शहरं
Join us  
Trending Stories
1
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
2
पाऊस पुन्हा मुक्कामी, मुसळधारेमुळे महामुंबईत धावपळ; ३० ऑक्टोबरपर्यंत मुंबईसह कोकणात मुसळधार
3
रशियावरच्या निर्बंधाने भारतीय तेल कंपन्या अडचणीत; फटका बसू नये म्हणून ONGC जाणार न्यायालयात
4
पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी सुटण्यास आणखी ३ वर्षे; गोरगाव ते ओशिवरा केबल-स्टेड पूल उभारणार
5
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
6
देशभरातील आठ हजार शाळा ‘रिकाम्या’; २० हजार शिक्षक घेताहेत फुकटचा पगार
7
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
8
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
9
सलग दुसऱ्या दिवशीही प्रसूतिगृहाचा काेंडवाडा; सहा महिला वेटिंगवर, दाटीवाटीने लावले बेड
10
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
11
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
12
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
13
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
14
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
15
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
16
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
17
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
18
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
19
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
20
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा

एनआरसी, सीएएची गरज नाही :   पुरुषोत्तम खेडेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2020 12:03 IST

वर्तमानातील सत्ताधाऱ्यांकडून अप्रत्यक्षरीत्या देशाचे तुकडे करण्याचे प्रयत्न होत असल्याची भीती मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष अ‍ॅड. पुरुषोत्तम खेडेकर यांनी येथे व्यक्त केली.

