शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
2
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
3
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
4
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
5
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
6
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
7
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
8
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
9
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
10
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
11
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
12
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
13
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
14
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
15
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
16
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
17
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
18
"५ सेकंद सर्व थांबले, हिरवी लाईट सुरु झाली अन्..."; रमेश विश्वासकुमारने सांगितले टेकऑफ नंतर काय घडलं
19
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?
20
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख

निवडणुकीतील नवा पक्ष ‘एआय’; नकारात्मक वापर रोखणार कसा?

By यदू जोशी | Updated: March 10, 2024 10:46 IST

नियंत्रण ठेवण्यासाठी समिती.

यदु जोशी, सहयोगी संपादक

मुद्द्याची गोष्ट : भाजप, काँग्रेस अन् अनेक पक्ष आगामी लोकसभा निवडणुकीत असतीलच, पण एक नवा पक्ष यावेळी असेल, जो स्वत:चे उमेदवार लढविणार नाही, पण सर्वच राजकीय पक्षांना त्रास देईल. त्याचे नाव आहे, कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय). जगातील सर्वांत मोठा लोकशाही देश लोकसभा निवडणुकीला सामोरा जात असताना चॅटजीपीटी, डीपफेक अशा आयुधांसह होत्याचे नव्हते आणि नव्हत्याचे होते करण्याची ताकद असलेला एआय नावाचा हा पक्ष म्हणाल तर राजकीय पक्षांना मदत करेल, पण आगामी निवडणुकीत त्यापासूनचे धोकेच अधिक.

सोशल मीडियाचा वापर देशभरातील कोट्यवधी लोक दररोज करतात. आपल्याकडे या मीडियाचा वापर झपाट्याने वाढत असला, तरी त्या माध्यमातून दिली जाणारी खरी माहिती कोणती, खोटी कोणती, माहिती देण्यामागचा उद्देश कोणता? सामाजिक, राजकीय हेतू कोणते याची जाणीव असलेला वर्ग मात्र फार मोठा नाही. सोशल मीडियात आलेली माहिती खरी मानणाऱ्यांची संख्या अधिक आहे. माहितीच्या या फसव्या मायाजालावर पटकन विश्वास ठेवून स्वत:ची मते बनविणाऱ्यांची संख्या कमी नाही आणि नेमका हाच वर्ग आता एआयच्या खोट्यानाट्या माहितीला बळी पडण्याची भीती आहे. 

भारतीय सोशल मीडिया फॉलोअर्सच्या या अज्ञानाचा गैरफायदा घेत एआयचा वापर मोठ्या प्रमाणात लोकसभा निवडणुकीत केला जाण्याची शक्यता आहे. ‘सत्य जेव्हा चप्पल घालत असते, असत्य तोवर गाव फिरून येते’ असे म्हणतात. एआय हा तंत्रज्ञान क्षेत्रातील नवीन वाटसरू असत्याची चप्पल घालून तुमच्या स्क्रीनवर राजकीय असत्य पेरण्यासाठी येतोय याची कल्पना आहे का तुम्हाला? 

निवडणूक प्रचाराच्या काळात राजकीय नेत्यांचे एआय अवतार (अगदी हुबेहूब) तयार केले जातील. उदाहरणार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदीच बोलताहेत, आवाजही अगदी त्यांचाच असे आभासी चित्र निर्माण केले जाईल. भाजपच्या ध्येयधोरणांवर मोदीच टीका करत आहेत, मतदारांना नाही नाही ती आश्वासने देत आहेत, असे दर्शविले जाईल. असेच राहुल गांधींसह कोणत्याही नेत्याबाबत घडू शकेल. एआयचा गैरवापर रोखण्यासाठीचे वेगळे कायदे आपल्याकडे अद्याप बनलेले नाहीत. बनावट माहिती प्रसृत केली म्हणून एखाद्या व्यक्तीला जबाबदार धरताना, ती बनावट माहिती देशाची सार्वभौमता, एकता आणि एकात्मता यांना बाधा पोहोचविणारी आहे का किंवा एखाद्याचे चारित्र्यहनन करणारी आहे का, या मुद्द्यांवरच गुन्हा दाखल केला जाऊ शकतो. 

