शहरं
Join us  
Trending Stories
1
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
2
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
3
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
4
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
5
राहुल गांधींमुळे काँग्रेसच्या तरुण खासदारांचे भविष्य धोक्यात; PM मोदींचा घणाघात...
6
लालूप्रसाद यादवांना निकामी किडनी दिली; तेजस्वी यादव अन् बहीण रोहिणी आचार्य यांच्यात तू तू मै मै, चप्पलफेक...
7
ICC WTC Points Table : टीम इंडियापेक्षा लंका भारी! दक्षिण आफ्रिकेची दुसऱ्या स्थानावर झेप
8
सावधान! डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करताय? 'या' ३ मोठ्या जोखमींमुळे पैसे बुडण्याची शक्यता
9
प्रेमासाठी ओलांडल्या देशासह धर्माच्या सीमा; पाकिस्तानी तरुणावर जडला भारतीय महिलेचा जीव
10
बिहारमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; मंत्रिमंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला?
11
पत्नीच्या नावाने म्युच्युअल फंडात SIP करताय? टॅक्स स्लॅब आणि 'कॅपिटल गेन्स'चे नियम स्पष्ट समजून घ्या!
12
जबरदस्तीची मिठी अन् दोन वेळा Kiss...! प्रसिद्ध ज्वेलर्सच्या मुलाचं घाणेरड कृत्य; व्हिडिओ व्हायरल
13
भारताचा लाजिरवाणा पराभव! आफ्रिकेने हरवल्यानंतर उपकर्णधार पंत म्हणतो- "आज झालेला पराभव...
14
दिल्ली स्फोट प्रकरण: डझनभर डॉक्टरांचे फोन बंद; 'अल फलाह' विद्यापीठातील मोठे नेटवर्क उघड
15
IND vs SA : आम्ही जिंकलो असतो तर...! लाजिरवाण्या पराभवानंतर नेमकं काय म्हणाले कोच गौतम गंभीर?
16
‘वंदे भारत’च्या मदतीला TATA कंपनी? ट्रेन बांधणीत ठरणार गेम चेंजर! ‘मेक इन इंडिया’ वेग घेणार
17
टीम इंडियासमोर दक्षिण आफ्रिकेची कमाल! 'लो स्कोअरिंग' टेस्टमध्ये बेस्ट कामगिरीसह मारली बाजी
18
“काही ठिकाणी महायुती झाली, कुठे नाही, परवापर्यंत सगळे समजेल”: CM फडणवीसांनी केले स्पष्ट
19
प्यार किया तो डरना क्या! ८३ वर्षीय आजीच्या प्रेमात वेडा झाला २३ वर्षांचा तरुण, कुटुंबाने दिली साथ
20
याला म्हणतात धमाका शेअर...! फक्त 2 वर्षांत दिला 16000% परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल आता 5 बोनस शेअर वाटणार कंपनी
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्राचा एकही नेता पंतप्रधान का होऊ शकला नाही? नितीन गडकरींचे सूचक उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2021 12:28 IST

देश स्वतंत्र झाल्यापासून महाराष्ट्रातील एकही नेता पंतप्रधानपदी विराजमान होऊ शकला नाही. याबाबत केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांना विचारणा करण्यात आली.

मुंबई: देशभरात अनेकविध मुद्द्यांवरून राजकीय वर्तुळातील चर्चा सुरू आहे. त्यातच आता पंतप्रधान आणि राष्ट्रपती पदाच्या विषयावरून चर्चा रंगताना दिसत आहे. देश स्वतंत्र झाल्यापासून महाराष्ट्रातील एकही नेता पंतप्रधानपदी विराजमान होऊ शकला नाही. याबाबत केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांना विचारणा करण्यात आली. यावर उत्तर देताना गडकरींनी सूचक विधान केले आहे. (nitin gadkari big statement on why has no leader become prime minister from maharashtra till date)

आपण देशाच्या स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तरीत प्रवेश करत आहोत. पण पंच्याहत्तर वर्षात महाराष्ट्राचा एखादा नेता, देशाचा पंतप्रधान का झाला नाही, असा प्रश्न नितीन गडकरी यांना विचारण्यात आला. यावर, महाराष्ट्राचा पंतप्रधान झाला पाहिजे, असं मला अजिबात वाटत नाही. महाराष्ट्रासह देशाचा विकास करणारा योग्य व्यक्ती पंतप्रधान झाला पाहिजे. मग त्याची जात, धर्म, पंथ आणि राज्य कोणतेही असो. एखादा मराठी माणूस त्या पात्रतेचा असेल, तर तो पंतप्रधान होईल. त्याला ती संधी मिळेल, असे स्पष्ट मत नितीन गडकरी यांनी मांडले. 

भन्नाट योजना! पुढील ३ महिन्यांत हायवेवरील टोलनाके बंद होणार?; नितीन गडकरींचा ‘मेगा प्लान’

मुंबई-पुण्यातील ट्रॅफिक ५० टक्क्यांनी कमी होणार

सूरतपासून नाशिक, नाशिकहून अहमदनगर आणि अहमदनगरहून सोलापूर, असा नवा महामार्ग तयार केला जाणार आहे. त्यामुळे मुंबई आणि पुण्यातील ट्रॅफिक ५० टक्के कमी होणार आहे. तसेच मुंबई-दिल्ली एक्सप्रेस हायवेमुळे आपण प्रदूषण कमी करु. इथेनॉल, मिथेनॉल, बायोडिझेल, सीएनजी यांचा वापर करण्याची गरज आहे. पुण्यात ऑटो रिक्षा, स्कूटर या ताबडतोब इथेनॉलवर चालवाव्यात, असा माझा सातत्याने आग्रह आहे. पंतप्रधानांनी दोन पेट्रोल पंपांचे उद्घाटनही केले आहे. त्यामुळे याबाबत महाराष्ट्र सरकारने पुढाकार घेतला, तर कोरोनाच्या काळातही ग्रोथ रेट वाढण्यास मदत होईल, असा विश्वास नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. ते एबीपी माझाशी बोलत होते.

भन्नाट संधी! Amul ची फ्रेंचायझी घ्या अन् २ लाखांच्या गुंतवणुकीवर १० लाखांचा नफा मिळवा

दरम्यान, पायाभूत सुविधांचा विकास हा देशासाठी अत्यंत महत्वाचा आहे आणि महामार्ग बांधकामात प्रतिदिन १०० किमी एवढा वेग गाठणे हे आपले लक्ष्य आहे, असे नितीन गडकरी यांनी म्हटले आहे. कोरोनाच्या काळातही आम्ही एका दिवसात ३८ किमी रस्ता बनवून विश्वविक्रम केला. मी सध्याच्या कामगिरीवर समाधानी नाही. माझे लक्ष रोज १०० किलोमीटर महामार्ग बांधणीचे आहे. एवढेच नाही, तर सरकारचा प्रयत्न कालबद्ध, लक्ष्य केंद्रित, पारदर्शक आणि भ्रष्टाचारमुक्त व्यवस्था आहे, असेही गडकरी म्हणाले. 

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीprime ministerपंतप्रधान