शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला 'दिलासा' नाहीच

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2019 10:54 IST

मागील सहा वर्षांमध्ये १२३४ शेतक-यांनी आत्महत्या केल्याची आकडेवारी प्रशासनाकडे आहे.

- प्रभात बुडूख

बीड: जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती तसेच नापिकी या कारणाला कंटाळून जिल्ह्यातील शेतकरी आपली जीवनयात्रा संपवतात. आत्महत्येचा हा आकडा कमी होण्याऐवजी वाढत असल्याचे चित्र आजघडीला दिसत आहे. हे प्रशासनासोबतच समाजाचे अपयश आहे. बीड जिल्हा हा कमी अवर्षणाचा जिल्हा आहे. दर एक वर्षाआड जिल्ह्यात भीषण दुष्काळी परिस्थिती असते. दुष्काळामुळे शेतकऱ्यांची कायम हाल होतात. पिकांना भाव नसल्यामुळे घेतलेले कर्ज, कौटुंबिक गरजा भागविणे देखील जिकिरीचे होते. याच विवेंचेनतून जिल्ह्यात मागील काही वर्षांपासून शेतकरी आत्महत्येचे प्रमाण प्रत्येक वर्षात वाढत असल्याचे दिसून येत आहे.

तर मागील सहा वर्षांमध्ये १२३४ शेतक-यांनी आत्महत्या केल्याची आकडेवारी प्रशासनाकडे आहे. यावर्षी डिसेंबर महिन्याच्या आजच्या तारखेपर्यंत २१६ शेतकऱ्यांनी नापिकी, कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. हाच आकडा मागील डिसेंबरअखेर १८७ इतका होता. यामध्ये वाढ झाली आहे. ही वाढ चिंतेची बाब असून, शेतकरी वाचला तर देश वाचेल या भावनेतून ही आत्महत्या रोखण्यासाठी प्रशासन तसेच समाजातून सर्वानी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे मत शेतकरी नेत्यांमधून व्यक्त केले जात आहे.

प्रशासनाकडून आत्महत्याग्रस्त शेतक-यांना मदत करण्यासाठी गेल्यावर्षी माजी आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांच्या संकल्पनेतून 'उभारी' हा प्रकल्प राबविण्यात आला होता. यामध्ये आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला १ लाख रुपये शासकीय मदतीसह कृषी, महसूल, पंचायत समिती, जिल्हा परिषद यासह इतर विभागातील योजनांचा लाभ देण्यात येत होते. यासाठी मर्यादित कालावधीची मोहीमही राबवण्यात आली. यावेळी बहुंताश कुटुंबाना त्यांच्या घरी जाऊन अधिकाऱ्यांनी विविध योजनांचे लाभ दिले होते. परंतु भापकर हे सेवानिवृत्त झाले आणि त्यानंतर प्रशासनाकडून योजनेला ब्रेक लागला. जवळपास एक वर्षांपासून या योजनेच्या माध्यमातून एकही लाभ आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाना दिलेला नाही. पुन्हा अशा प्रकारचा उपक्रम राबवून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाना योजनांचा लाभ द्यावा, अशी मागणी होत आहे.

शेतकरी विरोधी कायदे हटवावे 

शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी शेतीमालावरील निर्यात बंदी उठवली गेली पाहिजे. शेतकऱ्यांवर असलेले सर्व प्रकारचे कर्ज शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे झालेले आहे. शेती कर्ज, सर्व प्रकारचे कर्ज मुक्त करुन सातबारा कोरा करावा. नवीन कर्ज देताना रेडीरेकनरप्रमाणे दिले जावे. भारतामधील शेतकरी विरोधी नवव्या परिशिष्टातील २८४ कायदे रद्द करावेत. या गोष्टी अंमलात आणल्या तर देशातील शेतकरी हा स्वाभिमानाने जगू शकेल. जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्या वाढण्याचे कारण मुख्य पीक कापूस हे आहे. कापूस पिकाला भाव स्थिर राहत नसल्याने बहुतांश वेळा शेतकरी तोट्यात जातो. ज्या प्रमाणात कापसापासून होणाऱ्या उत्पादनाच्या किंमतीमध्ये दहा वर्षात वाढ झाली त्या तुलनेत शेतकऱ्याला मिळणाऱ्या किंमतीमध्ये झालेली नाही. लागवड खर्च मात्र उत्पादनापेक्षा जास्त झाला आहे. त्यामुळे योग्य भाव कापूस पिकाला मिळाला तर जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्या रोखण्यास यश येऊ शकते, अशी प्रतिक्रिया शेतकरी नेते कालिदास आपेट यांनी दिली.

जिल्हाधिकारी बदलताच योजना बासनात

  • बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डे यांनी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांसाठी 'मिशन दिलासा उपक्रम' राबवला होता. यामध्ये त्यांनी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांची संपूर्ण माहिती तालुकास्तरावरुन मागवली होती. यामध्ये आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यावर किती कर्ज होते, ते किती दिवसापासून होते, कर्ज माफ झाले आहे का, सावकाराकडून कर्ज घेतले होते का, कर्ज घेण्याची कारणे कोणती, शेतीतून किती उत्पादन होते, उत्पनाचा मुख्य स्त्रोत कोणता, महिला पुरुषांपेक्षा जास्त काम शेतात करतात का, मुलांचे शिक्षण कोठे सुरु आहे यासह विविध ४0 प्रश्नांचा फॉर्मच्या माध्यमातून माहिती मागवली होती.

 

  • ही माहिती संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्याने घरी जाऊन भरणे अपेक्षित होते, अशा सूचना जिल्हाधिकान्यांनी दिल्या होत्या. ही माहिती १५ दिवसात जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करण्याचे आदेश दिले होते. मात्र, हे आदेश धाब्यावर बसवत एकाही उपविभागीय अधिकारी किंवा तहसीलदाराने मिशन दिलासा उपक्रमास प्राधान्य दिले नाही. याची माहिती घेण्याची तसदी देखील घेतली नसल्याचे सूत्रांची माहिती आहे. अद्यापपर्यंत या योजनेसंदर्भात कसलीही माहिती उपलब्ध करुन देण्यात आलेली नाही. त्यामुळे जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला हरताळ फासण्यात आला आहे.

या योजनांचा दिला कमी लाभ

  • आत्महत्या शेतकरी कुटुंबियांना आरोग्य योजना, विहीर, शेततळे, शुभमंगल योजना, संजय गांधी निराधार योजना, कर्ज मंजुरी, घरकुल या योजनांचा कमी प्रमाणात लाभ दिल्याचे दिसून येते. जनधन बँक खाते, गॅस जोडणी, अन्न सुरक्षा योजना आदी योजनांचा लाभ मात्र मोठ्या प्रमाणात दिला आहे. शेतकरी कुटुंबियांकडून विविध योजनांची मागणी केली जाते. यावेळी सहानुभूतीपूर्वक अधिकारी व कर्मचारी यांनी याचा विचार करुन तात्काळ ती संबंधित पीडित कुटुंबाला देण्यासाठी प्रयल करणे गरजेचे असल्याचे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पक्ष प्रमुख कुलदीप करपे यांनी व्यक्त केले.