शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

शिवसेनेने पीक विमा कंपन्यांना दिलेल्या डेडलाईनच काय झालं? : निलेश राणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2019 17:49 IST

गेल्या महिन्यात खाजगी पीक विमा कंपन्या विरोधात शिवसेनेने मुंबईत मोर्चा काढला होता.

मुंबई - मुंबईतील बीकेसी परिसरात शिवसेनेने पीक विमा कंपन्यांविरोधात काढलेल्या मोर्चावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी, राज्यातील खासगी पीक विमा कंपन्यांना १५ दिवसांच्या आत प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्याची मुदत दिली होती. अन्यथा १५ दिवसांनी पुन्हा मोर्चा काढून जाब विचारणार असल्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला होता. तर उद्धव ठाकरे यांना डेडलाईनची आठवण करून देत  माजी खासदार आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते  निलेश राणे यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली.

गेल्या महिन्यात खाजगी पीक विमा कंपनांच्या विरोधात शिवसेनेने मुंबईत मोर्चा काढला होता. यावेळी खुद्द उद्धव ठाकरे सुद्धा उपस्थित होते. यावेळी उद्धव यांनी, राज्यातील खासगी विमा कंपन्यांना १५ दिवसांच्या आत शेतकऱ्यांचे प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्याची मागणी केली होती. त्याच बरोबर आगामी १५ दिवसांच्या काळात कर्ज माफ झालेल्या शेतकऱ्यांची नावे बँकांच्या बोर्डावर झळकलीच पाहिजेत अशी सूचना उद्धव यांनी बँकांना केली होती. मात्र प्रत्यक्षात आजही अनेक शेतकरी पीक विमा आणि कर्ज माफी पासून वंचित असल्याचे समोर आले आहे.

यावरूनच  निलेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. उद्धव यांनी पीक विमा कंपन्यांना दिलेल्या डेडलाईनच काय झाले असा सवाल त्यांनी उपस्थित केला. शेतकऱ्यांना ४०० कोटी मिळवून दिले म्हणणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी पुरावे द्यावेत असे सुद्धा निलेश राणे म्हणाले. यावेळी त्यांनी एका शेतकऱ्याचे २०१८ मधील बँकेचे तपशील ट्विट करत, पुरावे द्यायचे असतील तर असे द्या, म्हणजे खरं खोटं कळेल असा खोचक टोला निलेश यांनी शिवसेनेला लगावला.

सत्तेत असून ही नेहमीच शिवसेनेने शेतकऱ्यांच्या कर्ज माफिवरून भाजपला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. प्रत्यक्षात मात्र अजूनही सरसकट कर्ज माफी झाली नसून अनेक शेतकरी कर्ज माफी पासून वंचित असल्याचे समोर आले आहे. त्यात सनेने दिलेल्या १५ दिवसाच्या डेडलाईन नंतर काही हालचाली होतील अशी, अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र शिवसेनेला त्यांनी दिलेल्या डेडलाईनचा विसर तर पडला नाही ना ? असा प्रशन उपस्थित होत आहे.

टॅग्स :Nitesh Raneनीतेश राणे Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाCrop Insuranceपीक विमाCrop Loanपीक कर्ज