शहरं
Join us  
Trending Stories
1
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
2
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
3
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
4
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
5
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
6
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
7
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
8
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
9
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
10
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
11
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
12
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
13
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
14
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
15
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
16
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
17
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
18
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
19
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
20
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?

नऊ शाळांतील पोषण आहार बंद !

By admin | Updated: August 19, 2016 19:12 IST

शासनाच्या वतीने १९९५ पासून पहिली ते आठवीचा विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार दिला जात आहे. या योजनेमुळे विशेषत: ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची सोय झाली

ऑनलाइन लोकमततेर, दि. १९ : शासनाच्या वतीने १९९५ पासून पहिली ते आठवीचा विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार दिला जात आहे. या योजनेमुळे विशेषत: ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची सोय झाली. तसेच पटसंख्याही टीकून राहिली. असे असतानाच वाणेवाडी शाळेसह काजळा केंद्रातील तब्बल नऊ शाळांना तांदूळ पुरवठा न झाल्याने अनेक दिवसांपासून पोषण आहारच शिजत नसल्याचा प्रकार समोर आला आहे. याचा फटका एक -दोन नव्हे, तर बाराशेवर विद्यार्थ्यांना बसत आहे.

वाणेवाडी येथे इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत जिल्हा परिषदची शाळा असून या शाळेमध्ये ९९ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मुख्याध्यापक आर.पी. खडके यांनी आॅगस्ट व सप्टेंबर महिन्यासाठी लागणारा तांदूळ पुरवठा करण्याची मागणी गटशिक्षणाधिकारी कार्यालयाकडे ४ जुलै रोजी केली आहे. परंतु, आजपावेतो तांदूळ उपलब्ध न झाल्याने २० जुलैपासून या शाळेतील विद्यार्थ्यांचा पोषण आहार बंद आहे.

वाणेवाडीप्रमाणेच काजळा केंद्राअंतर्गत येणाऱ्या रामवाडी, दाऊदपूर, वाघोली, भंडारवाडी, आरणी, इर्ला, टाकळी-ढोकी, आनंदवाडी येथील शाळांची अवस्था झाली आहे. रामवाडी येथे जिल्हा परिषदेची पहिली ते सातवीपर्यंतची शाळा आहे. या शाळेत १५० विद्यार्थी शिक्षण घेत आहे. येथील पोषण अहार १ आॅगस्टपासून म्हणजेच वीस दिवसांपासून बंद आहे. याही शाळेला तांदूळ पुरवठा झालेला नाही. याही शाळेच्या मुख्याध्यापकाने ४ जुलैै रोजीच तांदूळ मागणी केला आहे. अशीच अवस्था भंडारवाडी शाळेची आहे. येथील शाळेत १६५ विद्यार्थी शिक्षण घेत आहे.

त्याचप्रमाणे टाकळी-ढोकी येथील १६०, आरणी येथील १५५, वाणेवाडी येथील ९९, रामवाडी येथील १५४, इर्ला येथील १५६, दाऊदपूर येथील ६०, आनंदवाडी येथील १०० असे एकूण बाराशेवर विद्यार्थी सध्या पोषण आहाराविनाच ज्ञानाचे धडे गिरवित आहेत. जिल्ह्यातील सर्व शाळांना महाराष्ट्र को-आॅप. कंझुमर्स फेडरेशन, मुंबई यांच्यामार्फत तांदूळ पुरवठा केला जातो. परंतु वेळेवर तांदूळ पुरवठा केला जात नसल्याने काजळा केंद्रांतर्गत येणाऱ्या नऊ गावातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना पोषण आहार मिळत नसल्याने पालकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.गटशिक्षणाधिकारी कार्यालयाकडे आॅगस्ट व सप्टेंबरसाठी लागणाऱ्या तांदळाची मागणी ४ जुलै रोजी मागणी केली आहे. परंतु, तांदूळ उपलब्ध झाला नाही. त्यामुळे पोषण आहार शिजवला जात नाही.- आर. पी. खडके, मुख्याध्यापक, जिल्हा परिषद, प्रशाला, वाणेवाडी.