शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

कितीही नेत्यांना भाजपमध्ये घेतले तरी शक्तीपीठ महामार्ग रद्द होईपर्यंत लढा कायम : राजू शेट्टी

By संदीप आडनाईक | Updated: April 17, 2025 16:15 IST

कोल्हापूर : कितीही नेत्यांना भाजपमध्ये घेतले तरी शेतकऱ्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न असलेला शक्तीपीठ महामार्ग रद्द होईपर्यंत त्याविरोधातील लढा चालूच ठेवणार ...

कोल्हापूर : कितीही नेत्यांना भाजपमध्ये घेतले तरी शेतकऱ्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न असलेला शक्तीपीठ महामार्ग रद्द होईपर्यंत त्याविरोधातील लढा चालूच ठेवणार असा निर्धार माजी खासदार राजू शेट्टी यांनी गुरुवारी केला.इंडिया आघाडीच्या मूक मोर्चामध्ये सहभागी झाल्यानंतर राजू शेट्टी यांनी महापालिकेत पत्रकारांशी संवाद साधला. शक्तीपीठ महामार्गासाठी ८६ हजार कोटी रुपये खर्च करणे म्हणजे सरकारचा चिंधीचोरपणा आहे. लाडक्या बहिणींसाठी पैसे नाहीत, ठिबक सिंचनचे तीन तीन वर्षांचे अनुदान थकित आहे, विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचे अनेक वर्षांचे पैसे दिलेले नाहीत, अनेक शासकीय योजनांच्या निधीला कात्री लावलेली असताना कोणाची मागणी नसताना हा शक्तीपीठ महामार्ग करण्याचा सरकारने घाट घातलेला आहे. '५० हजार कोटी हडप करायचे' ३० हजार कोटीत रस्ता करायचा आणि वरचे ५० हजार कोटी हडप करायचे हे होउ देणार नाही. शक्तीपीठ महामार्ग प्रकरणात अनेक राजकीय नेत्यांचा हात आहे. त्यांना यातून पैसा कमवायचा आहे, ठेकेदारांना पोसण्यासाठी खासगी क्षेत्रातील अनेकांशी हितसंबंध जोपासायचे आहेत असा आरोपही शेट्टी यांनी यावेळी केला.शेतकऱ्याच्या अस्तित्वाचा प्रश्न हा केवळ कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याचा प्रश्न नाही, शक्तीपीठ महामार्गामुळे बाधित होणाऱ्या १२ जिल्ह्यात मी दौरा करत आहे. यवतमाळपासून प्रत्येक जिल्ह्यात याबाबत मी बैठका घेत कोल्हापुरात आलो आहे. सिंधुदुर्गातही जाणार आहे. २७ हजार एकरातील शेतकऱ्याच्या अस्तित्वाचा हा प्रश्न आहे.

..त्यामुळे पर्यावरणाचाही प्रश्न

माणगाव ते पट्टणकोडोली असा पूल झाल्यास बिंदू चौकात पूर आल्याशिवाय राहणार नाही. या महामार्गामुळे कोल्हापूरचे अस्तित्व नाहीसे होईल अशी भीती आहे. याशिवाय इको सेन्सेटिव्ह झोनमधून हा रस्ता जात आहे, त्यामुळे पर्यावरणाचाही प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यामुळे हा महामार्ग होऊ देणार नाही, असे शेट्टी म्हणाले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरhighwayमहामार्गRaju Shettyराजू शेट्टीFarmerशेतकरीGovernmentसरकारShaktipeeth Mahamargशक्तिपीठ महामार्ग