शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

संघर्षाशिवाय विकास नाही- डॉ. प्रकाश आमटे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2018 04:21 IST

दीनदुबळ्यांच्या समस्या श्रीमंत लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. त्याशिवाय त्यांना समाजातील परिस्थितीची जाणीव होणार नाही, अशा भावना ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. प्रकाश आमटे यांनी व्यक्त केल्या.

पुणे : समाजाने नाकारलेल्या, झिडकारलेल्या लोकांसाठी बाबांनी काम सुरू केले. संघर्षाशिवाय यश मिळत नाही, हे त्यांच्या कार्यातूनच आम्हाला उमगले आणि नकळत आमच्यावर संस्कार होत गेले. प्रत्येकाला हाव आणि गरज यांतील फरक कळला पाहिजे. हाव असणारा माणूस कधीच समाधानी होऊ शकत नाही. दीनदुबळ्यांच्या समस्या श्रीमंत लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. त्याशिवाय त्यांना समाजातील परिस्थितीची जाणीव होणार नाही, अशा भावना ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. प्रकाश आमटे यांनी व्यक्त केल्या.पुणे महानगरपालिका कामगार युनियनच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त स्मरणिकेचे प्रकाशन डॉ. प्रकाश आमटे आणि डॉ. मंदाकिनी आमटे यांच्या हस्ते झाले. या वेळी सहआयुक्त ज्ञानेश्वर मोळक, उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, कामगार कल्याण अधिकारी नितीन केंजळे, अध्यक्ष उदय भट, मुक्ता मनोहर, नगरसेविका डॉ. माधुरी सहस्रबुद्धे, कामगार युनियनचे अध्यक्ष डी. एस. देशपांडे, मुख्य कामगार अधिकारी शिवाजी दौंडकर आदी मान्यवर उपस्थित होते.आमटे म्हणाले, ‘‘समाजातील प्रत्येकाने ‘कचराकुंडी’ हा माहितीपट पाहावा. त्यातून कामगारांच्या जीवनाची समाजाला कल्पना येईल. मनोहर यांच्यासह अनेकांच्या संघर्षामुळे कामगारांना प्रतिष्ठा मिळाली, हक्क मिळाले. बाबा कामगार युनियनचे उपाध्यक्ष असताना डोक्यावर मैला घेऊन जाण्याऱ्या कामगारांनी वेतनवाढीसाठी संप केला. बाबांनी स्वत: डोक्यावर मैला वाहून नेण्याचे काम करून अनुभव घेतला. कामगारांचे दु:ख त्यांना कळले. एकदा एका समारंभाला ते आपल्यासह मैला वाहून नेणाºया लोकांना घेऊन गेले. लोकांना आश्चर्याचा धक्का बसला आणि त्यांना निमंत्रणे येणे बंद झाले. समाजाची ही मानसिकता बदलायला हवी.’’ डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी आभार मानले.आदिवासींची पिळवणूकसुशिक्षित लोक आदिवासींची पिळवणूक करायचे. त्यांना मूलभूत हक्कांची जाणीव करून देणारे कोणी नव्हते. अशा वेळी केवळ आरोग्यसेवा न पुरवता त्यांच्या मूलभूत हक्कांसाठी काम करण्याचे ठरवले आणि आम्ही केवळ निमित्तमात्र ठरलो. आज आदिवासींची मुले डॉक्टर, वकील झाली आहेत. यातील ८० टक्के लोक परत येऊन आपल्या भागात काम करीत आहेत. या कामाला सुरुवात करून २३ डिसेेंंबरला ४५ वर्षे पूर्ण होतील. एवढ्या वर्षांत जिवाला जीव देणारे कार्यकर्ते मिळाले, कमालीचे समाधान मिळाले.- डॉ. प्रकाश आमटे...तरीही काम करीत राहिलेमहारोगी कुटुंब, समाजाकडून नाकारले जातात. बाबा आमटेंनी त्यांच्या सेवेचे व्रत घेतले. ते अनुभवताना त्यांना समाजाकडून वाईट अनुभव आले, तरीही ते काम करीत राहिले. दुसरी पिढीही त्याच जोमाने कामाला लागली. प्रकाश आणि मंदाकिनी आमटे यांनी स्वत:ला काय मिळणार, याचा विचार न करता आपले वैद्यकीय ज्ञान आदिवासींसाठी कसे उपयोगात येईल, याचा विचार केला. - मुक्ता मनोहर,सामाजिक कार्यकर्त्या

टॅग्स :Puneपुणे