शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
6
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
7
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
8
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
9
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
10
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
11
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
12
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
13
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
14
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
15
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
16
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
17
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
18
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
19
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
20
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन

नववी, अकरावीची पुनर्परीक्षा

By admin | Updated: June 10, 2016 01:06 IST

शाळेतील विद्यार्थ्यांकडे शाळेतील शिक्षकांनी केलेल्या दुर्लक्षामुळे तब्बल ५५ विद्यार्थी अकरावीमध्ये अनुत्तीर्ण झाल्याचे समोर आले आहे.

पुणे : येरवडा येथील नेताजी सुभाषचंद्र बोस शाळेतील विद्यार्थ्यांकडे शाळेतील शिक्षकांनी केलेल्या दुर्लक्षामुळे तब्बल ५५ विद्यार्थी अकरावीमध्ये अनुत्तीर्ण झाल्याचे समोर आले आहे. मात्र, शिक्षण विभागाने या विद्यार्थ्यांची पुनर्परीक्षा घेऊन त्यातून उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील काळात राज्यातील सर्व विद्यार्थ्यांसाठी हा निर्णय लागू होण्याची शक्यता सूत्रांकडून व्यक्त केली जात आहे.दहावी - बारावीत नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांची निकालानंतर एक महिन्यानंतर पुनर्परीक्षा घेतली जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर नववी व अकरावीत नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांची पुनर्परीक्षा घेण्याचा विचार शासनस्तरावर सुरू झाला आहे. शिक्षण विभागातर्फे लवकरच याबाबत अध्यादेश काढला जाण्याची शक्यता शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून व्यक्त होत आहे. काही कारणास्तव विद्यार्थी एखाद्या पेपरला गैरहजर राहिल्यास किंवा प्रकल्प, तोंडी परीक्षांचे गुण देण्याचे राहिल्यास संबंधित विद्यार्थ्यांची परीक्षा घेवून त्यांना उत्तीर्ण करण्याचे आदेश शिक्षण अधिकाऱ्यांकडून शाळांना दिले आहेत. त्याचप्रमाणे काही शाळाही स्वत:हून अशा विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेत आहेत. विद्यार्थी हितासाठी काही निर्णय घेतले जातात. मात्र, नववी व अकरावीमध्ये नापास होणाऱ्या सरसकट सर्व विद्यार्थ्यांची पुनर्परीक्षा घेणे कायद्यात बसते का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.काही कारणास्तव परीक्षा न देऊ शकणाऱ्या विद्यार्थ्यांची पुनर्परीक्षा घेता येते. मात्र, नेताजी शाळेतील अकरावीमधील ५५ नापास झालेल्या सर्व विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात आली आहे. शिक्षकांनी या विद्यार्थ्यांची तोंडी परीक्षा न घेता त्यांना शून्य गुण दिले होते. त्यामुळे अनेक विद्यार्थी नापास झाल्याचे बोलले जात आहे. मात्र, काही विद्यार्थी सर्व परीक्षा देवून ही नापास झाले आहेत. तरीही त्यांची परीक्षा घेतली जात आहे. यावर नेताजी शाळेच्या मुख्याध्यापिका सुरेखा शिवशरण म्हणाल्या, ‘‘शिक्षण विभागाने दिलेल्या सूचनेनुसार नापास झालेल्या सर्व विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली जात आहे. पालिकेच्या माध्यमिक शिक्षण विभागाकडून परीक्षा घेण्याची परवानगी प्राप्त झाली आहे.’’नेताजी शाळेतील अनेक विद्यार्थी नापास झाल्याच्या तक्रारी समोर आल्या होत्या. त्यावर पालिकेच्या उपायुक्तांकडून संबंधित विद्यार्थ्यांची पुनर्परीक्षा घेण्याबाबत शिक्षण विभागाने परवानगी घेतली आहे. त्यानुसार शाळेत विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली जात आहे. दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांची पुनर्परीक्षा घेतली जात असेल तर अकरावीच्या नापास विद्यार्थ्यांची का घेवू नये.- शिवाजी दौंडकर, माध्यमिक शिक्षणप्रमुख, पुणे महानगरपालिका