शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
5
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
6
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
7
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
8
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
9
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
10
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
11
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
12
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
13
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
14
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
15
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
16
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
17
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
18
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
19
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
20
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..

‘उष्माघाता’चे राजकारण नको, आप्पासाहेबांचे भावनिक आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2023 07:51 IST

Appasaheb Dharmadhikari: महाराष्ट्रभूषण पुरस्कार सोहळ्यावेळी उष्माघाताने काही श्री सदस्यांना त्रास झाला आणि त्यातील काहींचा दुर्दैवाने मृत्यू झाला. ही घटना माझ्यासाठी अत्यंत क्लेशदायक असल्याचे ज्येष्ठ निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी म्हटले आहे.

अलिबाग (जि. रायगड) : महाराष्ट्रभूषण पुरस्कार सोहळ्यावेळी उष्माघाताने काही श्री सदस्यांना त्रास झाला आणि त्यातील काहींचा दुर्दैवाने मृत्यू झाला. ही घटना माझ्यासाठी अत्यंत क्लेशदायक असल्याचे ज्येष्ठ निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी म्हटले आहे. या दुर्दैवी  घटनेबाबत आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी पत्राद्वारे शोक व्यक्त केला आहे. दुर्घटनेचे कोणत्याही पद्धतीने राजकारण होऊ नये, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.

सोमवारी जारी केलेल्या पत्रकात आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्रभूषण पुरस्कार सोहळ्यासाठी खारघर येथे आलेले सर्व श्री सदस्य हे माझ्या कुटुंबाचे सदस्य आहेत. श्री सदस्यांचा हा परिवार देश-विदेशात पसरला आहे. या पुरस्कार सोहळ्यावेळी उष्माघाताने काहींना त्रास झाला आणि त्यातील काहींचा दुर्दैवाने मृत्यू झाला. ही घटना माझ्यासाठी अत्यंत क्लेशदायक आहे. माझ्या कुटुंबातीलच सदस्यांवर कोसळलेली ही आपत्ती आहे. आपल्याच कुटुंबातील लोकांवर घाला येण्याच्या या घटनेने मी व्यथित आहे. माझे हे दुःख शब्दांत व्यक्त करण्यापलीकडचे आहे. मृत्यू झालेल्या या सदस्यांच्या कुटुंबीयांची आणि माझी वेदना सारखीच आहे. श्री सदस्य परिवाराची एकमेकांच्या सोबत राहण्याची पिढ्यापिढ्यांची परंपरा आहे. त्यानुसार आम्ही सारेजण या आपद्ग्रस्तांसोबत कायम आहोत. =

यातील मृतांना सद्गती लाभो. झाला प्रकार दुर्दैवीच होता. त्याचे कोणत्याही पद्धतीने राजकारण होऊ नये,   अशी आमची अपेक्षा आहे, असेही त्यांनी पत्रात म्हटले आहे.

दुर्घटनेतील बळींची संख्या १३; दहा रुग्णांवर उपचारपनवेल (जि. रायगड) : खारघरमधील महाराष्ट्रभूषण पुरस्कार सोहळ्यावेळी उष्माघाताने मृत्युमुखी पडलेल्या श्री सदस्यांची संख्या १३ झाली आहे. दुर्घटनेतील १० रुग्ण वेगवेगळ्या रुग्णालयांत उपचार घेत आहेत. श्री सदस्यांचे पार्थिव नातेवाइकांना सुपुर्द करण्यात आले आहेत.मृतांमध्ये महेश नारायण गायकर (४२, वडाळा, मुंबई), जयश्री जगन्नाथ पाटील (५४, म्हसळा, रायगड), मंजूषा कृष्णा भोंबडे (५१, गिरगाव, मुंबई), स्वप्निल सदाशिव केणी (३०, शिरसाट बामन पाडा, विरार), तुळशीराम भाऊ वांगड (५८, जव्हार, पालघर), कलावती सिद्धराम वायचळ (४६, सोलापूर), भीमा कृष्णा साळवी (५८, कळवा, ठाणे), सविता संजय पवार (४२, मुंबई), पुष्पा मदन गायकर (६४, कळवा, ठाणे), वंदना जगन्नाथ पाटील (६२, करंजाडे, पनवेल), मीनाक्षी मिस्त्री (५८, वसई), गुलाब बबन पाटील (५६, विरार), विनायक हळदणकर (५५, कल्याण) यांचा समावेश आहे. 

टॅग्स :Raigadरायगड