ऊर्जा साठविण्यासाठी हायड्रोजन प्रयोगाची गरज
By Admin | Updated: January 16, 2016 01:44 IST2016-01-16T01:44:43+5:302016-01-16T01:44:43+5:30
जगभरात सध्या वीजेबाबत मोठे संंशोधन सुरू आहे. तथापि, दीर्घकालीन ऊर्जा साठवणीसाठी अनेक अडचणींचा डोंगर समोर उभा आहे. त्यामुळे यावर मात करायची झाल्यास हायड्रोजनसारख्या वायूंचे

ऊर्जा साठविण्यासाठी हायड्रोजन प्रयोगाची गरज
मुंबई : जगभरात सध्या वीजेबाबत मोठे संंशोधन सुरू आहे. तथापि, दीर्घकालीन ऊर्जा साठवणीसाठी अनेक अडचणींचा डोंगर समोर उभा आहे. त्यामुळे यावर मात
करायची झाल्यास हायड्रोजनसारख्या वायूंचे प्रयोग करावे लागतील, अशी सूचना आयआयटीचे माजी
संचालक प्रा. सुहास सुखात्मे यांनी केली.
भाभा अणुशक्ती केंद्र येथे आयोजित केलेल्या सुवर्णमहोत्सवी अखिल भारतीय मराठी विज्ञान अधिवेशनात ‘विज्ञानवेध २०२५’ उद्घाटनाप्रसंगी अध्यक्षीय भाषणात ते बोलत होते. सुखात्मे पुढे म्हणाले, देशातील लोक अजूनही गरिबीत जीवन कंठत आहेत. त्यांच्या आयुष्यात बदल घडवणे आवश्यक आहे. ऊर्जा, जल, वायू या सगळ््या स्रोतांचा लाभ सर्वस्तरांना मिळायला हवा. त्यामुळे देशाला अजून बराच लांबचा पल्ला गाठायचा आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानाने देश समृद्ध करायचा झाल्यास त्याला सर्वांचीच साथ लागणार आहे.
विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या या मेळ््यात विविध विज्ञान विषयक उपक्रम मांडण्यात आले आहेत. याला मोठ्या संख्येने तरुणाईची
उपस्थिती होती. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विविध पारितोषिकांचे वितरणही करण्यात आले. यात डॉ. माधुरी शानबाग, डॉ. ज्ञानेश्वर पाटील यांना उत्तम कामगिरीसाठी सन्मानित करण्यात आले. तर अन्न प्रक्रिया विषयात अमूल्य योगदान दिलेल्या प्रा. रेखा सिन्हा यांना प्रा. मनमोहन शर्मा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सुवर्णमहोत्सवी स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. अधिवेशनाच्या संधाकाळच्या सत्रात पद्मजा फेणाणी यांच्या बहारदार गायनाने रंगत भरली. (प्रतिनिधी)
‘विज्ञानाचा मातृभाषेतून प्रसार व्हावा’
विज्ञानाची संकल्पना सर्वसमावेशक आहे. विज्ञानात ठसा उमटवायचा असेल, तर विज्ञान घरोघरी पोहोचवणे आवश्यक आहे. त्यासाठी ‘मातृभाषेतून’ विज्ञानाचा प्रसार व्हायला हवा. तरच ‘मेक इन इंडिया’चा मंत्र खऱ्या अर्थाने देशाला लागू पडेल आणि प्रगतीच्या दिशेने देशाची आगेकूच होईल.
-डॉ. अनिल काकोडकर, ज्येष्ठ शास्त्रज्ञ.