शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

आमच्या वरचेही आमचं नेतृत्त्व मानत नाहीत - लक्ष्मण मानेंची खंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2019 21:44 IST

आमच्यासारख्या छोट्या जातींना राजकीय प्रतिनिधीत्त्व अजिबात मिळाले नाही.

पुणे : बौद्ध, वंजारी, मातंग आदी जातींना राजकीय प्रतिनिधीत्त्व मिळाले. पण आमच्यासारख्या छोट्या जातींना राजकीय प्रतिनिधीत्त्व अजिबात मिळाले नाही. जातीबद्ध समाजातले अगदी वरचे तर आम्हाला स्विकारतच नाहीत. पण उतरंडीत आमच्या वरअसणारेही आमचे नेतृत्त्व स्विकारत नाहीत, अशी खंत महाराष्ट्र बहुजन वंचित आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष लक्ष्मण माने यांनी व्यक्त केली.  बेलदार, कंजारभाट, वडार, कैकाडी यासारख्या बलुतेदारांमधल्या छोट्या जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती याच खºया अथार्ने वंचित आहेत. आम्हीच गेलो होतो प्रकाश आंंबेडकरांकडे आमचे नेतृत्त्व करा म्हणून सांगायला. पण उंट तंबूत शिरला आणि आम्हालाच बाहेर पडावे लागले. लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला मिळालेल्या ४१ लाख मतांमध्ये आमचाही वाटा मोठा आहे,ह्णह्ण असे माने यांनी स्पष्ट केले. मात्र आगामी विधानसभा निवडणुकीत आंबेडकर कॉंग्रेस आणि डाव्या पक्षांच्या आघाडीत सहभागी होणार असतील तर मी दोन मिनिटात माझा अजेंडा गुंडाळून त्यांच्यासोबत जाईन, असेही माने म्हणाले. शनिवारी (दि. ३) ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते. शासकीय आकडेवारीनुसार राज्यात विमुक्त जाती अणि भटक्या जमातींची संख्या १२ टक्के आहे. परंतु, गेल्या सत्तर वर्षात आम्हाला राजकीय प्रतिनिधीत्व दिले गेले नाही. अनुसूचित जाती जमातीतल्या कैक जाती सत्तेपासून कोसो दूर आहेत. आम्हाला सोडूनच ७० वर्षांचा कारभार झालेला आहे. त्यामुळे खरा वंचितांचा पक्ष आमचाच आहे. महाराष्ट्रीय मुस्लिमांची स्थितीसुद्धा आमच्यापेक्षा वेगळी नाही. त्यांचे नेतृत्त्वही राज्याबाहेरुन येणाºया श्रीमंत मुस्लिमांनी केले आहे, असे माने म्हणाले. 

तर राक्षसा बरोबरही जाऊविधानसभा निवडणुकीत आम्हाला जागा सोडण्यासंदर्भात कोणत्याच पक्षाने प्रतिसाद दिलेला नाही. येत्या ९ आॅगस्टपर्यंत कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस यांनी जागा वाटपासंबंधी आमच्याशी सन्मानपूर्वक बोलणी केली नाहीत तर आम्ही उजव्या, प्रतिगामी पक्षांबरोबरही तडजोड करु शकतो. परंतु, उपेक्षित वंचित समाजाला सत्तेत घेऊन गेल्याशिवाय थांबणार नाही. मग राक्षसाशी तडजोड करावी लागली तरी चालेल, असे लक्ष्मण माने म्हणाले. मात्र नंतर खुलासा करताना ते म्हणाले, की ह्यतिकडेह्ण रांगा लागल्या आहेत. आमची काय गरज त्यांना? आम्हाला ते घेणार नाहीत, आम्ही पण जाणार नाही. 

चौकट राज्यात साठ-सत्तर जागा लढवण्याचे आमचे नियोजन आहे. यातल्या पाच-सात जागा तर निश्चितपणे जिंकता येतील. ऐनवेळी उमेदवार ठरवणे शक्य नसल्याने स्वतंत्र लढण्याची तयारी आम्ही चालू केली आहे.-लक्ष्मण माने 

टॅग्स :PuneपुणेPoliticsराजकारणlaxman maneलक्ष्मण माने