शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
2
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
3
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
4
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
5
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
6
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
7
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
8
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
9
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
10
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
11
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
12
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
13
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
14
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
15
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
16
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
17
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
18
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
19
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
20
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला

गरज भासल्यास बैलगाडा शर्यतीसाठी नवा कायदा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2021 08:52 IST

पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार : शर्यत आणि सरावाबाबत महिनाभरात मार्ग काढणार

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई :  बैलगाडी शर्यत आणि शर्यतींच्या सरावासाठी संविधान आणि घटनेचा आदर करत कायद्याच्या चौकटीत राहून मार्ग काढण्याचा प्रयत्न करण्यात येईल. यासंदर्भात महिनाभरात योग्य तो निर्णय घेण्याचा आमचा प्रयत्न आहे. सध्या ज्या राज्यात बैलगाडी शर्यत सुरु आहे त्यांचाही अभ्यास करण्यात येणार आहे. तसेच गरज भासल्यास यासाठी नवीन कायदा करण्याचाही सरकारचा विचार असल्याची माहिती पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांनी दिली.

बैलगाडी शर्यत पुन्हा सुरू करण्याची मागणी सध्या जोर धरू लागली आहे. यासाठी लोकप्रतिनिधींसह विविध संघटना आक्रमक पवित्र्यात आहेत. या पार्श्वभूमीवर मंगळवारी मंत्रालयातील त्रिमूर्ती जवळच्या खुल्या प्रांगणात बैलगाडी शर्यत पुन्हा सुरु करण्याविषयक बैठक घेण्यात आली. या बैठकीस जलसंपदा मंत्री जयंत पाटील, राज्यमंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील, आमदार शशिकांत शिंदे, निलेश लंके, किसन काथोरे, अनिल बाबर, संजय जगताप, संग्राम जगताप, संग्राम थोपरे यांच्यासह राज्यातील बैलगाडी मालक आणि संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी मंत्री केदार म्हणाले की, राज्यात बैलगाडी शर्यतीची सांस्कृतिक परंपरा आहे. बैलगाडी शर्यतीच्या आवडीमुळे देशी जनावरांचे गाय आणि बैलांचे चांगल्या पद्धतीने संगोपन केले जाते.

याकरिता बैलांचा सराव आणि शर्यत पूर्ववत सुरु करण्यासाठी महिनाभरात मार्ग काढण्यात येईल. राज्यात खिलार जातीचे बैल नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. या जातीचे संवर्धन होण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. ही जात फक्त शर्यतीसाठीच नाही तर दूध उत्पादन आणि पैदास वाढविण्यासाठीही महत्त्वाची आहे. यामुळे देशी जनावरांच्या संगोपनास प्राधान्य देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. सक्षमपणे न्यायालयात बाजू मांडण्यासाठी वरिष्ठ कायदा सल्लागारांचीही मदत घेतली जाणार असल्याचे मंत्री केदार यांनी सांगितले.

कायदा सल्लागारांची मदतखिलार बैल शर्यतीसाठीच नाही तर दूध उत्पादन आणि पैदाशीसाठीही महत्त्वाची आहे. सक्षमपणे न्यायालयात बाजू मांडण्यासाठी वरिष्ठ कायदा सल्लागारांचीही मदत घेतली जाणार आहे.

टॅग्स :Bull Cart Raceबैलगाडी शर्यतSunil Kedarसुनील केदार