शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

पदवी खरी असेल; पण 'हा' माणूस १०० टक्के बोगस, निलेश राणेंची शिवसेनेच्या मंत्र्यावर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2020 14:44 IST

पुण्यातील आरटीआय कार्यकर्ते अभिषेक हरिदास यांनी शिवसेनेच्या या मंत्र्यांच्या पदवीबद्दलची माहिती मिळवली आहे.

मुंबई -  महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होऊन खातेवाटप झाल्यानंतर आता या सरकारमधील तंत्रशिक्षण मंत्री असलेले उदय सामंत त्यांच्या पदवीवरून अडचणीत आले आहेत. दरम्यान, भाजपा नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी या पदवीवरून उदय सामंत यांना टोला लगावला आहे. कदाचित पदवी खरी असेल, पण हा माणूस 100 टक्के बोगस आहे असे त्यांनी म्हटले आहे. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री असलेले रत्नागिरीचे आमदार उदय सामंत यांनी ज्ञानेश्वरी विद्यापीठातून घेतलेली पदवी ही खोटी असल्याचा आरोप झाला आहे. त्यानंतर निलेश राणे यांनी ट्विटकरून सामंत यांच्यावर टीका केली आहे. ''पदवी खरी असेल, पण हा माणूस 100 टक्के बोगस आहे,''असे निलेश राणे यांनी म्हटले आहे.  

पुण्यातील आरटीआय कार्यकर्ते अभिषेक हरिदास यांनी सामंत यांच्या पदवीबद्दलची माहिती मिळवली आहे. त्यानंतर विरोधकांनी सामंत यांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, उदय सामंत यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. माझी आणि माजी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची चौकशी करा, असे खुले आव्हान त्यांनी दिले आहे. ‘ज्ञानेश्वर विद्यापीठात शिकलो यात मला कमीपणा वाटत नाही’ असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.   

‘1991 मध्ये मनोहर आपटे यांनी ज्ञानेश्वर विद्यापीठाची स्थापन केली. या संस्थेमध्ये प्रॅक्टिकल ज्ञान दिले जायचे. त्याची पदवी दिली जायची, तशी मी घेतली. उद्योजक होण्यासाठी मी पदवी घेतली होती. त्या पदवीच्या आधारे मी शासकीय नोकरी किंवा घर घेतलेले नाही. त्या पदवीचा वापर करून मी कुठलाही शासकीय लाभ घेतलेला नाही’, असा दावा त्यांनी केला. मी मंत्री झाल्यावर अचानक हे प्रकरण चर्चेत आले. माझ्या पदवीचा वाद उकरून एखाद्याला रात्री गोळ्या न घेता शांतपणे झोप येत असेल, तर चांगलेच आहे,'' असा टोलादेखील त्यांनी लगावला आहे.  

टॅग्स :Nilesh Raneनिलेश राणे BJPभाजपाShiv SenaशिवसेनाUday Samantउदय सामंतPoliticsराजकारण