शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

पदवी खरी असेल; पण 'हा' माणूस १०० टक्के बोगस, निलेश राणेंची शिवसेनेच्या मंत्र्यावर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2020 14:44 IST

पुण्यातील आरटीआय कार्यकर्ते अभिषेक हरिदास यांनी शिवसेनेच्या या मंत्र्यांच्या पदवीबद्दलची माहिती मिळवली आहे.

मुंबई -  महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होऊन खातेवाटप झाल्यानंतर आता या सरकारमधील तंत्रशिक्षण मंत्री असलेले उदय सामंत त्यांच्या पदवीवरून अडचणीत आले आहेत. दरम्यान, भाजपा नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी या पदवीवरून उदय सामंत यांना टोला लगावला आहे. कदाचित पदवी खरी असेल, पण हा माणूस 100 टक्के बोगस आहे असे त्यांनी म्हटले आहे. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री असलेले रत्नागिरीचे आमदार उदय सामंत यांनी ज्ञानेश्वरी विद्यापीठातून घेतलेली पदवी ही खोटी असल्याचा आरोप झाला आहे. त्यानंतर निलेश राणे यांनी ट्विटकरून सामंत यांच्यावर टीका केली आहे. ''पदवी खरी असेल, पण हा माणूस 100 टक्के बोगस आहे,''असे निलेश राणे यांनी म्हटले आहे.  

पुण्यातील आरटीआय कार्यकर्ते अभिषेक हरिदास यांनी सामंत यांच्या पदवीबद्दलची माहिती मिळवली आहे. त्यानंतर विरोधकांनी सामंत यांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, उदय सामंत यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. माझी आणि माजी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची चौकशी करा, असे खुले आव्हान त्यांनी दिले आहे. ‘ज्ञानेश्वर विद्यापीठात शिकलो यात मला कमीपणा वाटत नाही’ असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.   

‘1991 मध्ये मनोहर आपटे यांनी ज्ञानेश्वर विद्यापीठाची स्थापन केली. या संस्थेमध्ये प्रॅक्टिकल ज्ञान दिले जायचे. त्याची पदवी दिली जायची, तशी मी घेतली. उद्योजक होण्यासाठी मी पदवी घेतली होती. त्या पदवीच्या आधारे मी शासकीय नोकरी किंवा घर घेतलेले नाही. त्या पदवीचा वापर करून मी कुठलाही शासकीय लाभ घेतलेला नाही’, असा दावा त्यांनी केला. मी मंत्री झाल्यावर अचानक हे प्रकरण चर्चेत आले. माझ्या पदवीचा वाद उकरून एखाद्याला रात्री गोळ्या न घेता शांतपणे झोप येत असेल, तर चांगलेच आहे,'' असा टोलादेखील त्यांनी लगावला आहे.  

टॅग्स :Nilesh Raneनिलेश राणे BJPभाजपाShiv SenaशिवसेनाUday Samantउदय सामंतPoliticsराजकारण