शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

गड-किल्ल्यांवरील दारूबंदी ही तर निव्वळ धूळफेक; भाजपा आमदाराचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2020 18:30 IST

गृह खात्याने कोणतीही नवी नियमावली तयार केली नसल्याचा दावा

मुंबई: राज्यातील पवित्र गड-किल्ल्यांवर दारू पिऊन गोंधळ घालणाऱ्यांवर आळा बसावा व आपल्या इतिहासाचे पावित्र्य राखले जावे याकरिता राज्याच्या गृह खात्यांकडून नवीन नियमावली तयार करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले, परंतु अशी कोणतीही नवीन नियमावली तयार करण्यात आलेली नसून ही निव्वळ धूळफेक असल्याचा गंभीर आरोप कांदिवली पूर्व विधानसभेचे आमंदार अतुल भातखळकर यांनी केला आहे.

गड-किल्ल्यांवर चालणाऱ्या दारू पार्टी, तेथे घातला जाणारा गोंधळ आणि त्यातून दूषित केले जाणारे इतिहासाचे पावित्र्य यांवर आळा घालण्याची मागणी अनेक इतिहासप्रेमी करत होते. यासंदर्भात नवीन नियमावली तयार करून अशा दारू पिणाऱ्यांवर सहा महिन्यांची शिक्षा व १० हजार रुपये आर्थिक दंडाची तरतूद करण्यात आली असल्याचे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी माध्यमांना सांगितले होते. परंतु गृह खात्यांकडून कोणतीही नवीन नियमावली तयार करण्यात आली नसून केवळ विद्यमान नियमावलीचे परिपत्रक काढून जनतेची दिशाभूल करण्यात आल्याचा आरोप आमदार अतुल भातखळकर यांनी केला.

राज्यात लागू असलेल्या महाराष्ट्र दारूबंदी कायदा-१९४९ नुसार परवानगी असलेल्या जागा वगळता इतर कोणत्याही ठिकाणी दारूच्या नशेत गोंधळ घालणाऱ्यांवर शिक्षेची तरतूद आहे. परंतु यात कुठेही सार्वजनिक ठिकाणी दारू पिण्यावर बंदी असल्याचा उल्लेख नाही. मुळात गड-किल्ले हे सार्वजनिक ठिकाण आहेत. त्यामुळे तेथे दारू पिण्यास मनाई करायची असेल तर मूळ कायद्यात बदल करणे आवश्यक होते. मात्र अशी कोणतीही कार्यवाही न करता केवळ प्रसिद्धीसाठी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी माध्यमांमध्ये खोटी माहिती दिली. या संदर्भात मूळ कायद्यात बदल करण्याची गरज लक्षात घेऊन आगामी अधिवेशनात अशासकीय विधेयकाद्वारे सार्वजनिक ठिकाणी दारू पिण्यास बंदी घालण्याची मागणी करणार असल्याचे आमदार भातखळकर यांनी सांगितले.

शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेसचे ‘तिघाडी सरकार’ मुळातच जनतेला फसवून सत्तेत आले आहे. एकीकडे मुंबईमध्ये रात्रभर दारू पिण्याची मुभा देऊन दुसरीकडे आम्ही गड-किल्ल्यांवर दारूबंदी करीत असल्याचे खोटे विधान हे सरकार करत आहे. यातून जनतेला फसविणे हीच यांची नियत आहे हे स्पष्ट होते. या संदर्भात गृहमंत्री अनिल देशमुख यांना पत्र पाठवून जनतेची फसवणूक थांबवून मूळ कायद्यात बदल करावा अशी मागणी मी केली आहे” असे भातखळकर यांनी सांगितले. 

टॅग्स :FortगडAtul Bhatkalkarअतुल भातखळकरAnil Deshmukhअनिल देशमुख