‘त्या’ बातम्यांचा धनी शोधणार
By Admin | Updated: July 11, 2014 00:38 IST2014-07-11T00:38:18+5:302014-07-11T00:38:18+5:30
‘नेतृत्वबदला’च्या बातम्या पेरल्या जात असून, त्यामागे नेमका कोणाचा हात आहे, याचा शोध घेतला जाणार आहे, असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

‘त्या’ बातम्यांचा धनी शोधणार
रघुनाथ पांडे - नवी दिल्ली
‘नेतृत्वबदला’च्या बातम्या पेरल्या जात असून, त्यामागे नेमका कोणाचा हात आहे, याचा शोध घेतला जाणार आहे, असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
मुख्यमंत्री चव्हाण दोन दिवस राजधानीत होते. बुधवारी पक्षाध्यक्षा सोनिया गांधी व गुरुवारी उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह इतर नेत्यांच्या त्यांनी भेटी घेतल्या. त्यानंतर महाराष्ट्र सदनात पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. मुख्यमंत्री म्हणाले, महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीतील रणनीतीविषयी पक्षश्रेष्ठींशी सविस्तर चर्चा झाली. साधारणत: 2क् ते 25 ऑगस्टच्या दरम्यान राज्यात निवडणूक आचारसंहिता लागू होईल. त्याआधी अनेक महत्त्वाच्या विषयांचा पाठपुरावा करायचा आहे.
नेतृत्वबदलाच्या बातम्यांविषयी ते म्हणाले, या बातम्या प्रमोट केल्या जात आहेत. त्यामागे कोण आहे, त्याची पद्धत काय आहे आणि कोणत्या वेळेत त्या दिल्या जातात, याचा कसून शोध घेतला जात आहे. प्रशासन व पक्ष संघटनेवर परिणाम करणा:या या बातम्यांची गंभीर दखल पक्षश्रेष्ठींनी घेतली असून लवकरच सत्य काय ते बाहेर येईल, असा गर्भित इशाराही त्यांनी पक्षांतर्गत विरोधकांना दिला.
निवडणूक स्वबळावर लढवायची की आघाडीसोबत, याचा निर्णय पक्षश्रेष्ठीच घेतील, असे स्पष्ट करून ते म्हणाले, जागावाटपाचा फॉम्यरुला जुनाच आहे. त्यात बदल संभवत नाही. राष्ट्रवादीमुळे काँग्रेसला फटका बसेल का, असे विचारता ते म्हणाले, सव्र्हे करावा लागेल!
च्महाराष्ट्रातील अनेक प्रकल्प केंद्राकडे मान्यतेसाठी पडून आहेत. पायाभूत सोयी, सुरक्षा आणि विकासासाठी निधी आदी विषयांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लवकरच आपण भेट घेणार आहेात, असे मुख्यमंत्री म्हणाले.