शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

‘राज्याचे सिंचन क्षेत्र २ वर्षांत ४० टक्क्यांवर’, नितीन गडकरी यांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2017 4:45 AM

राज्यातील २६ सिंचन प्रकल्पांना मान्यता देण्यात आली आहे. या प्रकल्पांमुळे दोन वर्षांत महाराष्ट्राचे सिंचन क्षेत्र २२ टक्क्यांवरून ४० टक्क्यांवर पोहोचेल, असा विश्वास केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी सोमवारी व्यक्त केला.

मुंबई : राज्यातील २६ सिंचन प्रकल्पांना मान्यता देण्यात आली आहे. या प्रकल्पांमुळे दोन वर्षांत महाराष्ट्राचे सिंचन क्षेत्र २२ टक्क्यांवरून ४० टक्क्यांवर पोहोचेल, असा विश्वास केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी सोमवारी व्यक्त केला.फिक्कीच्या ‘प्रोग्रेसिव्ह महाराष्ट्र-२०१७’ या कार्यक्रमात पायाभूत सोईसुविधांची सद्यस्थिती आणि त्यांचा राज्याच्या विकासावर होणारा परिणाम, या विषयावर गडकरी यांनी भाष्य केले. पायाभूत सोईसुविधांच्या बाबतीत येत्या दोन वर्षांत महाराष्ट्राचा चेहरामोहराच बदललेला असेल. महाराष्ट्रातील रस्त्यांचे जाळे तिपटीने वाढल्याचे सांगून गडकरी म्हणाले की, केंद्र सरकारच्या सागरमाला, देशांतर्गत जलवाहतूक, महामार्गांचे चौपदरीकरण, बंदरविकास आदी उपक्रमांमुळे राज्याच्या आर्थिक विकासाची गती वाढेल. मुंबईतून क्रुझ सेवेला सुरुवात झाली आहे. येत्या पाच वर्षांत सुमारे ९५० क्रुझ मुंबईच्या किना-यावर येतील. त्यामुळे मुंबई आणि महाराष्ट्रात पर्यटनाच्या दृष्टिकोनातून पायाभूत सेवासुविधांची गती वाढेल, असे गडकरी म्हणाले.तत्पूर्वी, सकाळच्या सत्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते, फिक्कीच्या वार्षिक अहवालाचे प्रकाशन करण्यात आले. महाराष्ट्रात उद्योग वाढीसाठी चांगल्या सोईसुविधा व कुशल मनुष्यबळ आहे. गेल्या तीन वर्षांपासून संपूर्ण देशामध्ये उद्योग क्षेत्रात महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर आहे. तसेच तीन वर्षांपासून ‘इज आॅफ डुइंग बिझनेस’ राबवीत आहोत. महाराष्ट्राच्या उद्योग भरारीची जागतिक बँक आणि नीति आयोगानेही दखल घेत, कौतुक केल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.