शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
3
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
4
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
5
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
6
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
7
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
8
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
9
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
10
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

नवीन बांधकामांवरील स्थगिती उठविली! ठाणे-पुण्यातील बांधकामे; अपुरा पाणीपुरवठा केल्यास पुन्हा स्थगिती, हायकोर्टाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2017 04:26 IST

महापालिका अपुरा पाणीपुरवठा करत असल्याने ठाण्यातील घोडबंदर, तसेच पुण्यातील बालेवाडी व बाणेर परिसरात नवे बांधकाम करण्यास उच्च न्यायालयाने एप्रिल २०१७ मध्ये स्थगिती दिली होती.

मुंबई : महापालिका अपुरा पाणीपुरवठा करत असल्याने ठाण्यातील घोडबंदर, तसेच पुण्यातील बालेवाडी व बाणेर परिसरात नवे बांधकाम करण्यास उच्च न्यायालयाने एप्रिल २०१७ मध्ये स्थगिती दिली होती. बुधवारी ही स्थगिती हटवत दोन्ही पालिकांना या परिसरातील नव्या बांधकामांना सीसी (कमेन्समेंट सर्टिफिकीट) व ओसी (आॅक्युपेशन सर्टिफिकीट) देण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले. मात्र, भविष्यात अपुरा पाणीपुरवठा केल्यास पुन्हा स्थगिती देण्याचा इशाराही दिला.उन्हाळ्यात ठाण्याच्या घोडबंदर आणि पुण्याच्या बालेवाडी व बाणेर परिसरातील इमारतीतील रहिवाशांना अपुरा पाणीपुरवठा करण्यात आल्याने संबंधित पालिकांविरुद्ध दोन जनहित याचिका दाखल करण्यात आल्या. या याचिकांवरील सुनावणी मुख्य न्या. मंजुळा चेल्लूर व न्या. नितीन जामदार यांच्या खंडपीठापुढे होती. रहिवाशांना पुरेसे पाणी न देता उपलब्ध पाण्यापैकी बरेचसे पाणी नवीन बांधकामांकरिता वळते केले जात असल्याचा आरोप दोन्ही याचिकांमध्ये आहे.नागरिकांची ‘तहान’ न भागवणा-या दोन्ही पालिकांना फैलावर घेत एप्रिल २०१७ मध्ये याठिकाणी नवी बांधकामे उभारण्यास उच्च न्यायालयाने मनाई केली होती. ‘येथील सोसायट्यांना पाणी पुरवठा संबंधी तक्रारी असतील तर याचिका दाखल करण्याचे जाहीर आवाहन आम्ही केले होते. मात्र कोणतीही सोसायटी उच्च न्यायालयात आली नाही. म्हणजे याचिकाकर्त्यांनी जेवढी पाण्याची कमतरता असल्याचे चित्र रंगवले तेवढी गंभीर समस्या नसावी. परंतु, या दोन्ही जिल्ह्यांत पाण्याची समस्या नाही, असे मत आम्ही व्यक्त करू शकत नाही. मात्र ही स्थगिती कायम ठेवली, तर ज्यांनी येथे फ्लॅट घेतले आहेत, त्यांना समस्यांना सामोरे जावे लागेल. त्यामुळे जर नवी बांधकामे बांधली आहेत त्यांना ओसी द्या व नवी बांधकामांसाठी सीसी द्या,’ असे न्यायालयाने सांगितले.समिती स्थापन करण्याचे निर्देशपाणी समस्या दूर करण्यासाठी दोन्ही पालिकांना महसूल विभागाचे विभागीय आयुक्त, संबंधित पालिकांचे आयुक्त, मुख्य अभियंते (पाणीपुरवठा विभाग) आणि त्या जिल्'ातील विधि सेवा विभागाचे सचिव यांची एक समिती स्थापण्याचे निर्देश न्यायालयाने दिले. या समितीला दोन महिन्यांतून एकदा बैठक घेऊन नागरिकांच्या पाणीपुरवठा संबंधित तक्रारींचे निवारण करण्याचे निर्देश दिले. तसेच समितीला दोन महिन्यांनी अहवालही सादर करण्यास सांगितले.

टॅग्स :Mumbai High Courtमुंबई हायकोर्टthaneठाणेPuneपुणे