शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...  
3
Ahmedabad Plane Crash: टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर
4
आता 'या' देशावर तुटून पडण्याच्या तयारीत इस्रायल! अमेरिकेनं दूतावासही केले खाली; का वाढली एवढी भीती?
5
"सगळं तिनेच केलं, मी नकार दिलेला अन्..."; पोलिसांनी मुसक्या आवळताच सोनमच्या बॉयफ्रेंडची पलटी! 
6
Sankashti Chaturthi 2025: संकष्टीला उपासाबरोबरच 'ही' उपासना कराल, तर होईल अधिक लाभ!
7
चांदीचा दर १ लाख ९ हजारांवर, सोनंही लाखांच्या पार; पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
8
Ahmedabad Plane Crash Live: भीषण! अहमदाबादमध्ये मोठी दुर्घटना, Air India चं विमान कोसळलं, होते २४२ प्रवासी
9
Ahmedabad Plane Crash: विमानाची राखरांगोळी, इमारती कोसळल्या, वाहनांचे सांगाडे; अहमदाबाद दुर्घटनेची भयावह दृश्यं...
10
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
11
Ahmedabad Plane Crash : 242 प्रवासी, 1:17 ला टेकऑफ अन् 1:20 ला क्रॅश...विमान अपघाताचे ताजे अपडेट
12
एअर इंडिया विमान अपघाताने टाटा ग्रुपला मोठा धक्का! 'या' शेअर्समध्ये झाली सर्वाधिक घसरण!
13
Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातानंतर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी दिले 'हे' महत्त्वाचे निर्देश! म्हणाले... 
14
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीवितहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?
15
"...तोपर्यंत चहा उकळत राहील"; हुंड्यासाठी छळाचा आरोप, तरुणाने सासरीच सुरू केली टपरी
16
Plane Crash: अहमदाबादमध्ये प्रवासी विमानाच्या अपघातानंतर एअर इंडियाचे ट्विट, दिली महत्त्वाची माहिती
17
Video: आकाशात धूरांचे लोट, अहमदाबाद विमान अपघाताचा व्हिडीओ आला समोर
18
Sankashti Chaturthi 2025: ज्येष्ठ महिन्यातील संकष्ट चतुर्थी, 'या' ९ राशींवर होणार बाप्पाचा कृपावर्षाव!
19
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
20
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?

नवीन बांधकामांवरील स्थगिती उठविली! ठाणे-पुण्यातील बांधकामे; अपुरा पाणीपुरवठा केल्यास पुन्हा स्थगिती, हायकोर्टाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2017 04:26 IST

महापालिका अपुरा पाणीपुरवठा करत असल्याने ठाण्यातील घोडबंदर, तसेच पुण्यातील बालेवाडी व बाणेर परिसरात नवे बांधकाम करण्यास उच्च न्यायालयाने एप्रिल २०१७ मध्ये स्थगिती दिली होती.

मुंबई : महापालिका अपुरा पाणीपुरवठा करत असल्याने ठाण्यातील घोडबंदर, तसेच पुण्यातील बालेवाडी व बाणेर परिसरात नवे बांधकाम करण्यास उच्च न्यायालयाने एप्रिल २०१७ मध्ये स्थगिती दिली होती. बुधवारी ही स्थगिती हटवत दोन्ही पालिकांना या परिसरातील नव्या बांधकामांना सीसी (कमेन्समेंट सर्टिफिकीट) व ओसी (आॅक्युपेशन सर्टिफिकीट) देण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले. मात्र, भविष्यात अपुरा पाणीपुरवठा केल्यास पुन्हा स्थगिती देण्याचा इशाराही दिला.उन्हाळ्यात ठाण्याच्या घोडबंदर आणि पुण्याच्या बालेवाडी व बाणेर परिसरातील इमारतीतील रहिवाशांना अपुरा पाणीपुरवठा करण्यात आल्याने संबंधित पालिकांविरुद्ध दोन जनहित याचिका दाखल करण्यात आल्या. या याचिकांवरील सुनावणी मुख्य न्या. मंजुळा चेल्लूर व न्या. नितीन जामदार यांच्या खंडपीठापुढे होती. रहिवाशांना पुरेसे पाणी न देता उपलब्ध पाण्यापैकी बरेचसे पाणी नवीन बांधकामांकरिता वळते केले जात असल्याचा आरोप दोन्ही याचिकांमध्ये आहे.नागरिकांची ‘तहान’ न भागवणा-या दोन्ही पालिकांना फैलावर घेत एप्रिल २०१७ मध्ये याठिकाणी नवी बांधकामे उभारण्यास उच्च न्यायालयाने मनाई केली होती. ‘येथील सोसायट्यांना पाणी पुरवठा संबंधी तक्रारी असतील तर याचिका दाखल करण्याचे जाहीर आवाहन आम्ही केले होते. मात्र कोणतीही सोसायटी उच्च न्यायालयात आली नाही. म्हणजे याचिकाकर्त्यांनी जेवढी पाण्याची कमतरता असल्याचे चित्र रंगवले तेवढी गंभीर समस्या नसावी. परंतु, या दोन्ही जिल्ह्यांत पाण्याची समस्या नाही, असे मत आम्ही व्यक्त करू शकत नाही. मात्र ही स्थगिती कायम ठेवली, तर ज्यांनी येथे फ्लॅट घेतले आहेत, त्यांना समस्यांना सामोरे जावे लागेल. त्यामुळे जर नवी बांधकामे बांधली आहेत त्यांना ओसी द्या व नवी बांधकामांसाठी सीसी द्या,’ असे न्यायालयाने सांगितले.समिती स्थापन करण्याचे निर्देशपाणी समस्या दूर करण्यासाठी दोन्ही पालिकांना महसूल विभागाचे विभागीय आयुक्त, संबंधित पालिकांचे आयुक्त, मुख्य अभियंते (पाणीपुरवठा विभाग) आणि त्या जिल्'ातील विधि सेवा विभागाचे सचिव यांची एक समिती स्थापण्याचे निर्देश न्यायालयाने दिले. या समितीला दोन महिन्यांतून एकदा बैठक घेऊन नागरिकांच्या पाणीपुरवठा संबंधित तक्रारींचे निवारण करण्याचे निर्देश दिले. तसेच समितीला दोन महिन्यांनी अहवालही सादर करण्यास सांगितले.

टॅग्स :Mumbai High Courtमुंबई हायकोर्टthaneठाणेPuneपुणे