शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

टोळधाड रोखण्यासाठी सुदृढ संशोधनाची गरज

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2020 05:04 IST

महाराष्ट्रात टोळ प्रजनन होणार नाही : कृषी शास्त्रज्ञ डॉ. गोविंद गुजर यांची माहिती

विकास झाडे ।लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : देशात ‘टोळ’ चे संकट आले असले तरी महाराष्ट्रातील शेतजमीन टोळीला प्रजननासाठी पूरक नसल्याने महाराष्ट्रावरील हे संकट कायमचे नाही आणि लवकरच नाहीसे होईल, अशी माहिती दिल्लीच्या भारतीय कृषी अन्वेषण संस्थेतील कीडशास्त्र विभागाचे माजी अध्यक्ष डॉ. गोविंद गुजर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

डॉ. गुजर म्हणाले, महाराष्ट्रातील माती ही अधिक चिकट आहे. अलीकडच्या दिवसात ती कोरडी आणि उष्णही आहे. त्यामुळे टोळ अशा मातीत अंडी देऊ शकत नाही. अंडी दिली तरी त्यातून टोळीचे प्रजनन होणार नाही. टोळीचे सामान्य आयुष्यमान २ ते ३ महिने आहे, त्यामुळे महाराष्ट्रावरचे संकट कमी होईल. असे असले तरी आता टोळीने केलेला हल्लाबोल थांबविण्यासाठी शास्त्रोक्त प्रयोग करणे गरजेचे आहे. त्यासाठी भारत सरकारने किडांशी अनुमोदीत कीडनाशकांचा उपयोग करताना तत्परता आणि दक्षतेची आवश्यकता आहे.

महाराष्ट्रात टोळ थोपवून धरण्यासाठी गवत जाळणे, फटाके फोडणे असे प्रयोग केले जात आहेत. मात्र, ही पद्धत अत्यंत चुकीची आहे. त्याचा टोळीवर विशेष परिणाम होणार नाही. त्यापेक्षा निंबोळीच्या अर्कच्या फवारणीचा अधिक चांगला परिणाम होतो. कोरोनानंतर ‘टोळ’चे संकट हे देशासाठी आव्हान ठरले आहे. टोळधाडीस रोखण्यासाठी सुदृढ संशोधनाची गरज आहे. टोळधाडीवरील नियंत्रण आणि व्यवस्थापनावर खंत व्यक्त करताना डॉ.गुजर म्हणाले, टोळीने पाकिस्तान-भारत सीमेवर धाड टाकून दीड महिना होत आहे. राजस्थानच नव्हे तर पंजाब, मध्य प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र, उत्तर प्रदेशातील पिके उद्ध्वस्त होत आहेत. महाराष्ट्रात मे महिन्याच्या शेवटच्या आठवाड्यात अमरावती, नागपूर आणि वर्धा जिल्ह्यात टोळीने शेतीमालाचे नुकसान केले आहे. भारत सरकारच्या कृषी विभागाने पाकिस्तान-भारत सीमेवरील राज्यात दहा ‘टोळ सचेतना’केंद्रे उभारली आहेत.देशात कोठून आले टोळ?या टोळीचे प्रजनन आफ्रिकेच्या सोमालिया, इथोपिया, केनिया, दक्षिण सुदान, युगांडा, अरब प्रयाद्वीप, पेनिन्सुलाच्या यमन, ओमान आणि सौदी अरेबिया व दक्षिण पश्चिम आशियाच्या इराण आणि पाकिस्तानात जुलै ते आॅक्टोबर महिन्यात होते. भारतात ही टोळ आफ्रिका, अरब पेनिन्सुला आणि इराण, पाकिस्तानमार्गे आली आहे.100 हेक्टर परिसरात ८ कोटींपेक्षा अधिक टोळ असू शकतात व वाऱ्याच्या दिशेनुसार प्रत्येक दिवशी १५० कि.मी. उडू शकतात.2018 पासून अरबी समुद्रात येणाºया वादळाच्या (भारतीय निनो) प्रभावाने आफ्रिकेत पडणाºया पावसाने टोळ प्रजननासाठी उत्तम हवामान निर्माण झाले.हवामान बदलाचा हा परिणाम आहे. टोळ कोणत्याही पिकास नष्ट करते. संत्रा, पपई, आंबे, वांग्याची पाने खातात. टोळ लाखोंच्या संख्येने असल्याने पिकांचे खूप नुकसान होते. लगेच वाºयाच्या दिशेनुसार ते दुसरीकडील पिके शोधतात.

टॅग्स :Farmerशेतकरी