शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

संचमान्यतेमुळे रात्रशाळांतील शिक्षक बेरोजगार

By admin | Published: May 30, 2016 3:51 AM

रात्रशाळांसाठी २८ आॅगस्ट २०१५च्या निकषानुसारच संचमान्यता होत असल्याने अनेक शिक्षकांवर नोकरी गमावण्याची वेळ आली

मुंबई : मुंबईसह राज्यातील रात्रशाळांसाठी २८ आॅगस्ट २०१५च्या निकषानुसारच संचमान्यता होत असल्याने अनेक शिक्षकांवर नोकरी गमावण्याची वेळ आली आहे. त्यामुळे शासन निर्णयातील उल्लेखाप्रमाणे रात्रशाळांसाठी वेगळे निकष लावण्याची मागणी शिक्षक परिषदेने केली आहे.शासन निर्णयामध्ये उल्लेख असतानाही रात्रशाळांत जुन्या निकषांनुसार संचमान्यता होत असल्याची माहिती शिक्षक परिषदेने दिली आहे. शिक्षक आमदार रामनाथ मोते म्हणाले की, जुन्या संचमान्यतेच्या निकषांमुळे अनेक रात्रशाळांतील शिक्षकांना नोकरी गमवावी लागत आहे. तरी रात्रशाळांची संचमान्यता करताना शासनाने जाहीर केलेले वेगळे निकष लावण्याची गरज मोते यांनी शालेय शिक्षण विभागाकडे केली आहे.मुंबईसह राज्यात १७६ रात्रशाळा आहेत. त्यांत शेकडो शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी काम करतात. मात्र या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अर्धवेळ समजले जाते. त्यामुळे त्यांना पूर्णवेळ शिक्षकाच्या वेतनश्रेणीच्या निम्मी वेतनश्रेणी दिली जाते. बहुतेक रात्रशाळांतील अनेक शिक्षक हे फक्त संबंधित रात्रशाळेतच काम करीत आहेत. परिणामी, संचमान्यतेच्या जाचक निकषांमुळे अशा अनेक अर्धवेळ शिक्षकांना नोकरी गमावून घरी बसावे लागेल, असा आरोप शिक्षक परिषदेचे अनिल बोरनारे यांनी केला आहे. (प्रतिनिधी)>विद्यार्थ्यांचेही नुकसान२० नोव्हेंबर २०१३च्या शासन निर्णयात रात्रशाळांच्या संचमान्यतेबाबत वेगळे निकष लवकरच जाहीर केले जातील, असा स्पष्ट उल्लेख आहे. मात्र दोन वर्षे उलटली तरी याबाबत वेगळे निकष जाहीर झालेले नाहीत. उलट शिक्षणाधिकारी २८ आॅगस्ट २०१५च्या नियमित शाळांच्या निकषानुसार रात्रशाळांची संचमान्यता करीत आहेत. त्यामुळे अनेक शिक्षकांना नोकरी गमवावी लागेलच, मात्र शाळा बंद झाल्यास विद्यार्थीही शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर पडण्याची भीती शिक्षक परिषदेने व्यक्त केली आहे. म्हणूनच शिक्षण विभागाने रात्रशाळांचे निकष जाहीर होत नाही, तोपर्यंत रात्रशाळांची संचमान्यता करू नये, अशी मागणीही शिक्षक परिषदेने केली आहे.