: दहा वर्षांच्या सेवेतच जमवली १०० कोटींची माया; एक दोन नव्हे, तब्बल १२ भूखंड, ११ दुकाने अन्...
11
पत्नीने दिला जुळ्यां मुलांना जन्म, पती म्हणाला, ही माझी मुलंच नाहीत, जोरदार राडा, अखेरीस समोर आलं वेगळंच सत्य
12
बाजारात खळबळ! Hyundai ने ₹७.९० लाखात लाँच केली नवीन 'व्हेन्यू २०२५'; जबरदस्त फीचर्स आणि ADAS सह एंट्री
13
अरे व्वा! पांढरे केस हे वाढलेल्या वयाचं लक्षण नाही, ही तर आहे शरीरासाठी संरक्षण ढाल
14
दीड वर्षांपूर्वीच्या पल्लेदार कौशल हत्येचा पर्दाफाश! बायकोच्या 'डबल गेम'ने पोलीसही हादरले
15
मैदान गाजवले, आता ब्रँड व्हॅल्यूही वाढली! महिला क्रिकेटपटूंच्या कमाईत दुप्पट वाढ; सर्वाधिक फी कोणाची?
16
पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टात मोठा स्फोट! इस्लामाबादमध्ये खळबळ; बेसमेंटमध्ये झालेल्या ब्लास्टने इमारतीला हादरवले
17
"हा देश राम-सीता यांचा, लादेनचा नाही; या छोट्या ओसामाला..."; बिहारमध्ये हिमंत बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल
18
Election: निवडणुकीच्या प्रचारात शब्द जपून वापरा नाही तर...; केंद्रीय मंत्र्याविरोधात गुन्हा दाखल
19
Demat अकाऊंटमध्ये ४३ कोटी ठेवणारे डॉक्टर व्हायरल; झिरोदाला म्हटलं स्कॅम; कामथ काय म्हणाले?
20
देशातील १ टक्के श्रीमंत लोकांच्या संपत्तीत ६२ टक्क्यांनी वाढ; हैराण करणारा रिपोर्ट आला समोर

‘अभिजात दर्जासाठी निकषांची गरज नाही’

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2020 02:48 IST

परकीय आक्रमणांची पर्वा न करणाऱ्या मराठीचे वैभव मौलिक आहे, ते वाढविण्याचा प्रयत्न करू या, असे प्रतिपादन मुख्यमंत्र्यांनी केले.

मुंबई : मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला पाहिजे आणि तो देण्यासाठी मराठी भाषेला निकषांची गरज नाही. अभिजात भाषेचा दर्जा मिळणे हा आपला हक्कच असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. मराठी भाषा लयाला जात आहे अशी परिस्थिती नसून मराठी भाषेची चिंता करू नका. परकीय आक्रमणांची पर्वा न करणाऱ्या मराठीचे वैभव मौलिक आहे, ते वाढविण्याचा प्रयत्न करू या, असे प्रतिपादन मुख्यमंत्र्यांनी केले.ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कविवर्य कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनानिमित्त मराठी भाषेच्या गौरवार्थ, भाषा व साहित्याच्या विकासासाठी कार्यरत मान्यवरांच्या सन्मानार्थ गौरव व पुरस्कार प्रदान सोहळा यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात गुरुवारी सायंकाळी पार पडला. या कार्यक्रमाला मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई, मराठी भाषा राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, खासदार अरविंद सावंत, आमदार राहुल नार्वेकर यांची विशेष उपस्थिती होती.उद्धव ठाकरे म्हणाले, मराठी भाषा अनिवार्य कायद्याला दोन्ही सभागृहांत मान्यता मिळाल्याचा आनंद आहे. मराठी भाषेच्या रूपाने आपल्याकडे अमूल्य अक्षरधन आहे ही महत्त्वाची संपत्ती आहे. सध्या सर्वच पुस्तकांपासून दूर जाऊन ‘मोबाइलवेडे’ आणि ‘गुगलगाय’ झाले आहेत. मात्र प्रत्यक्षात आपण ‘माहिती’ आणि ‘ज्ञान’ यातला फरक समजून घेतला पाहिजे. त्यामुळे मराठी भाषेची गोडी ही लहानपणापासूनच लावायला हवी. तुम्हा सर्वांचे विचार घेऊन आम्ही पुढे जाणार आहोत, असे सांगत मुख्यमंत्र्यांनी पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन केले.मराठी साहित्य निर्मितीत लक्षणीय कामगिरी करणाºया पद्मगंधा प्रकाशनाच्या अरुण जाखडे यांच्या प्रकाशन संस्थेस या वेळी ‘श्री. पु. भागवत पुरस्कार’ देण्यात आला, तर ज्येष्ठ साहित्यिका अनुराधा पाटील यांना ‘विंदा करंदीकर जीवन गौरव’ पुरस्काराने गौरविण्यात आले. प्रा. आर. विवेकानंद गोपाळ यांना ‘डॉ. अशोक केळकर मराठी भाषा अभ्यासक’ म्हणून गौरविण्यात आले, तर ‘भाषा संवर्धक’ पुरस्कार अनिल गोरे यांना देण्यात आला. सर्व पुरस्कारांचे वितरण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. याशिवाय, यशवंतराव चव्हाण वाङ्मय पुरस्कारांचेही वितरण मराठी भाषा विभाग सचिव प्राजक्ता लवंगारे, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, साहित्य अकादमी विजेते सलीम मुल्ला आणि सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते या वेळी करण्यात आले.‘गोरे’ इंग्रजीला विरोध करतात हा विरोधाभासभाषा संवर्धक म्हणून पुण्याच्या अनिल गोरे यांना गौरविण्यात आले. त्यांचा उल्लेख मनोगतात करून मुख्यमंत्री म्हणाले, इंग्रजी भाषा आपल्या भाषेवर अतिक्रमण करते असे आपण नेहमीच म्हणतो. पण काळाचा महिमा पाहा की, आता ‘गोरे’ इंग्रजीला विरोध करून मराठीची कास धरत आहेत. मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यानंतर सभागृहात उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरे