शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

Raj Thackeray: धर्मांध लोकांपासून महाराष्ट्राला वाचवण्याची गरज; अमोल मिटकरींनी लावला ‘तो’ व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2022 09:09 IST

महाराष्ट्र सुजाण आहे. कुणी कितीही आदळउपट केली तरी या राज्यात जातीय दंगली भडकणार नाहीत असं अमोल मिटकरी म्हणाले.

मुंबंई – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी औरंगाबादमध्ये जाहीर सभा घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर घणाघाती टीका केली. पवारांना हिंदू शब्दाची एलर्जी असल्याचा आरोप राज यांनी केला. त्याचसोबत राष्ट्रवादीची स्थापना झाल्यापासून राज्यात जातीवाद फोफाळला. जातीद्वेष शरद पवारांनी पसरवला असा आरोप करत औरंगाबादच्या सभेत राज ठाकरेंनी पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसला टार्गेट केले.

राज ठाकरेंच्या(MNS Raj Thackeray) या भाषणानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी(NCP Amol Mitkari) यांनी राज ठाकरेंचा उल्लेख करत ट्विटरवरून त्यांच्यावर निशाणा साधला आहे. यावेळी अमोल मिटकरींनी प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांच्या क्रांतीवीर सिनेमातील एक किस्सा शेअर करत म्हटलंय की, महाराष्ट्र सुजाण आहे. कुणी कितीही आदळउपट केली तरी या राज्यात जातीय दंगली भडकणार नाहीत. हिंदु मुस्लिम ही सद्भावना कायम ठेवणाऱ्या या महाराष्ट्राला धर्मांध लोकांपासून वाचवण्याची आज खऱ्या अर्थाने गरज आहे असं त्यांनी सांगितले आहे.

ठाण्याच्या उत्तर सभेनंतर औरंगाबाद येथे होणाऱ्या मराठवाडा सांस्कृतिक मंडळावरच्या राज ठाकरेंच्या सभेकडे सर्वांचे लक्ष लागले होते. या सभेची तुलना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या या मैदानावर झालेल्या सभांशी झाली. बाळासाहेब ठाकरे यांच्या दोन सभा १९८८ साली  या मैदानावर झाल्या होत्या. तीच किंबहुना त्यापेक्षा जास्त  गर्दी, तसाच जोष, जल्लोष यावेळी दिसला. शिवसेनेसाठी ही खरी डोकेदुखी ठरू शकते असं राजकीय विश्लेषक सांगतात.

राज ठाकरेंनी केले शरद पवारांना टार्गेट

प्रबोधनकार ठाकरे यांच्यावरून शरद पवारांनी राज ठाकरेंना नेहमीच टार्गेट केले. मात्र औरंगाबादच्या सभेत राज ठाकरेंनी त्याचाच आधार घेत म्हटलं की, मी शरद पवार(Sharad Pawar) यांच्यासाठी काही संदर्भ आणलेत, शरद पवार हे स्वत: नास्तिक आहेत, तेच मी सभेत सांगितलं. मात्र, पवारांना ते झोंबलं, लागलं. त्यानंतर लगेचच पवारांचे मंदिरातले फोटो येऊ लागले. मात्र, पवारांच्या कन्या सुप्रिया सुळेंनी स्वत: लोकसभेत सांगितलं होतं की माझे वडील नास्तिक आहेत, असे राज म्हणाले. माझ्या भाषणांमुळे समाजात दुही माजतेय. राज्यासाठी, देशासाठी हे बरं नव्हे असं शरद पवार म्हणतात. राज्यात असे भेदाभेद कोणी निर्माण केले? राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर समाजात तेढ निर्माण झाली, हे मी आधीही म्हटलंय आणि आताही म्हणतोय. शरद पवार मला माझ्या आजोबांची पुस्तकं वाचण्याचा सल्ला देतात. ती पुस्तकं मी आधीच वाचली आहेत. तुम्ही केवळ तुम्हाला हवं तितकंच आणि सोयीचं वाचू नका. मी लेखकांची जात पाहून पुस्तकं वाचत नाही. मी मुळात जातच मानत नाही असं राज ठाकरे म्हणाले.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसेAmol Mitkariअमोल मिटकरीSharad Pawarशरद पवार