शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

गड-किल्ल्यांवरील दारूबंदी ही तर निव्वळ धूळफेक; भाजपा आमदाराचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2020 18:30 IST

गृह खात्याने कोणतीही नवी नियमावली तयार केली नसल्याचा दावा

मुंबई: राज्यातील पवित्र गड-किल्ल्यांवर दारू पिऊन गोंधळ घालणाऱ्यांवर आळा बसावा व आपल्या इतिहासाचे पावित्र्य राखले जावे याकरिता राज्याच्या गृह खात्यांकडून नवीन नियमावली तयार करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले, परंतु अशी कोणतीही नवीन नियमावली तयार करण्यात आलेली नसून ही निव्वळ धूळफेक असल्याचा गंभीर आरोप कांदिवली पूर्व विधानसभेचे आमंदार अतुल भातखळकर यांनी केला आहे.

गड-किल्ल्यांवर चालणाऱ्या दारू पार्टी, तेथे घातला जाणारा गोंधळ आणि त्यातून दूषित केले जाणारे इतिहासाचे पावित्र्य यांवर आळा घालण्याची मागणी अनेक इतिहासप्रेमी करत होते. यासंदर्भात नवीन नियमावली तयार करून अशा दारू पिणाऱ्यांवर सहा महिन्यांची शिक्षा व १० हजार रुपये आर्थिक दंडाची तरतूद करण्यात आली असल्याचे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी माध्यमांना सांगितले होते. परंतु गृह खात्यांकडून कोणतीही नवीन नियमावली तयार करण्यात आली नसून केवळ विद्यमान नियमावलीचे परिपत्रक काढून जनतेची दिशाभूल करण्यात आल्याचा आरोप आमदार अतुल भातखळकर यांनी केला.

राज्यात लागू असलेल्या महाराष्ट्र दारूबंदी कायदा-१९४९ नुसार परवानगी असलेल्या जागा वगळता इतर कोणत्याही ठिकाणी दारूच्या नशेत गोंधळ घालणाऱ्यांवर शिक्षेची तरतूद आहे. परंतु यात कुठेही सार्वजनिक ठिकाणी दारू पिण्यावर बंदी असल्याचा उल्लेख नाही. मुळात गड-किल्ले हे सार्वजनिक ठिकाण आहेत. त्यामुळे तेथे दारू पिण्यास मनाई करायची असेल तर मूळ कायद्यात बदल करणे आवश्यक होते. मात्र अशी कोणतीही कार्यवाही न करता केवळ प्रसिद्धीसाठी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी माध्यमांमध्ये खोटी माहिती दिली. या संदर्भात मूळ कायद्यात बदल करण्याची गरज लक्षात घेऊन आगामी अधिवेशनात अशासकीय विधेयकाद्वारे सार्वजनिक ठिकाणी दारू पिण्यास बंदी घालण्याची मागणी करणार असल्याचे आमदार भातखळकर यांनी सांगितले.

शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेसचे ‘तिघाडी सरकार’ मुळातच जनतेला फसवून सत्तेत आले आहे. एकीकडे मुंबईमध्ये रात्रभर दारू पिण्याची मुभा देऊन दुसरीकडे आम्ही गड-किल्ल्यांवर दारूबंदी करीत असल्याचे खोटे विधान हे सरकार करत आहे. यातून जनतेला फसविणे हीच यांची नियत आहे हे स्पष्ट होते. या संदर्भात गृहमंत्री अनिल देशमुख यांना पत्र पाठवून जनतेची फसवणूक थांबवून मूळ कायद्यात बदल करावा अशी मागणी मी केली आहे” असे भातखळकर यांनी सांगितले. 

टॅग्स :FortगडAtul Bhatkalkarअतुल भातखळकरAnil Deshmukhअनिल देशमुख