शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

"नीलम गोऱ्हेंचे विधान मूर्खपणाचे, राऊत १०० टक्के बरोबर बोलले"; शरद पवार यांनी स्पष्ट केली भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2025 18:35 IST

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात नीलम गोऱ्हे यांनी केलेल्या आरोपांवर शरद पवार यांनी भाष्य केलं आहे.

Sharad Pawar on Neelam Gorhe : शिवसेना नेत्या आणि विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केला. साहित्य संमेलनाच्या कार्यक्रमात बोलताना नीलम गोऱ्हे यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत दोन मर्सिडिज गाड्या मिळाल्या की एक पद मिळतं ही वस्तुस्थिती आहे असा आरोप केला होता. यावरुन ठाकरे गट चांगलांच आक्रमक झाला आहे. संजय राऊत यांनी नीलम गोऱ्हे यांच्यावर टीका करताना शरद पवार गप्प कसे राहू शकतात? असं म्हटलं. यावर आता शरद पवार यांनी भाष्य केलं आहे. नीलम गोऱ्हे यांचे विधान मूर्खपणाचे होते यापेक्षा जास्त काही बोलायची आवश्यकता नाही, असं  शरद पवार यांनी म्हटलं आहे.

साहित्य संमेलनात बोलताना विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी उद्धव ठाकरेंवर आरोप केला.  उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत एका पदासाठी दोन मर्सिडीज द्याव्या लागत होत्या, असा दावा निलम गोऱ्हेंनी केला. त्यामुळे ठाकरे गटाकडून नीलम गोऱ्हेंवर टीका केली जात आहे. यावर  संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार आणि संमेलनाध्यक्ष तारा भवाळकर यांनीही निषेध व्यक्त करावा, अशी मागणी संजय राऊत यांनी केली होती. त्यानंतर शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत नीलम गोऱ्हे या गोष्टींबाबत तिथे भाष्य करायला नको होतं असं म्हटलं आहे.  

"संजय राऊत यांनी जे सांगितलं ते शंभर टक्के बरोबर आहे. प्रश्न असा आहे की नीलम गोऱ्हे यांनी या संबंधीचे भाष्य करायची आवश्यकता नव्हती. या अधिवेशनात सगळ्यांचा सहभाग आहे आणि त्याच्यामध्ये नाही त्या गोष्टी करायला नव्हत्या पाहिजेत. त्यांनी तिथे गाडीचा उल्लेख केला. मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या विधिमंडळात येऊन त्यांच्या चार टर्म झाल्या आहेत. या सगळ्या चार टर्म कशा मिळाल्या आहेत ते सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे. त्यांचा एकंदर तिथला सहभाग याची फारशी चर्चा न केलेली बरी. कारण त्यांची महाराष्ट्राच्या विधिमंडळात जी एन्ट्री झाली ती प्रकाश आंबेडकर यांच्या पक्षातून झाली. तो कालावधी संपल्यानंतर त्यांचा कालावधी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेला. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्यानंतर त्यांचा कालावधी शिवसेनेत गेला उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली. हल्ली असं दिसतंय एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली जी संघटना आहे त्याच्यामध्ये त्या आहेत. म्हणजे एका मर्यातीत काळामध्ये सगळ्या पक्षांचा अनुभव त्यांनी घेतलेला दिसतो. हा अनुभव लक्षात घेता त्यांनी असं भाष्य केलं नसतं तर योग्य झालं असतं," असं शरद पवार म्हणाले.

"त्यासंदर्भात संजय राऊत जे म्हणतात ते योग्य आहे संमेलनाचे आयोजक आहेत त्यांनी त्याबद्दलची नापसंती जाहीर व्यक्त केली आहे. त्यामुळे आता त्याच्यावर पडदा टाकायला हरकत नाही. यासंदर्भात साहित्य परिषदेचे पदाधिकारी आहेत त्यांनी माफी मागितली आहे. मी त्या कार्यक्रमाचा स्वागताध्यक्ष होतो. त्यामुळे संजय राऊतांना ही जबाबदारी माझ्यावर टाकायची असेल तर मला त्याबद्दल काही हरकत नाही," असंही शरद पवार म्हणाले. 

टॅग्स :akhil bharatiya marathi sahitya mahamandalअखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळNeelam gorheनीलम गो-हेSanjay Rautसंजय राऊतSharad Pawarशरद पवार