शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
4
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
5
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
6
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
7
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
8
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
9
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
10
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
11
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
12
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
13
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
14
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
15
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
16
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
17
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
18
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

मोदी सरकारविरोधात इंग्रजांच्या काळाप्रमाणे रस्त्यावर उतरण्याची गरज: नाना पटोले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2022 15:29 IST

भाजपाच्या विरोधात जे बोलतात त्यांच्या मागे चौकशी आणि केंद्रीय यंत्रणांचा ससेमिरा लावला जात आहे. महागाई, बेरोजगारी अशा अनेक मुद्द्यांवर केंद्र सरकार फेल झालं आहे.

भाजपाच्या विरोधात जे बोलतात त्यांच्या मागे चौकशी आणि केंद्रीय यंत्रणांचा ससेमिरा लावला जात आहे. महागाई, बेरोजगारी अशा अनेक मुद्द्यांवर केंद्र सरकार फेल झालं आहे. त्यामुळे केंद्राच्या अत्याचाराविरोधात आता इंग्रजांच्या काळाप्रमाणे रस्त्यावर उतरण्याची गरज आहे, असं वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलं आहे. 

केंद्र सरकारकडून केंद्रीय यंत्रणांचा कसा गैरवापर सुरू आहे हेच सांगायला शरद पवार पंतप्रधानांना भेटले, असं पटोले म्हणाले. तसेच संजय राऊत सरकारच्या विरोधात बोलत असतील आणि त्यासाठी लोकांचा पाठिंबा मिळत असेल तर त्यात वावगे काय, असेही ते म्हणाले. 

महाराष्ट्रात धार्मिक दंगली घडविण्याचा प्रयत्न सुरू झाला असून राजकीय पक्ष मशिदीवरील भोंगे काढावे असा फतवा काढत आहेत. याला भाजपाचे नेते पाठिंबा देत आहेत. म्हणजेच भाजपाचा राज्यात धार्मिक दंगल घडविण्याचा प्रयत्न आहे. महाराष्ट्राची जनता अशा प्रयत्नांना कधीही पाठिंबा देणार नाही, असं नाना पटोले म्हणाले. 

 

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेcongressकाँग्रेस