शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला 'दिलासा' नाहीच

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2019 10:54 IST

मागील सहा वर्षांमध्ये १२३४ शेतक-यांनी आत्महत्या केल्याची आकडेवारी प्रशासनाकडे आहे.

- प्रभात बुडूख

बीड: जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती तसेच नापिकी या कारणाला कंटाळून जिल्ह्यातील शेतकरी आपली जीवनयात्रा संपवतात. आत्महत्येचा हा आकडा कमी होण्याऐवजी वाढत असल्याचे चित्र आजघडीला दिसत आहे. हे प्रशासनासोबतच समाजाचे अपयश आहे. बीड जिल्हा हा कमी अवर्षणाचा जिल्हा आहे. दर एक वर्षाआड जिल्ह्यात भीषण दुष्काळी परिस्थिती असते. दुष्काळामुळे शेतकऱ्यांची कायम हाल होतात. पिकांना भाव नसल्यामुळे घेतलेले कर्ज, कौटुंबिक गरजा भागविणे देखील जिकिरीचे होते. याच विवेंचेनतून जिल्ह्यात मागील काही वर्षांपासून शेतकरी आत्महत्येचे प्रमाण प्रत्येक वर्षात वाढत असल्याचे दिसून येत आहे.

तर मागील सहा वर्षांमध्ये १२३४ शेतक-यांनी आत्महत्या केल्याची आकडेवारी प्रशासनाकडे आहे. यावर्षी डिसेंबर महिन्याच्या आजच्या तारखेपर्यंत २१६ शेतकऱ्यांनी नापिकी, कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. हाच आकडा मागील डिसेंबरअखेर १८७ इतका होता. यामध्ये वाढ झाली आहे. ही वाढ चिंतेची बाब असून, शेतकरी वाचला तर देश वाचेल या भावनेतून ही आत्महत्या रोखण्यासाठी प्रशासन तसेच समाजातून सर्वानी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे मत शेतकरी नेत्यांमधून व्यक्त केले जात आहे.

प्रशासनाकडून आत्महत्याग्रस्त शेतक-यांना मदत करण्यासाठी गेल्यावर्षी माजी आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांच्या संकल्पनेतून 'उभारी' हा प्रकल्प राबविण्यात आला होता. यामध्ये आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला १ लाख रुपये शासकीय मदतीसह कृषी, महसूल, पंचायत समिती, जिल्हा परिषद यासह इतर विभागातील योजनांचा लाभ देण्यात येत होते. यासाठी मर्यादित कालावधीची मोहीमही राबवण्यात आली. यावेळी बहुंताश कुटुंबाना त्यांच्या घरी जाऊन अधिकाऱ्यांनी विविध योजनांचे लाभ दिले होते. परंतु भापकर हे सेवानिवृत्त झाले आणि त्यानंतर प्रशासनाकडून योजनेला ब्रेक लागला. जवळपास एक वर्षांपासून या योजनेच्या माध्यमातून एकही लाभ आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाना दिलेला नाही. पुन्हा अशा प्रकारचा उपक्रम राबवून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाना योजनांचा लाभ द्यावा, अशी मागणी होत आहे.

शेतकरी विरोधी कायदे हटवावे 

शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी शेतीमालावरील निर्यात बंदी उठवली गेली पाहिजे. शेतकऱ्यांवर असलेले सर्व प्रकारचे कर्ज शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे झालेले आहे. शेती कर्ज, सर्व प्रकारचे कर्ज मुक्त करुन सातबारा कोरा करावा. नवीन कर्ज देताना रेडीरेकनरप्रमाणे दिले जावे. भारतामधील शेतकरी विरोधी नवव्या परिशिष्टातील २८४ कायदे रद्द करावेत. या गोष्टी अंमलात आणल्या तर देशातील शेतकरी हा स्वाभिमानाने जगू शकेल. जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्या वाढण्याचे कारण मुख्य पीक कापूस हे आहे. कापूस पिकाला भाव स्थिर राहत नसल्याने बहुतांश वेळा शेतकरी तोट्यात जातो. ज्या प्रमाणात कापसापासून होणाऱ्या उत्पादनाच्या किंमतीमध्ये दहा वर्षात वाढ झाली त्या तुलनेत शेतकऱ्याला मिळणाऱ्या किंमतीमध्ये झालेली नाही. लागवड खर्च मात्र उत्पादनापेक्षा जास्त झाला आहे. त्यामुळे योग्य भाव कापूस पिकाला मिळाला तर जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्या रोखण्यास यश येऊ शकते, अशी प्रतिक्रिया शेतकरी नेते कालिदास आपेट यांनी दिली.

जिल्हाधिकारी बदलताच योजना बासनात

  • बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डे यांनी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांसाठी 'मिशन दिलासा उपक्रम' राबवला होता. यामध्ये त्यांनी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांची संपूर्ण माहिती तालुकास्तरावरुन मागवली होती. यामध्ये आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यावर किती कर्ज होते, ते किती दिवसापासून होते, कर्ज माफ झाले आहे का, सावकाराकडून कर्ज घेतले होते का, कर्ज घेण्याची कारणे कोणती, शेतीतून किती उत्पादन होते, उत्पनाचा मुख्य स्त्रोत कोणता, महिला पुरुषांपेक्षा जास्त काम शेतात करतात का, मुलांचे शिक्षण कोठे सुरु आहे यासह विविध ४0 प्रश्नांचा फॉर्मच्या माध्यमातून माहिती मागवली होती.

 

  • ही माहिती संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्याने घरी जाऊन भरणे अपेक्षित होते, अशा सूचना जिल्हाधिकान्यांनी दिल्या होत्या. ही माहिती १५ दिवसात जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करण्याचे आदेश दिले होते. मात्र, हे आदेश धाब्यावर बसवत एकाही उपविभागीय अधिकारी किंवा तहसीलदाराने मिशन दिलासा उपक्रमास प्राधान्य दिले नाही. याची माहिती घेण्याची तसदी देखील घेतली नसल्याचे सूत्रांची माहिती आहे. अद्यापपर्यंत या योजनेसंदर्भात कसलीही माहिती उपलब्ध करुन देण्यात आलेली नाही. त्यामुळे जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला हरताळ फासण्यात आला आहे.

या योजनांचा दिला कमी लाभ

  • आत्महत्या शेतकरी कुटुंबियांना आरोग्य योजना, विहीर, शेततळे, शुभमंगल योजना, संजय गांधी निराधार योजना, कर्ज मंजुरी, घरकुल या योजनांचा कमी प्रमाणात लाभ दिल्याचे दिसून येते. जनधन बँक खाते, गॅस जोडणी, अन्न सुरक्षा योजना आदी योजनांचा लाभ मात्र मोठ्या प्रमाणात दिला आहे. शेतकरी कुटुंबियांकडून विविध योजनांची मागणी केली जाते. यावेळी सहानुभूतीपूर्वक अधिकारी व कर्मचारी यांनी याचा विचार करुन तात्काळ ती संबंधित पीडित कुटुंबाला देण्यासाठी प्रयल करणे गरजेचे असल्याचे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पक्ष प्रमुख कुलदीप करपे यांनी व्यक्त केले.