शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

शिंदे सरकारबाबत नवा पेच; सत्ता स्थापनेबाबतच्या पाठिंब्याची कागदपत्रे राज्यपाल सचिवालयाकडे नाहीत

By नारायण जाधव | Updated: August 25, 2022 15:44 IST

दोन्ही पक्षांनी एकमेकांना सत्ता स्थापण्याबाबत पाठिंबा देण्याविषयी कागदपत्रे दिलेली नसतील तर मग, सरकार स्थापनेसाठी राज्यपालांनी कोणत्या मुद्याच्या आधारे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना पाचारण केले, असा प्रश्न जाधव यांनी केला आहे.

नवी मुंबई : महाविकास आघाडी सरकारमधील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यानंतर शिवसेनेने भारतीय जनता पक्षाला सरकार स्थापनेसाठी पाठिंबा देण्याबाबत शिवसेनेच्या कार्यकारी मंडळाच्या ठरावाची वा भारतीय जनता पक्षाने सरकार स्थापनेसाठी शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबतच्या ठरावाची कागदपत्रे राज्यपालांच्या सचिवालयाकडे उपलब्ध नसल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. 

नवी मुंबईतील सामाजिक कार्यकर्ते संतोष जाधव यांनी माहिती अधिकारांतर्गत चार प्रश्न विचारून ही कागदपत्र मागविली होती. त्यावर राज्यपाल सचिवालयातील सामान्य माहिती अधिकारी विक्रम निकम यांनी सदरहू मुद्यांची माहिती आमच्या कार्यालयात उपलब्ध नसल्याचे उत्तर त्यांना दिले आहे. दोन्ही पक्षांनी एकमेकांना सत्ता स्थापण्याबाबत पाठिंबा देण्याविषयी कागदपत्रे दिलेली नसतील तर मग, सरकार स्थापनेसाठी राज्यपालांनी कोणत्या मुद्याच्या आधारे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना पाचारण केले, असा प्रश्न जाधव यांनी केला आहे.

कोणती माहिती मागविली होती१- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर शिवसेनेने भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रात सरकार स्थापनेसाठी पाठिंबा देण्याबाबत शिवसेनेच्या कार्यकारी मंडळाने मंजूर केलेल्या व विधानसभा सचिवालयात सादर केलेल्या अधिकृत ठरावाची छायांकित प्रमाणित प्रत मिळावी.२- शिवसेनेने विधानसभा सचिवालयात भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रात सरकार स्थापनेसाठी पाठिंबा देण्याबाबत दिलेल्या पत्राची छायांकित प्रमाणित प्रत मिळावी.३- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर शिवसेनेने भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रात सरकार स्थापनेसाठी पाठिंबा देण्याबाबत भाजपच्या कार्यकारी मंडळाने मंजूर केलेल्या व विधानसभा सचिवालयात सादर केलेल्या अधिकृत ठरावाची छायांकित प्रमाणित प्रत मिळावी.४ - भाजपने विधानसभा सचिवालयात शिवसेनेला महाराष्ट्रात सरकार स्थापनेसाठी पाठिंबा देण्याबाबत दिलेल्या पत्राची छायांकित प्रमाणित प्रत मिळावी.

या सर्व प्रश्नांवर राज्यपाल सचिवालयातील सामान्य माहिती अधिकारी विक्रम निकम यांनी सदरहू माहिती या कार्यालयात उपलब्ध नाही, असे उत्तर माहिती अधिकारांतर्गत दिले आहे.

दुसऱ्या एका अर्जाद्वारे संतोष जाधव यांनी राज्यपालांच्या कार्यालयाकडे २०२२ मध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर महाराष्ट्रात सरकार स्थापनेसाठी आणि बहुमत सिद्ध करण्यासाठी भारतीय जनता पक्ष किंवा इतर पक्षास राज्यपालांनी दिलेल्या पत्राची छायांकित प्रमाणित प्रत मागितली होती. मात्र, ही कागदपत्रे राज्यपालांकडेच असून सचिवालयाकडे अद्याप उपलब्ध नसल्याचे उत्तर विक्रम निकम यांनी दिले आहे.

राज्यपाल सचिवालयाने दिलेल्या या माहितीनंतर आता राज्यातील एकनाथ शिंदे सेना, भाजप आणि महाविकास आघाडीतील उद्धव ठाकरे सेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे पक्ष काय भूमिका घेतात, याकडे लक्ष लागले आहे.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMaharashtraमहाराष्ट्रPoliticsराजकारण