शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
2
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
3
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
4
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
5
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
6
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
7
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
8
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
9
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
10
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
11
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
12
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
13
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
14
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
15
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
16
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
17
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
18
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
19
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
20
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."

आजपासून नवी आॅनलाइन प्रवेश प्रक्रिया

By admin | Updated: August 5, 2016 01:51 IST

अकरावीच्या पहिल्या आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेला मुकलेल्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षण उपसंचालक कार्यालयाने गुरुवारी पाचवी गुणवत्ता यादी जाहीर केली

मुंबई : अकरावीच्या पहिल्या आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेला मुकलेल्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षण उपसंचालक कार्यालयाने गुरुवारी पाचवी गुणवत्ता यादी जाहीर केली आहे. या गुणवत्ता यादीसाठी अर्ज केलेल्या एकूण ९ हजार ६४९ विद्यार्थ्यांपैकी ९ हजार ६४५ विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर झाले असून केवळ चार विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत. तरी शुक्रवारी, ५ आॅगस्टपासून सुरू होणाऱ्या नव्या विशेष आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेत उर्वरित विद्यार्थ्यांसोबत दूरचे महाविद्यालय मिळालेले, शाखा बदल करायचे आहे, अशा सर्व विद्यार्थ्यांना प्रवेशाची शेवटची संधी मिळणार आहे.प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, याआधी अर्धवट अर्ज भरलेल्या आणि अर्जच न केलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशापासून वंचित राहावे लागले होते. अशा विद्यार्थ्यांसाठी सोमवारी आणि मंगळवारी नोंदणी सुरू ठेवण्यात आली. एकूण ९ हजार ६४९ विद्यार्थ्यांनी अर्ज पूर्ण भरून नोंदणी केली होती. त्यापैकी ९ हजार ६४५ म्हणजेच ९९ टक्क्यांहून अधिक विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेश मिळणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे प्रवेश मिळालेल्या एकूण विद्यार्थ्यांपैकी ८ हजार ३३५ विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीच्या महाविद्यालयात प्रवेश मिळाले आहेत. तर ७४२ विद्यार्थ्यांना दुसऱ्या आणि २८६ विद्यार्थ्यांना तिसऱ्या क्रमांकावरील पसंतीच्या महाविद्यालयात प्रवेश मिळाला आहे. शुक्रवारी आणि शनिवारी संबंधित विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात प्रवेश निश्चित करायचा आहे.प्रवेशापासून वंचित राहिलेल्या चार विद्यार्थ्यांना शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या विशेष आॅनलाइन प्रक्रियेद्वारे प्रवेशाची संधी उपलब्ध आहे. या विशेष फेरीत सर्व विद्यार्थ्यांना सामील होण्याची संधी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे यापूर्वी दूरच्या महाविद्यालयात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना रिक्त जागा असलेल्या नजीकच्या महाविद्यालयात प्रवेश घेण्याची संधी मिळणार आहे. शिवाय ज्या विद्यार्थ्यांना विषय किंवा शाखा बदल करायचा आहे, त्यांनाही या विशेष फेरीमध्ये बदल करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या फेरीत सामील होण्यासाठी याआधी घेतलेला प्रवेश रद्द करण्याची गरज नाही. विशेष फेरीत आवडत्या महाविद्यालयात प्रवेश निश्चित झाल्यानंतरच जुन्या महाविद्यालयातील प्रवेश रद्द करण्याचा सल्ला प्रशासनाने दिला आहे. (प्रतिनिधी)>विशेष फेरीत सामील होण्यासाठी५ व ६ आॅगस्ट रोजी नवीन लॉगइन आयडी आणि पासवर्ड तयार करावा लागेल.८ व ९ आॅगस्ट रोजी आॅनलाइन पद्धतीने नवीन अर्ज भरता येईल. शिवाय अर्ज भरताना केवळ १० महाविद्यालयांची निवड करायची आहे. महाविद्यालय निवड करताना क्षेत्र किंवा वॉर्डचे बंधन नाही.११ आॅगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता पहिली विशेष फेरी जाहीर होईल.१२ व १३ आॅगस्ट रोजी विशेष फेरीत ज्या महाविद्यालयात नाव निश्चित होईल, तिथे प्रवेश निश्चित करावा लागेल.