शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

१८ वर्षे ना अनुदान, ना पगार, कर्मचाऱ्यांची दैना; अनुसूचित जातींच्या निवासी शाळांची व्यथा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2020 06:50 IST

१६-१८ वर्षांपासून पगार न घेता आम्ही काम करतोय, अनुदानाशिवाय संस्था चालवताना आम्ही संपत्ती गहाण ठेवली, असा टाहो अनुक्रमे कर्मचारी आणि संस्थाचालकांनी फोडला.

मुंबई : अनुसूचित जातींच्या मुलांसाठी असलेल्या १६५ निवासी शाळांचे संस्थाचालक कोट्यवधी रुपयांच्या अनुदानासाठी सामाजिक न्याय विभागावर प्रचंड दबाव आणत असल्याचे वृत्त लोकमतने शुक्रवारच्या अंकात दिल्यानंतर अस्वस्थ संस्थाचालक आणि शिक्षक/ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी त्यांची व्यथा मांडली. १६-१८ वर्षांपासून पगार न घेता आम्ही काम करतोय, अनुदानाशिवाय संस्था चालवताना आम्ही संपत्ती गहाण ठेवली, असा टाहो अनुक्रमे कर्मचारी आणि संस्थाचालकांनी फोडला.‘आमच्यापैकी काही शाळा बोगस असतील पण इतकी वर्षे प्रामाणिकपणे आम्ही शाळा चालवित असताना सरकार एक पैशाचेही अनुदान देणार नसेल तर आमच्याकडे आत्महत्या करण्याशिवाय कोणताही पर्याय नाही’, अशी व्यथा त्यांनी बोलून दाखविली. गेल्या १३-१४ वर्षांत आमच्या शाळांची जिल्हाधिकाºयांपासून सामजिक न्याय विभागाच्या अधिकाºयांनी सात-आठ वेळा तपासणी केली, अहवाल दिले. शेवटची तपासणी यावर्षी जानेवारी महिन्यात झाली. आता अजून किती तपासण्या सरकार करणार आहात, असा सवाल त्यांनी केला.आतापर्यंतच्या तपासणी तसेच छाननीत बोगस शाळा गळाल्या आणि १६५ शाळा अनुदानास पात्र ठरल्या होत्या आणि त्या आधारेच आधीच्या फडणवीस सरकारने या शाळांना २० टक्के अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता, असे संस्थाचालकांचे म्हणणे आहे.या १६५ संस्थांना अनुदान देण्याबाबतचा कुठलाही प्रस्ताव तूर्त शासनासमोर नाही. मात्र या अनुदानाबाबतचा विषय विचारार्थ येईल तेव्हा किती शाळा अस्तित्वात आहेत, त्यांच्याकडील सोईसुविधा, विद्यार्थी संख्या,आर्थिक भार आदी बाबी तपासूनच योग्य तो निर्णय घेण्यात येईल.- धनंजय मुंडे, सामाजिक न्याय मंत्रीशासनाकडून या संस्थांना माध्यान्ह भोजनासह काहीही मिळत नाही. २० वर्षे अनुदानाशिवाय संस्था कशा काम करत असतील याचा मायबाप सरकारने विचार करून आपणच काढलेल्या २० टक्के अनुदानाच्या निर्णयाची तरी अंमलबजावणी करावी.- सुशांत भूमकर, सचिव, संस्थाचालक संघटना.वारंवार तपासण्या केल्या, अनुदान देण्याचा शासकीय निर्णयही झाला पण एक छदामही संस्थांना मिळाला नाही. शासनाने अनुदान दिले नाही तर आंदोलनाशिवाय पर्याय नसेल.- संदीप सूर्यवंशी, उपाध्यक्ष, आश्रमशाळा कर्मचारी संघटना.