शहरं
Join us  
Trending Stories
1
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
2
“काँग्रेसचे पाक प्रेम उतू चाललेय, ऑपरेशन सिंदूरचा हिशोब विचारणारे देशद्रोही”: एकनाथ शिंदे
3
भारतीय बाजारात उद्याच स्वस्तातली सात सीटर कार लाँच होणार; अर्टिगा, ट्रायबरला मिळणार टक्कर...
4
स्वस्त 'पर्सनल लोन'च्या शोधात आहात? 'या' ५ बँकांमध्ये मिळतोय सर्वात कमी व्याजदर; १२ लाखांचा EMI किती?
5
क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट, कोणत्याही क्षणी अटक होणार, आमदारकीही जाणार?
6
PM मोदी जॉर्डन-ओमान दौऱ्यावर, तर जयशंकर इजराइलमध्ये; भारताचा जगाला स्पष्ट संदेश..!
7
मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बुरखा हटवल्याने महिला डॉक्टर धक्क्यात; सरकारी नोकरी नाकारून सोडले राज्य
8
काव्या मारननं पारखलं सोनं! अनसोल्ड खेळाडूवर लावली बोली, त्यानं ४८ चेंडूत कुटल्या ७६ धावा
9
Post Office ची जबरदस्त स्कीम... घरबसल्या दर महिन्याला होईल २० हजार रुपयांची कमाई, कोणती आहे योजना, पाहा डिटेल्स
10
बुकिंग सुरू होताच 'या' कारवर तुटून पडले लोक, 24 तासांत 70000 यूनिट बूक; खिशात हवेत फक्त ₹21000
11
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दागिने घेताना १०० वेळा विचार करावा लागणार; चांदी २ लाखांच्या पार, सोन्याच्या दरातही मोठी तेजी
12
राजकीय सूडबुद्धीतून रचलेले प्रकरण, ईडी-सीबीआयचा गैरवापर; 'नॅशनल हेराल्ड'वरुन खरगेंची मोदी-शाहांवर टीका
13
...अन् त्यावेळी राष्ट्रपती बनण्याचा प्रस्ताव वाजपेयींनी नाकारला; 'अटल संस्मरण' पुस्तकात दावा
14
“मातोश्रीबाबत मनात आदर कायम, पण...”; शिंदे गटात प्रवेश करताच बड्या नेत्याने सगळेच सांगितले
15
Video - हार्ट अटॅकमुळे वेदनेने तडफडत होता पती; पत्नीने जोडले हात, पण कोणीच केली नाही मदत
16
शेतकऱ्यांसाठी मोठा अलर्ट! फार्मर आयडीशिवाय पीएम किसानचे पैसे येणार नाहीत; अशी तयार करा ID
17
‘मी काही चुकीचं बोललो नाही, माफी मागण्याचा प्रश्नच नाही..’, पृथ्वीराज चव्हाण ऑपरेशन सिंदूरबाबतच्या वक्तव्यावर ठाम  
18
BMC ELections: मुंबईत अजित पवार पडले एकटे, राष्ट्रवादीची किती जागांवर लढण्याची तयारी, बैठकीत काय झाला निर्णय? 
19
‘ते’ विधान भोवणार, संजय राऊत अडचणीत येणार?; गृहराज्यमंत्री म्हणाले, “…तर गुन्हा दाखल करू”
Daily Top 2Weekly Top 5

आमच्या वरचेही आमचं नेतृत्त्व मानत नाहीत - लक्ष्मण मानेंची खंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2019 21:44 IST

आमच्यासारख्या छोट्या जातींना राजकीय प्रतिनिधीत्त्व अजिबात मिळाले नाही.

पुणे : बौद्ध, वंजारी, मातंग आदी जातींना राजकीय प्रतिनिधीत्त्व मिळाले. पण आमच्यासारख्या छोट्या जातींना राजकीय प्रतिनिधीत्त्व अजिबात मिळाले नाही. जातीबद्ध समाजातले अगदी वरचे तर आम्हाला स्विकारतच नाहीत. पण उतरंडीत आमच्या वरअसणारेही आमचे नेतृत्त्व स्विकारत नाहीत, अशी खंत महाराष्ट्र बहुजन वंचित आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष लक्ष्मण माने यांनी व्यक्त केली.  बेलदार, कंजारभाट, वडार, कैकाडी यासारख्या बलुतेदारांमधल्या छोट्या जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती याच खºया अथार्ने वंचित आहेत. आम्हीच गेलो होतो प्रकाश आंंबेडकरांकडे आमचे नेतृत्त्व करा म्हणून सांगायला. पण उंट तंबूत शिरला आणि आम्हालाच बाहेर पडावे लागले. लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला मिळालेल्या ४१ लाख मतांमध्ये आमचाही वाटा मोठा आहे,ह्णह्ण असे माने यांनी स्पष्ट केले. मात्र आगामी विधानसभा निवडणुकीत आंबेडकर कॉंग्रेस आणि डाव्या पक्षांच्या आघाडीत सहभागी होणार असतील तर मी दोन मिनिटात माझा अजेंडा गुंडाळून त्यांच्यासोबत जाईन, असेही माने म्हणाले. शनिवारी (दि. ३) ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते. शासकीय आकडेवारीनुसार राज्यात विमुक्त जाती अणि भटक्या जमातींची संख्या १२ टक्के आहे. परंतु, गेल्या सत्तर वर्षात आम्हाला राजकीय प्रतिनिधीत्व दिले गेले नाही. अनुसूचित जाती जमातीतल्या कैक जाती सत्तेपासून कोसो दूर आहेत. आम्हाला सोडूनच ७० वर्षांचा कारभार झालेला आहे. त्यामुळे खरा वंचितांचा पक्ष आमचाच आहे. महाराष्ट्रीय मुस्लिमांची स्थितीसुद्धा आमच्यापेक्षा वेगळी नाही. त्यांचे नेतृत्त्वही राज्याबाहेरुन येणाºया श्रीमंत मुस्लिमांनी केले आहे, असे माने म्हणाले. 

तर राक्षसा बरोबरही जाऊविधानसभा निवडणुकीत आम्हाला जागा सोडण्यासंदर्भात कोणत्याच पक्षाने प्रतिसाद दिलेला नाही. येत्या ९ आॅगस्टपर्यंत कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस यांनी जागा वाटपासंबंधी आमच्याशी सन्मानपूर्वक बोलणी केली नाहीत तर आम्ही उजव्या, प्रतिगामी पक्षांबरोबरही तडजोड करु शकतो. परंतु, उपेक्षित वंचित समाजाला सत्तेत घेऊन गेल्याशिवाय थांबणार नाही. मग राक्षसाशी तडजोड करावी लागली तरी चालेल, असे लक्ष्मण माने म्हणाले. मात्र नंतर खुलासा करताना ते म्हणाले, की ह्यतिकडेह्ण रांगा लागल्या आहेत. आमची काय गरज त्यांना? आम्हाला ते घेणार नाहीत, आम्ही पण जाणार नाही. 

चौकट राज्यात साठ-सत्तर जागा लढवण्याचे आमचे नियोजन आहे. यातल्या पाच-सात जागा तर निश्चितपणे जिंकता येतील. ऐनवेळी उमेदवार ठरवणे शक्य नसल्याने स्वतंत्र लढण्याची तयारी आम्ही चालू केली आहे.-लक्ष्मण माने 

टॅग्स :PuneपुणेPoliticsराजकारणlaxman maneलक्ष्मण माने