शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
4
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
5
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
6
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
7
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
8
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
9
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
10
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
11
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
12
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
13
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
14
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
15
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
16
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
17
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
18
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
19
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
20
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई

महाराष्ट्र निवडणूक 2019: 'मातोश्री' आता सोनिया गांधीच्या निवासस्थानी शिफ्ट: निलेश राणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2019 11:46 IST

Maharashtra Vidhan Sabha Election 2019 : परत येताना भगवे फेटे नाही तर गांधी टोपी घालून यायचे असा टोला निलेश राणेंनी शिवसेनेला लगावला.

मुंबई : गेल्या पाच दिवसांपासून मुंबईच्या हॉटेल रिट्रीटमध्ये ठेवण्यात आलेल्या शिवसेनेच्या आमदारांना अखेर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडून त्यांच्या त्यांच्या मतदारसंघात जाण्यास सांगण्यात आले आहे. मतदारसंघात जाऊन मतदारांच्या संपर्कात राहा, असा आदेश या आमदारांना देण्यात आला. तर याच मुद्यावरून निलेश राणेंनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. काँग्रेस बोलवेल तेव्हा गुपचूप परत यायचं. कारण मातोश्री आता १० जनपथ दिल्लीला शिफ्ट झाली असल्याचा त्यांनी सेनेला टोला लगावला आहे.

राज्यात सत्तास्थापनेवरून राजकीय हालचालींना वेग आला आहे. त्यामुळे आमदार फुटू नये या भीतीने शिवसेनेने गेल्या पाच दिवसांपासून आपल्या आमदारांना हॉटेल रिट्रीटमध्ये ठेवलं होतं. मात्र आता त्यांना आपल्या मतदारसंघात जाण्याचे आदेश पक्षाकडून देण्यात आले आहेत. शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी या आमदारांना हॉटेलमध्ये भेटून ही माहिती दिली आहे.

त्यांनतर निलेश राणेंनी या मुद्यावरून शिवसेनेला खोचक टोला लगावला आहे. शिवसेना आमदारांनी हॉटेल रिट्रीटमध्ये ५ दिवस राहून मोठं राष्ट्रीय कर्तव्य पार पाडलं.मात्र काँग्रेस बोलवेल तेव्हा गुपचूप परत यायचं. कारण मातोश्री आता १० जनपथ दिल्लीला शिफ्ट झाली असून परत येताना भगवे फेटे नाही तर गांधी टोपी घालून यायचे असा टोला निलेश राणेंनी शिवसेनेला लगावला.

मुंबईच्या हॉटेल रिट्रीटमध्ये ठेवण्यात आलेल्या शिवसेनेच्या आमदारांना मतदारसंघात परतण्याचे आदेश दिले गेले आहेत. तर दुसरीकडे काँग्रेसने सुद्धा जयपूरमध्ये ठवलेले सर्व ४४ आमदार आज मुंबईत परतले आहेत. त्यामुळे त्यांना सुद्धा मतदारसंघात परतण्याचे आदेश मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 

 

 

 

 

 

टॅग्स :Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Uddhav Thackerayउद्धव ठाकरेNilesh Raneनिलेश राणे Politicsराजकारण