- नीलेश जोशीसिंदखेडराजा : अर्थव्यस्थेची सध्या अर्थहीन अवस्था आहे. एनआरसी, सीएची आज गरज नाही. राममंदिर, कलम ३७० असे प्रश्न सुटले आहे. त्यामुळे भाजपच्या हातून ग्रामपंचायतपासून अनेक सत्ता जात आहेत. मुळात राजकीय पक्षाच्या अंतर्गत प्रबोधन करणारी फळीच संपुष्टात आली आहे. त्यामुळे ही फळी सक्षम करण्यावर भर देणे गरजेचे आहे. या समस्या पाहता वर्तमानातील सत्ताधाऱ्यांकडून अप्रत्यक्षरीत्या देशाचे तुकडे करण्याचे प्रयत्न होत असल्याची भीती मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष अ‍ॅड. पुरुषोत्तम खेडेकर यांनी येथे व्यक्त केली.सिंदखेडराजा येथील जिजाऊ सृष्टीवर आयोजित जिजाऊ जन्मोत्सव सोहळ्यास उपस्थित जनसमुदायास मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी खासदार छत्रपती संभाजी राजे भोसले, अन्न व औषध प्रशासन विभागाचे मंत्री तथा बुलडाण्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, खासदार प्रतापराव जाधव, माजी आमदार रेखाताई खेडेकर, मराठा सेवा संघाचे पदाधिकारी गंगाधर बनबरे, जिजाऊ सृष्टीचे समन्वयक पुरुषोत्तम कडू, मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष कामाजी पवार, महासचिव मधुकर मेहेकरे, संभाजी ब्रीगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे, प्रदेशाध्यक्ष विजय घोगरे, सौरभ खेडेकर, सिने अभिनेते सयाजी शिंदे, उस्मानाबादचे खासदार ओम राजे निंबाळकर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर यांच्यासह विविध राज्यातील मराठा सेवा संघाचे पदाधिकारी व अन्य मान्यवर उपस्थित होते.एक जानेवारी रोजी नागरिकत्व दुरुस्ती कायदा प्रत्यक्षात अस्तित्वात आला; परंतु यामुळे निर्माण होणाºया समस्या पाहता हा कायदा बदलण्यासाठी प्रत्यक्षात लोकसभा व राज्यसभाच ताब्यात घेण्याची गरज आहे. त्यामुळेच राजसत्ता ही मराठा सेवा संघाच्या विचाराची असायला पाहीजे. त्यादृष्टीने आता प्रयत्न करण्याची गरज आहे. एकीकडे जाती निर्मुलनावर आपण बोलतो; पण उलटपक्षी आपणच त्याला सक्षम करत आहोत. मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करावा ही मागणी आपली पूर्वीपासूनची आहे. आदिवासी व भटक्या विमुक्तांचा विचार करता, जेथे रेशन कार्ड नाही त्यांच्या नेशनचा पत्ता नाही. त्यांना एनआरसी का लावणार असा प्रश्न उपस्थित करुन ओबीसी असल्याचे भासवत हे सत्तेत बसले आहेत. एंकदरीत परिस्थिती पाहता व्यावहारीक स्तरावर सर्वांनी या विरोधात एकत्र आल्याशिवाय काही बाबी स्पष्ट होणार नाही. त्यामुळे सर्वांनी एकत्र येण्याची गरज अ‍ॅड. खेडेकर यांनी व्यक्त केली. सोबतच नागरिकत्व देण्याचा अधिकार केंद्र सरकारला आहे. त्या अनुषंगाने त्यांनी हा कायदा केला, पण जाणीवपूर्वक त्यात धर्म घातला व समस्या निर्माण केली.‘शिवाजी महाराज के मावळे’ असं म्हणायला हव होतंभाजपने प्रसिद्ध केलेल्या ‘त्या’ पुस्तकाच्या संदर्भात बोलताना अ‍ॅड. पुरुषोत्तम खेडेकर म्हणाले की, ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ असे म्हणण्याऐवजी ‘शिवाजी महाराज के मावळे’ असे म्हटले असते तर चालले असते असे सांगत त्यांनी आपली भूमीका स्पष्ट केली.महाराष्ट्र भूषण पुरस्कार गोठवला!२०१४ नंतर महाराष्ट्र भूषण पुरस्कार जवळपास गोठवल्या सारखा आहे. अलीकडील काळात हा पुरस्कारच दिल्या गेलेला नाही. येत्या १९ फेब्रुबारी रोजी हा पुरस्कार शिवनेरी गडावरून दिला जावा. प्रसंगी याबाबत सुधारणा करून मृत पावलेलया व्यक्तींनी तो देण्याबाबत सुधारणा केली जावी. प्रसंगी तो प्रबोधनकार ठाकरे यांना दिल्यासही हरकत नसावी, असे अ‍ॅड. पुरुषोत्तम खेडेकर म्हणाले. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सकारत्मक माणूस आहेत. जिजाऊ सृष्टीच्या विकासाठी त्यांच्याकडून अपेक्षा आहेत, असेही ते पुढे म्हणाले.शिवस्मारक जमीनीवरच व्हावे!मराठा सेवा संघाची पूर्वीपासून शिवस्मारक जमिनीवर व्हावे, अशी भूमीका आहे व ते कमीत कमी कालावधीत पूर्णत्वास जावे, असेही अ‍ॅड. खेडेकर यांनी आपल्या भाषणात सांगितले. दरम्यान, या स्मारकासाठी राजभवन परिसराची जागा योग्य असून, महालक्ष्मी रेस फोर्स व डाक यार्ड परिसरातील समुद्रालगत ते व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.संघटना तरुणावस्थेत हवी!मराठा सेवा संघाच्या अधिक मजबुतीसाठी आगामी काळात प्रयत्न होणे गरजेचे आहे. संघटना ही सातत्याने तरुणावस्थेत हवी. त्यासाठी सर्वांनी एकत्रित येऊन संघटनात्मक बांधणीसाठी झोकून द्यावे, अशी अपेक्षाही त्यांनी शेवटी व्यक्त केली. 

टॅग्स :Jijau Janmotsavजिजाऊ जन्मोस्तवjijau shrusti, sindhaked rajaजिजाऊ सृष्टी, सिंदखेड राजाpurushottam khedekarपुरुषोत्तम खेडेकरNational Register of Citizensराष्ट्रीय नागरिकत्व नोंदयादी