शहरं
Join us  
Trending Stories
1
डॉक्टर तरुणी रात्री १.३० वाजता हॉटेलमध्ये आली होती; सीसीटीव्ही फुटेज पहिल्यांदाच समोर आले
2
मोठी बातमी! भारताकडे निघालेला रशियन तेलाचा टँकर समुद्रातून अचानक माघारी वळला; रिफायनरींची चिंता वाढली...
3
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासोबत दिसल्या स्क्वॉड्रन लीडर शिवांगी सिंग! 'त्या' एका फोटोने पाकिस्तानचा होईल जळफळाट
4
आजोबांच्या संपत्तीवर नातवंडांचा जन्मसिद्ध हक्क नाही; मुंबई हायकोर्टाचा मोठा निर्णय, प्रकरण काय?
5
Mutual Funds मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांचा होणार फायदा; सेबीचा नवा प्रस्ताव, गुंतवणूकदारांना काय मिळणार?
6
भारताचा हिटमॅन 'जगात भारी'! वनडेमध्ये रोहित शर्मा अव्वल, गिलला मागे टाकत रचला विश्वविक्रम
7
पाकिस्तान करणार हमासचा खात्मा? अमेरिकेची 'चलाख' खेळी; असीम मुनीर २० हजार सैन्य उतरवणार
8
इथं १ ग्रॅम घेताना घाम फुटतोय! मग ७ महिन्यात ६४००० किलो सोनं भारतात कोणी आणलं?
9
फक्त १० वर्षांच्या फरकाने तुमच्या SIP रिटर्न्समध्ये ४७ लाखांचा मोठा फरक; तोटा होण्याआधी गणित पाहा
10
Viral News: रस्त्यावरून खरेदी केले जुने बूट; ब्रँडचं नाव पाहिलं आणि किंमत तपासली; महिला झाली शॉक!
11
Guru Upasna: गुरु उच्च राशीत असेल तर उपासना कोणती करावी किंवा कशी वाढवावी? वाचा 
12
Shreyas Iyer : श्रेयस लवकर बरा व्हावा! सूर्याच्या आईची देवासमोर प्रार्थना; व्हिडिओ व्हायरल
13
जो तो एआयच्या मागे लागलाय...! इंटेलच्या CEO नी यासाठी राजीनामा दिला; आता ₹९१५ कोटी लावून...
14
भारत-अमेरिका टॅरिफ वॉर थांबणार, US सोबत खास डील होणार? ट्रम्प यांचे मोठे संकेत
15
सरकार पुन्हा विकणार LIC चे शेअर्स! केव्हा आणि कसं? जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
16
Indian Currency Facts : भारतीय चलनी नोटांच्या मध्यभागी खरंच चांदीची तार असते का? जाणून घ्या...
17
PPF Vs NPS Investment: पैशांची गुंतवणूक करायची आहे, एनपीएस निवडू की पीपीएफ? नक्की काय करावं
18
शाब्बास पोरा! ना कॉलेज, ना कोचिंग... UPSC सह क्रॅक केल्या १२ सरकारी नोकऱ्या, झाला IPS
19
"बंगल्यात झालेल्या चोरीतून सीडी, पेनड्राईव्ह, कागदपत्रे लांबवली", एकनाथ खडसेंचा मोठा गौप्यस्फोट
20
भाभा अणुसंशोधन केंद्रात हेरगिरीचा डाव, शास्त्रज्ञ बनून फिरत होते आदिल आणि अख्तर, असं फुटलं बिंग 

कितीही नेत्यांना भाजपमध्ये घेतले तरी शक्तीपीठ महामार्ग रद्द होईपर्यंत लढा कायम : राजू शेट्टी

By संदीप आडनाईक | Updated: April 17, 2025 16:15 IST

कोल्हापूर : कितीही नेत्यांना भाजपमध्ये घेतले तरी शेतकऱ्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न असलेला शक्तीपीठ महामार्ग रद्द होईपर्यंत त्याविरोधातील लढा चालूच ठेवणार ...

कोल्हापूर : कितीही नेत्यांना भाजपमध्ये घेतले तरी शेतकऱ्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न असलेला शक्तीपीठ महामार्ग रद्द होईपर्यंत त्याविरोधातील लढा चालूच ठेवणार असा निर्धार माजी खासदार राजू शेट्टी यांनी गुरुवारी केला.इंडिया आघाडीच्या मूक मोर्चामध्ये सहभागी झाल्यानंतर राजू शेट्टी यांनी महापालिकेत पत्रकारांशी संवाद साधला. शक्तीपीठ महामार्गासाठी ८६ हजार कोटी रुपये खर्च करणे म्हणजे सरकारचा चिंधीचोरपणा आहे. लाडक्या बहिणींसाठी पैसे नाहीत, ठिबक सिंचनचे तीन तीन वर्षांचे अनुदान थकित आहे, विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचे अनेक वर्षांचे पैसे दिलेले नाहीत, अनेक शासकीय योजनांच्या निधीला कात्री लावलेली असताना कोणाची मागणी नसताना हा शक्तीपीठ महामार्ग करण्याचा सरकारने घाट घातलेला आहे. '५० हजार कोटी हडप करायचे' ३० हजार कोटीत रस्ता करायचा आणि वरचे ५० हजार कोटी हडप करायचे हे होउ देणार नाही. शक्तीपीठ महामार्ग प्रकरणात अनेक राजकीय नेत्यांचा हात आहे. त्यांना यातून पैसा कमवायचा आहे, ठेकेदारांना पोसण्यासाठी खासगी क्षेत्रातील अनेकांशी हितसंबंध जोपासायचे आहेत असा आरोपही शेट्टी यांनी यावेळी केला.शेतकऱ्याच्या अस्तित्वाचा प्रश्न हा केवळ कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याचा प्रश्न नाही, शक्तीपीठ महामार्गामुळे बाधित होणाऱ्या १२ जिल्ह्यात मी दौरा करत आहे. यवतमाळपासून प्रत्येक जिल्ह्यात याबाबत मी बैठका घेत कोल्हापुरात आलो आहे. सिंधुदुर्गातही जाणार आहे. २७ हजार एकरातील शेतकऱ्याच्या अस्तित्वाचा हा प्रश्न आहे.

..त्यामुळे पर्यावरणाचाही प्रश्न

माणगाव ते पट्टणकोडोली असा पूल झाल्यास बिंदू चौकात पूर आल्याशिवाय राहणार नाही. या महामार्गामुळे कोल्हापूरचे अस्तित्व नाहीसे होईल अशी भीती आहे. याशिवाय इको सेन्सेटिव्ह झोनमधून हा रस्ता जात आहे, त्यामुळे पर्यावरणाचाही प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यामुळे हा महामार्ग होऊ देणार नाही, असे शेट्टी म्हणाले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरhighwayमहामार्गRaju Shettyराजू शेट्टीFarmerशेतकरीGovernmentसरकारShaktipeeth Mahamargशक्तिपीठ महामार्ग