शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

राज्यात पाच महिलांसह ९ जणांचा बुडून मृत्यू; लातूर, अकोला, चंद्रपूरमधील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2022 05:41 IST

तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये राज्यातील ९ जणांचा बुडून मृत्यू झाला. त्यात पाच महिलांचा समावेश आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्क

लातूर/अकोला/चंद्रपूर : तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये राज्यातील ९ जणांचा शनिवारी बुडून मृत्यू झाला. त्यात पाच महिलांचा समावेश आहे. 

लातूर जिल्ह्याच्या अहमदपूर तालुक्यातील तुळशीराम तांडा येथे शनिवारी पाणी आणण्यासाठी तलावावर गेलेल्या मुलीचा तोल गेला आणि ती तलावात बुडू लागली. ते बघून आईनेही व पाठोपाठ लहान मुलीनेही उडी घेतली. नंतर सोबतच्या दोघींनी तलावात उड्या मारल्या. पाचही जणींना पोहता येत नव्हते. त्या पाचही जणींचा बुडून मृत्यू झाला. राधाबाई धोंडिबा आडे (४५), दीक्षा आडे (२१), काजल आडे (१९), सुषमा राठोड (२२), अरुणा राठोड (२६) अशी पाच जणींची नावे आहेत. 

तर चंद्रपूर जिल्ह्याच्या भद्रावती तालुक्यातील माजरी येथील वर्धा नदीच्या पात्रात मासळी पकडण्यासाठी गेलेल्या दोघांचा बुडून मृत्यू झाला. अशोक रामपाल यादव (४२), रोहित राहुल मल्लय (८) अशी मृतकांची नावे आहेत. तिसऱ्या घटनेत अकाेल्यातील दाेन युवकांचा तेलंगणातील नदीत बुडून मृत्यू झाला. प्रतीक गावंडे (२२) व किरण लटकुटे (२२) हे गाेदावरी नदीत बुडाले.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र