शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

संघर्षाशिवाय विकास नाही- डॉ. प्रकाश आमटे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2018 04:21 IST

दीनदुबळ्यांच्या समस्या श्रीमंत लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. त्याशिवाय त्यांना समाजातील परिस्थितीची जाणीव होणार नाही, अशा भावना ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. प्रकाश आमटे यांनी व्यक्त केल्या.

पुणे : समाजाने नाकारलेल्या, झिडकारलेल्या लोकांसाठी बाबांनी काम सुरू केले. संघर्षाशिवाय यश मिळत नाही, हे त्यांच्या कार्यातूनच आम्हाला उमगले आणि नकळत आमच्यावर संस्कार होत गेले. प्रत्येकाला हाव आणि गरज यांतील फरक कळला पाहिजे. हाव असणारा माणूस कधीच समाधानी होऊ शकत नाही. दीनदुबळ्यांच्या समस्या श्रीमंत लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. त्याशिवाय त्यांना समाजातील परिस्थितीची जाणीव होणार नाही, अशा भावना ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. प्रकाश आमटे यांनी व्यक्त केल्या.पुणे महानगरपालिका कामगार युनियनच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त स्मरणिकेचे प्रकाशन डॉ. प्रकाश आमटे आणि डॉ. मंदाकिनी आमटे यांच्या हस्ते झाले. या वेळी सहआयुक्त ज्ञानेश्वर मोळक, उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, कामगार कल्याण अधिकारी नितीन केंजळे, अध्यक्ष उदय भट, मुक्ता मनोहर, नगरसेविका डॉ. माधुरी सहस्रबुद्धे, कामगार युनियनचे अध्यक्ष डी. एस. देशपांडे, मुख्य कामगार अधिकारी शिवाजी दौंडकर आदी मान्यवर उपस्थित होते.आमटे म्हणाले, ‘‘समाजातील प्रत्येकाने ‘कचराकुंडी’ हा माहितीपट पाहावा. त्यातून कामगारांच्या जीवनाची समाजाला कल्पना येईल. मनोहर यांच्यासह अनेकांच्या संघर्षामुळे कामगारांना प्रतिष्ठा मिळाली, हक्क मिळाले. बाबा कामगार युनियनचे उपाध्यक्ष असताना डोक्यावर मैला घेऊन जाण्याऱ्या कामगारांनी वेतनवाढीसाठी संप केला. बाबांनी स्वत: डोक्यावर मैला वाहून नेण्याचे काम करून अनुभव घेतला. कामगारांचे दु:ख त्यांना कळले. एकदा एका समारंभाला ते आपल्यासह मैला वाहून नेणाºया लोकांना घेऊन गेले. लोकांना आश्चर्याचा धक्का बसला आणि त्यांना निमंत्रणे येणे बंद झाले. समाजाची ही मानसिकता बदलायला हवी.’’ डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी आभार मानले.आदिवासींची पिळवणूकसुशिक्षित लोक आदिवासींची पिळवणूक करायचे. त्यांना मूलभूत हक्कांची जाणीव करून देणारे कोणी नव्हते. अशा वेळी केवळ आरोग्यसेवा न पुरवता त्यांच्या मूलभूत हक्कांसाठी काम करण्याचे ठरवले आणि आम्ही केवळ निमित्तमात्र ठरलो. आज आदिवासींची मुले डॉक्टर, वकील झाली आहेत. यातील ८० टक्के लोक परत येऊन आपल्या भागात काम करीत आहेत. या कामाला सुरुवात करून २३ डिसेेंंबरला ४५ वर्षे पूर्ण होतील. एवढ्या वर्षांत जिवाला जीव देणारे कार्यकर्ते मिळाले, कमालीचे समाधान मिळाले.- डॉ. प्रकाश आमटे...तरीही काम करीत राहिलेमहारोगी कुटुंब, समाजाकडून नाकारले जातात. बाबा आमटेंनी त्यांच्या सेवेचे व्रत घेतले. ते अनुभवताना त्यांना समाजाकडून वाईट अनुभव आले, तरीही ते काम करीत राहिले. दुसरी पिढीही त्याच जोमाने कामाला लागली. प्रकाश आणि मंदाकिनी आमटे यांनी स्वत:ला काय मिळणार, याचा विचार न करता आपले वैद्यकीय ज्ञान आदिवासींसाठी कसे उपयोगात येईल, याचा विचार केला. - मुक्ता मनोहर,सामाजिक कार्यकर्त्या

टॅग्स :Puneपुणे