माहिती-तंत्रज्ञान कायदा २०२० आणि २०२१ मधील डिजिटल मीडिया एथिक्स कोड हे डीपफेक, एआयचा गैरवापर करून व्यक्तिगत एखाद्याला लक्ष्य करणाऱ्यासाठीची विशेष कलमे, शिक्षेची तरतूद अजूनही कायद्यात नाही. त्यामुळेच एआयचा स्वैराचारी वापर होण्याची शक्यता अधिक आहे. अशा अनेक वेबसाइट आहेत की ज्यांचा उपयोग करून आपण एआयद्वारे बनावट माहिती देणारे ऑडिओ, व्हिडीओ तयार करू शकतो. त्याद्वारे दिशाभूल करणाऱ्या माहितीचा भडिमार सहज केला जाऊ शकतो. त्यासाठी फार काही तंत्रस्नेही असण्याची पण गरज नाही. 

नकारात्मक वापर रोखणार कसा?

एआयचा नकारात्मक वापर ही सर्वांसाठीच या निवडणुकीत डोकेदुखी असेल. देशाच्या लोकसंख्येपैकी ६७ टक्के लोक आगामी निवडणुकीत मतदार असतील. जवळपास ९७ कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावतील अशी अपेक्षा आहे. अशावेळी लोकांच्या मतांवर किंवा परिणाम करू शकतील अशी चुकीची, खोटी माहिती एआयच्या माध्यमातून दिली जाऊ शकते. इतका मोठा धोका केंद्रीय निवडणूक आयोगाने लक्षात घेतला आहे की नाही हे कळायला मार्ग नाही.

सार्वजनिकरीत्या तरी अद्याप आयोगाने एआयच्या गैरवापराविरुद्ध काही ठोस पावले उचलली, नियम केले असे दिसत नाही. एआय क्षेत्रातील एका बड्या कंपनीने मध्यंतरी फेब्रुवारीत एक परिषद घेतली आणि या क्षेत्रातील मान्यवरांनी एकत्र बसून एआयचा गैरवापर रोखण्यासंदर्भात काही सूचना केंद्रीय निवडणूक आयोगाला केल्या. आयोग आता त्यावर काय उपाययोजना करणार याबाबत उत्सुकता आहे. अद्याप आम्हाला त्याबाबत काहीही सूचना आलेल्या नाहीत,  असे आयोगाच्या मुंबईतील सूत्रांचे म्हणणे आहे. 

नियंत्रण ठेवण्यासाठी समिती 

एआयसंदर्भात विशिष्ट अशा मार्गदर्शक सूचना नसल्या, तरी एआय हा सोशल मीडियाचाच एक भाग आहे आणि त्याचा गैरवापर रोखण्यासंबंधी आयोगाने मार्गदर्शक सूचना आधीच जारी केल्या आहेत. त्यानुसार आयोग काम करत आहे. या गैरवापरावर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्य आणि प्रत्येक जिल्हा पातळीवर समिती नियुक्त करण्यात आली आहे. त्यात आयटीचे तज्ज्ञ, माहिती व जनसंपर्क विभागाचे अधिकारी, निवडणूक आयोगाचे अधिकारी यांचा समावेश आहे. रोजच्या रोज सोशल मीडियावरील पोस्टची माहिती घेणे, कुठे कसा गैरवापर केला जात आहे या संबंधीची माहिती आयोगाला देण्याचे काम या समित्या करीत असतात.  - मनोहर पारकर, उपमुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र

६७ टक्के लोक देशाच्या लोकसंख्येपैकी आगामी निवडणुकीत मतदार असतील.

९७ कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावतील अशी अपेक्षा आहे.  

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग