शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईतील एकही पूल धोकादायक नाही

By admin | Updated: August 6, 2016 01:39 IST

कोकणातील महाड येथील भीषण दुर्घटनेमुळे मुंबईतील पुलांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

मुंबई : कोकणातील महाड येथील भीषण दुर्घटनेमुळे मुंबईतील पुलांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. परंतु मुंबईतील एकही पूल धोकादायक नसल्याचा दावा महापालिकेने शुक्रवारी केला. त्याचवेळी या पुलांच्या स्थैर्याची मात्र चाचपणी करण्यात येणार असल्याचे महापालिकेकडून स्पष्ट करण्यात आले, याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी येणार आहे.पुलांचे आयुष्य संपले आहे. त्यामुळे मुंबईतील ३४ पूल धोकादायक ठरविण्यात आले होते. या पुलांच्या दुरुस्तीसाठी सल्लागार नेमण्यात येणार होता. मात्र २०१४ सालापासून कारवाई झाली नाही. महाडमधील दुर्घटनेनंतर महापालिकेची झोप उडाली आहे. त्यामुळे लपवाछपवीचा कारभार सुरू असून, ब्रिटिशकालीन पुलांची खबरही प्रशासनाला नाही. याउलट एकही पूल धोकादायक नाही, असा दावा पालिकेने केला आहे. दरम्यान, पुलांसाठी सल्लागार नेमण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. या पुलांचे स्थैर्य लवकरच तपासण्यात येणार आहे, असे अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख यांनी सांगितले. शहरातील पुलांसाठी सल्लागार म्हणून पी.डी. देसाई असोसिएट्सची नियुक्ती करण्यात येणार आहे. त्यांना ६३ लाख १८ हजार रुपये देण्यात येणार आहेत. पश्चिम उपनगरांतील पुलांसाठी ‘सी. व्ही. कांड’ यांची सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात येणार आहे. त्यांना १ कोटी ५ लाख देण्यात येणार आहेत. (प्रतिनिधी)