शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

कोयना-अलमट्टी प्राधिकरण करावे- पृथ्वीराज चव्हाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2019 06:10 IST

कावेरी प्राधिकरणाच्या धर्तीवर कोयना व अलमट्टी धरणांचेही प्राधिकरण स्थापन करण्यात यावे. त्यात राजकीय हस्तक्षेप न करता फक्त तज्ज्ञ अधिकाऱ्यांचा समावेश करावा.

क-हाड (जि.सातारा) : कावेरी प्राधिकरणाच्या धर्तीवर कोयना व अलमट्टी धरणांचेही प्राधिकरण स्थापन करण्यात यावे. त्यात राजकीय हस्तक्षेप न करता फक्त तज्ज्ञ अधिकाऱ्यांचा समावेश करावा. याबाबत सरकारने पुढाकार घेणे गरजेचे आहे. त्यामुळे भविष्यात दोन्ही धरणांतील पाणी सोडण्याच्या प्रश्नी योग्य नियोजन केले जाऊ शकेल आणि अशा प्रकारच्या पुराच्या संकटाचा सामना करता येईल, अशी सूचना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्य सरकारला केली आहे.अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे सांगली, कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रात जी पुराची आपत्ती आली, त्यामुळे अतोनात नुकसान झाले आहे. याकडे शासकीय यंत्रणेकडून मदत करण्याबाबत सरकारकडून अक्षम्य दुर्लक्ष झाले. अशी पूर परिस्थिती जर विदर्भात निर्माण झाली असती तर सरकार असे वागले असते का? असा सवाल चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत केला.चव्हाण म्हणाले, ‘पश्चिम महाराष्ट्रात निर्माण झालेल्या पूर परिस्थिती कमी करण्यात राज्य सरकार कमी पडले आहे. येथील पुरामुळे सांगली व कोल्हापूर जिल्ह्याचे न भूतो न भविष्यती असे नुकसान झाले आहे. सरकारमधील मंत्री गिरीश महाजन यांनी सांगली जिल्ह्यात पूरस्थितीची पाहणी करताना अत्यंत लाजीरवाणे वर्तन केले आहे. तर मदत व पुनर्वसन मंत्रीही उशिराने पोहोचले. अशा मंत्र्यांवर मुख्यमंत्र्यांनी कारवाई केली पाहिजे. एकीकडे मुख्यमंत्री पुराचे कोणीही राजकारण करू नका, असे बोलत आहेत. तर दुसरीकडे पूरग्रस्तांना केल्या जाणाºया शासकीय धान्यांच्या पिशव्यांवर स्वत:चे फोटो लावले जात आहेत. याची सखोल चौकशी करावी. दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई केली जावी, अशी मागणी त्यांनी केली.

टॅग्स :Prithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणcongressकाँग्रेस