शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

'विरोधकांना निव्वळ पोटदुखी; स्वत:च्या बुडाखाली बघा'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2020 04:03 IST

मुख्यमंत्र्यांचा भाजपवर हल्लाबोल

मुंबई : उगाच अमाप सांगायचं अन् नंतर उताणं पडायचं असं आमचं नाही. आम्ही जे करतोय ते जनतेला दिसतंय, त्यांचा विश्वास आहे; पण विरोधकांना निव्वळ पोटदुखी झाली असल्याने दिसत नसावं. ज्यांचं वय सहा ते अठरा वर्षांदरम्यान असेल तर त्यांनाही आमची कामं दिसावीत म्हणून चष्मे देऊ. भाजपच्या राज्यांमधील कायदा-सुव्यवस्थेचं काय? आधी स्वत:च्या बुडाखाली बघा, असा हल्लाबोल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधिमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित पत्रकार परिषदेत केला.महिलांवरील अत्याचार ही शरमेची बाब आहेच. ते रोखण्यासाठी आम्ही कठोर कायदा आणतोय, पण उत्तर प्रदेशात दंगली होतायेत, दिल्ली जिथे पोलीस केंद्राचे आहेत तिथे शाहीनबाग घडतेय, जेएनयूमध्ये अतिरेकी घुसले. मारहाण केली, पण त्यांना पकडले नाही. भाजपवाल्यांनी स्वत:च्या बुडाखाली जळतंय की बर्फ ठेवलाय तेवढं पाहून घ्यावं, असा टोलाही त्यांनी हाणला.शेतकरी कर्जमाफी, पाच दिवसांचा आठवडा, मुलांना मोफत चष्मे, शिवभोजन योजना या उपलब्धींचा उल्लेख करून ते म्हणाले की, आमचे सरकार स्थिरावले आहे आणि काम करतेय पण ते विरोधकांच्या पचनी पडत नाही. विरोधकांनी चांगल्याला निदान चांगलं म्हणावं, अशी अपेक्षा ठाकरे यांनी व्यक्त केली. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयीचा बोर्ड अंदमानच्या कारागृहात काढला गेला तेव्हा भाजपचे राम कापसे हे तिथे नायब राज्यपाल होते. तेव्हा भाजपने काही हरकत घेतली नव्हती. सावरकरांना पुण्यतिथीनिमित्त आदरांजली वाहणारा ठराव आणायचे काय ते पाहू पण हिंदुत्व, सावरकर ही काही भाजपची मक्तेदारी नाही, अशी प्रतिक्रिया ठाकरे यांनी एका प्रश्नात सांगितले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तूर खरेदीत दिरंगाई होत नसल्याचे सांगितले.गृहमंत्री अनिल देशमुख यांनी यावेळी अलिकडे हैदराबादला जाऊन दिशा कायद्याची घेतलेली माहिती आणि महिला अत्याचार रोखण्यासाठी राज्यात येणारा कायदा या बाबत पत्रकारांना माहिती दिली. पाच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची समिती नेमली असून ती सरकारला लवकरच अहवाल देईल व पुढील अधिवेशनात त्यासंबंधीचा कायदा केला जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.आमची नाराजी आहेचभीमा-कोरेगाव प्रकरणी एल्गार परिषदेच्या संदर्भातील चौकशी केंद्र सरकारने एनआयएकडे ज्या पद्धतीने दिली त्याबाबत आमची नाराजी आहेच. राज्याच्या तपास यंत्रणेवर एकप्रकारे अविश्वास दाखविण्यात आला आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.एनपीआर : मंत्र्यांची समिती नेमणार‘सीएए’बाबत मी माझी भूमिका आधीच स्पष्ट केली आहे. एनपीआरमध्ये नेमक्या कोणत्या त्रुटी आहेत, हे तपासण्यासाठी जबाबदार मंत्र्यांची समिती नेमणार आहोत, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाShiv Senaशिवसेना