शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

नऊ शाळांतील पोषण आहार बंद !

By admin | Updated: August 19, 2016 19:12 IST

शासनाच्या वतीने १९९५ पासून पहिली ते आठवीचा विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार दिला जात आहे. या योजनेमुळे विशेषत: ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची सोय झाली

ऑनलाइन लोकमततेर, दि. १९ : शासनाच्या वतीने १९९५ पासून पहिली ते आठवीचा विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार दिला जात आहे. या योजनेमुळे विशेषत: ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची सोय झाली. तसेच पटसंख्याही टीकून राहिली. असे असतानाच वाणेवाडी शाळेसह काजळा केंद्रातील तब्बल नऊ शाळांना तांदूळ पुरवठा न झाल्याने अनेक दिवसांपासून पोषण आहारच शिजत नसल्याचा प्रकार समोर आला आहे. याचा फटका एक -दोन नव्हे, तर बाराशेवर विद्यार्थ्यांना बसत आहे.

वाणेवाडी येथे इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत जिल्हा परिषदची शाळा असून या शाळेमध्ये ९९ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मुख्याध्यापक आर.पी. खडके यांनी आॅगस्ट व सप्टेंबर महिन्यासाठी लागणारा तांदूळ पुरवठा करण्याची मागणी गटशिक्षणाधिकारी कार्यालयाकडे ४ जुलै रोजी केली आहे. परंतु, आजपावेतो तांदूळ उपलब्ध न झाल्याने २० जुलैपासून या शाळेतील विद्यार्थ्यांचा पोषण आहार बंद आहे.

वाणेवाडीप्रमाणेच काजळा केंद्राअंतर्गत येणाऱ्या रामवाडी, दाऊदपूर, वाघोली, भंडारवाडी, आरणी, इर्ला, टाकळी-ढोकी, आनंदवाडी येथील शाळांची अवस्था झाली आहे. रामवाडी येथे जिल्हा परिषदेची पहिली ते सातवीपर्यंतची शाळा आहे. या शाळेत १५० विद्यार्थी शिक्षण घेत आहे. येथील पोषण अहार १ आॅगस्टपासून म्हणजेच वीस दिवसांपासून बंद आहे. याही शाळेला तांदूळ पुरवठा झालेला नाही. याही शाळेच्या मुख्याध्यापकाने ४ जुलैै रोजीच तांदूळ मागणी केला आहे. अशीच अवस्था भंडारवाडी शाळेची आहे. येथील शाळेत १६५ विद्यार्थी शिक्षण घेत आहे.

त्याचप्रमाणे टाकळी-ढोकी येथील १६०, आरणी येथील १५५, वाणेवाडी येथील ९९, रामवाडी येथील १५४, इर्ला येथील १५६, दाऊदपूर येथील ६०, आनंदवाडी येथील १०० असे एकूण बाराशेवर विद्यार्थी सध्या पोषण आहाराविनाच ज्ञानाचे धडे गिरवित आहेत. जिल्ह्यातील सर्व शाळांना महाराष्ट्र को-आॅप. कंझुमर्स फेडरेशन, मुंबई यांच्यामार्फत तांदूळ पुरवठा केला जातो. परंतु वेळेवर तांदूळ पुरवठा केला जात नसल्याने काजळा केंद्रांतर्गत येणाऱ्या नऊ गावातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना पोषण आहार मिळत नसल्याने पालकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.गटशिक्षणाधिकारी कार्यालयाकडे आॅगस्ट व सप्टेंबरसाठी लागणाऱ्या तांदळाची मागणी ४ जुलै रोजी मागणी केली आहे. परंतु, तांदूळ उपलब्ध झाला नाही. त्यामुळे पोषण आहार शिजवला जात नाही.- आर. पी. खडके, मुख्याध्यापक, जिल्हा परिषद, प्रशाला, वाणेवाडी.