शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

ना सीबीआय चौकशी, ना एसटीवर उपाय; अधिवेशनात विरोधकांची झोळी रिकामीच

By यदू जोशी | Updated: December 26, 2021 08:13 IST

Maharashtra : शेतकऱ्यांची वीज कापण्याच्या मुद्यावरही सरकारकडून ठोस घोषणा मिळवण्यात विरोधक कमी पडले, तसेच सरकारचीही असंवेदनशीलता दिसून आली. अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्याचे चित्र होते, ते असे.

- यदु जोशीमुंबई : सरकारी नोकरभरतीच्या पेपरफुटीची सीबीआय चौकशीची मागणी सभागृहाबाहेर त्वेषाने करणाऱ्या विरोधकांना प्रत्यक्ष विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये ती पदरी पाडून घेण्यात अपयश आले. एसटी महामंडळाच्या विलीनीकरणाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘खो’ दिला. शेतकऱ्यांची वीज कापण्याच्या मुद्यावरही सरकारकडून ठोस घोषणा मिळवण्यात विरोधक कमी पडले, तसेच सरकारचीही असंवेदनशीलता दिसून आली. अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्याचे चित्र होते, ते असे.

राज्यातील मंत्री, नेते सीबीआय, ईडीच्या रडारवर असताना भ्रष्टाचाराची काही नवीन प्रकरणे विरोधक पोतडीतून काढतील, पेपरफुटीसारख्या गंभीर विषयात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस काही गौप्यस्फोट करतील, अशी अपेक्षा असणाऱ्यांची जरा निराशाच झाली. आपल्या वाक्चातुर्याने त्यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला. 

पेपरफुटीची निष्पक्ष चौकशी सीआयडी, एखादा आयोग वा निवृत्त न्यायाधीशांमार्फत तरी व्हावी यासाठी सरकारवर दबाव टाकण्यात विरोधकांची ताकद कमी पडल्याचे दिसले. शिवसेनेचे भास्कर जाधव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नक्कल केल्यानंतर, ‘माफी मागत नाही तोवर सभागृह चालू देणार नाही’ असा पवित्रा फडणवीस यांनी घेतला.

भाजपच्या १२ सदस्यांच्या निलंबनात महत्त्वाची भूमिका बजावलेले जाधव यांना फडणवीस यांनी माफी मागायला लावली. पेपरफुटीची सीबीआय वा अन्य चौकशी लावत नाही, एसटीच्या संपावर तोडगा काढत नाही तोवर सभागृह चालू देणार नाही, अशा आग्रही भूमिकेचा अभाव दिसला. गोंधळ घालायचा की कामकाज चालू द्यायचे या संभ्रमात विरोधी पक्ष दिसला. गोंधळाऐवजी चर्चेला प्राधान्य दिले, हे चांगलेच. पण त्या चर्चेतून ठोस घोषणा पदरी पाडून घेण्यात आलेले अपयश मात्र खटकणारे आहे.

कालबद्ध कार्यक्रम सरकार - एसटी संपावर तोडगा तर सोडाच उलट, न्यायालय देईल तो निर्णय आम्हाला मान्य असेल, असे आधी सरकारने म्हटलेले असताना, ‘विलीनीकरण आता विसरा’ असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ठामपणे सांगणे, शेतीची वीज कापण्यास स्थगिती न देणे यातूनही सरकारच्या असंवदेनशीलतेची प्रचिती आली. - ओबीसींचा इम्पिरिकल डाटा गोळा करून त्यांना आरक्षण पुन्हा बहाल करण्यासाठीचा कालबद्ध कार्यक्रम सरकार सांगेल, ही अपेक्षाही फोल ठरली.

म्यांव, म्यांव अन् डुक्करनीतेश राणे यांचे म्यांव, म्यांव, मंत्री नवाब मलिकांचे मांजरीचे तोंड अन् कोंबडीचे धडवाले ट्विट, त्यावर राणेंनी ट्विट केलेला डुक्कर यावरून राजकारणाचा एकूणच स्तर किती खाली गेला आहे, याचा प्रत्यय आला. पहिल्या आठवड्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधानभवनात आलेच नाहीत, दुसऱ्या आठवड्यातही त्यांचे येणे अनिश्चित आहे. विधानसभा अध्यक्षांच्या निवड करण्यास राज्यपाल मान्यता देतील का, काँग्रेस उमेदवार ठरवून याच अधिवेशनात अध्यक्षांची निवड होईल का? याचे उत्तर पुढील आठवड्यात मिळेल. तसेही, अध्यक्षांची निवड करण्याची घाई केवळ काँग्रेसला आहे, शिवसेना अन् राष्ट्रवादीला नाही.

टॅग्स :vidhan sabhaविधानसभाMaharashtraमहाराष्ट्र