शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

नोकरभरतीत अनाथ ‘दुर्लक्षित’; १ टक्का आरक्षण देण्याचा शासनालाच विसर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2018 06:58 IST

अनाथ पुन्हा एकदा नोकरभरतीत ‘दुर्लक्षित’च राहिल्याचे समोर आले आहे.

पुणे : नोकरभरतीमध्ये अनाथ मुलांना खुल्या प्रवर्गातून १ टक्का समांतर आरक्षण देऊ, असा शासन आदेश काढण्यात आला; मात्र शासनाच्याच विविध विभागांतर्गत सुमारे ३४२ पदांची भरती करिता काढण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेच्या जाहिरातीत याच अनाथांच्या आरक्षणाचा शासनाला विसर पडला आहे. अनाथ पुन्हा एकदा नोकरभरतीत ‘दुर्लक्षित’च राहिल्याचे समोर आले आहे.शासनाने मराठा आरक्षण लागू झाल्यानंतर राज्यातील विविध विभागांमध्ये सुमारे ७२ हजार विविध पदांची मेगा नोकरभरती करण्याची तयारी सुरू केली आहे. शासनाच्याच विविध विभागांतर्गत सुमारे ३४२ पदांच्या भरतीकरिता स्पर्धा परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यामध्ये अनुसूचित जाती-जमाती, भटक्या विमुक्त जाती-जमाती, मागासवर्गीय (सामाजिक/ शैक्षणिक) आणि खुल्या प्रवर्गामधील सर्वसाधारण, महिला, खेळाडू, दिव्यांग व्यक्तींचा समावेश करण्यात आला आहे. राज्य स्पर्धा परीक्षा सेवेमधून भरण्यात येणाऱ्या उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, पोलीस उपअधीक्षक, सहायक गटविकास अधिकारी, उद्योग सहसंचालक, उपशिक्षणाधिकारी, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी आदी विविध पदे भरण्यात येणार आहेत. मात्र, या जाहिरातीमध्ये अनाथांच्या आरक्षणाचा उल्लेखच केला गेला नसल्यामुळे अनाथांना नोकरभरतीपासून वंचित राहावे लागणार आहे.अनेक वर्षे सामाजिक अस्तित्वाशी लढा देणाºया अनाथांना शासकीय नोकऱ्यांमध्ये आरक्षण मिळविण्यासाठी झगडा द्यावा लागला. अखेर शासनाने अनाथांची दखल घेत नऊ महिन्यांपूर्वी महिला व बाल विकास विभागामार्फत अनाथ मुलांना खुल्या प्रवर्गातून १ टक्का समांतर आरक्षण देण्यासंबंधीचा आदेश काढला. त्यात बालगृहातील व इतर अनाथ मुलांपैकी महिला व बाल विकास विभागाकडून देण्यात येणारे अनाथ प्रमाणपत्र (ओळखपत्र) मुलांसाठीच हे आरक्षण लागू राहील, शासन सेवेतील प्रवेशासाठी अनाथ मुलांकरिता खुल्या प्रवर्गातून १ टक्का समांतर आरक्षण अ ते ड च्या सर्व पदांना लागू राहील, असा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे. मात्र, आपल्याच शासकीय अध्यादेशाचा शासनाला विसर पडला आहे. शासनाने दिलेले आरक्षण कागदावरच राहिल्याने नोकरभरतीतही मुले ‘अनाथ’ राहिले असल्याचे समोर आले आहे. यातच महिला व बाल विकास विभागाच्या अनाथ मुलांना देण्यात येणाºया ओळखपत्राबाबतही अनास्था दिसून आली आहे. २०१२पासून केवळ १८ ते २० जणांनाच ओळखपत्र मिळाले आहे. याचा अर्थ, राज्यात फक्त एवढेच अनाथ आहेत का? असा प्रश्नही यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.प्रमाणपत्राचा होणार नाही उपयोगनोकरभरतीसाठी दि. १० डिसेंबर रोजी अर्ज निघाले होते. त्याच दिवशी अर्ज केला होता. मात्र, तिथे अनाथांच्या आरक्षणाचा उल्लेख केलेला नाही. मला आई-वडील नाहीत, माझ्याकडे जातीचे प्रमाणपत्र नाही; त्यामुळे जरी खुल्या प्रवर्गातून अर्ज भरायचा म्हटले तरी जातीचे प्रमाणपत्र लागणारच. म्हणूनच मी अनाथ प्रमाणपत्र काढले आहे. त्याकरिता ‘अनाथ’ हा उल्लेख असणे आवश्यक आहे. शासनाने अनाथ मुलांना खुल्या प्रवर्गातून १ टक्का समांतर आरक्षण दिले आहे. मात्र, नोकरभरतीमध्ये अनाथ याचा कुठेही उल्लेखच करण्यात आलेला नाही.- अनाथ तरुणी

टॅग्स :jobनोकरीMantralayaमंत्रालय