शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
2
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
3
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
4
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
5
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
6
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
7
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
8
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
9
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
10
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
11
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
12
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
13
पहलगाम हल्ल्यानंतर भारतात होणारी मोठी स्पर्धा पुढे ढकलली
14
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
15
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
16
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
17
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
18
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
19
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
20
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   

कितीही नेत्यांना भाजपमध्ये घेतले तरी शक्तीपीठ महामार्ग रद्द होईपर्यंत लढा कायम : राजू शेट्टी

By संदीप आडनाईक | Updated: April 17, 2025 16:15 IST

कोल्हापूर : कितीही नेत्यांना भाजपमध्ये घेतले तरी शेतकऱ्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न असलेला शक्तीपीठ महामार्ग रद्द होईपर्यंत त्याविरोधातील लढा चालूच ठेवणार ...

कोल्हापूर : कितीही नेत्यांना भाजपमध्ये घेतले तरी शेतकऱ्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न असलेला शक्तीपीठ महामार्ग रद्द होईपर्यंत त्याविरोधातील लढा चालूच ठेवणार असा निर्धार माजी खासदार राजू शेट्टी यांनी गुरुवारी केला.इंडिया आघाडीच्या मूक मोर्चामध्ये सहभागी झाल्यानंतर राजू शेट्टी यांनी महापालिकेत पत्रकारांशी संवाद साधला. शक्तीपीठ महामार्गासाठी ८६ हजार कोटी रुपये खर्च करणे म्हणजे सरकारचा चिंधीचोरपणा आहे. लाडक्या बहिणींसाठी पैसे नाहीत, ठिबक सिंचनचे तीन तीन वर्षांचे अनुदान थकित आहे, विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचे अनेक वर्षांचे पैसे दिलेले नाहीत, अनेक शासकीय योजनांच्या निधीला कात्री लावलेली असताना कोणाची मागणी नसताना हा शक्तीपीठ महामार्ग करण्याचा सरकारने घाट घातलेला आहे. '५० हजार कोटी हडप करायचे' ३० हजार कोटीत रस्ता करायचा आणि वरचे ५० हजार कोटी हडप करायचे हे होउ देणार नाही. शक्तीपीठ महामार्ग प्रकरणात अनेक राजकीय नेत्यांचा हात आहे. त्यांना यातून पैसा कमवायचा आहे, ठेकेदारांना पोसण्यासाठी खासगी क्षेत्रातील अनेकांशी हितसंबंध जोपासायचे आहेत असा आरोपही शेट्टी यांनी यावेळी केला.शेतकऱ्याच्या अस्तित्वाचा प्रश्न हा केवळ कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याचा प्रश्न नाही, शक्तीपीठ महामार्गामुळे बाधित होणाऱ्या १२ जिल्ह्यात मी दौरा करत आहे. यवतमाळपासून प्रत्येक जिल्ह्यात याबाबत मी बैठका घेत कोल्हापुरात आलो आहे. सिंधुदुर्गातही जाणार आहे. २७ हजार एकरातील शेतकऱ्याच्या अस्तित्वाचा हा प्रश्न आहे.

..त्यामुळे पर्यावरणाचाही प्रश्न

माणगाव ते पट्टणकोडोली असा पूल झाल्यास बिंदू चौकात पूर आल्याशिवाय राहणार नाही. या महामार्गामुळे कोल्हापूरचे अस्तित्व नाहीसे होईल अशी भीती आहे. याशिवाय इको सेन्सेटिव्ह झोनमधून हा रस्ता जात आहे, त्यामुळे पर्यावरणाचाही प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यामुळे हा महामार्ग होऊ देणार नाही, असे शेट्टी म्हणाले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरhighwayमहामार्गRaju Shettyराजू शेट्टीFarmerशेतकरीGovernmentसरकारShaktipeeth Mahamargशक्तिपीठ महामार्ग