शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
3
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
4
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
5
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
6
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
7
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
8
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
9
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
10
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
11
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
12
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
13
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
14
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
15
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
16
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
17
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
18
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
19
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
20
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर

काँग्रेसला संजीवनी देण्याची गरज, ज्येष्ठ समाजवादी विचारवंत भाई वैद्य यांचे मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2017 16:43 IST

पिंपरी-चिंचवड शहरात यशवंत वेणू सन्मान सोहळा मंगळवारी झाला. त्यात देशातील असहिष्णूतेचा विषय चर्चिला गेला. मोदी सरकारचे नाव न घेता, समाजवादी नेते आणि काँग्रेसच्या नेत्यांनी टीका केली. ‘देशातील सध्यातील स्थिती पाहता, काँग्रेसला संजीवनी देण्याची गरज आहे.

पिंपरी - पिंपरी-चिंचवड शहरात यशवंत वेणू सन्मान सोहळा मंगळवारी झाला. त्यात देशातील असहिष्णूतेचा विषय चर्चिला गेला. मोदी सरकारचे नाव न घेता, समाजवादी नेते आणि काँग्रेसच्या नेत्यांनी टीका केली. ‘देशातील सध्यातील स्थिती पाहता, काँग्रेसला संजीवनी देण्याची गरज आहे, यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचा आधार घेऊन नवीन मांडणी करायला हवी, असे मत ज्येष्ठ समाजवादी विचारवंत भाई वैद्य यांनी व्यक्त केले. तर ‘अहिसहिष्णूता वाढीस लागली आहे. जुण्या लोकांनी केलेले काम पुसण्याचे काम केले जात आहे, अशी टीका माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केली.

चिंचवड येथील आॅटो क्लस्टर सभागृहात महाराष्टÑाचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण स्मृती दिनानिमित्त यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानाच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांना यशवंत वेणू सन्मानाने गौरविण्यात आले.  व्यासपीठावर डॉ. डी. वाय पाटील अभिमत विद्यापीठाचे अध्यक्ष डॉ. पी. डी. पाटील, माजी आमदार उल्हास पवार आदी उपस्थित होते. यावेळी मोदी सरकारचे नाव न घेता भाई वैद्य आणि शिंदे यांनी असहिष्णूतेच्या विषयावर भाष्य केले. 

भाई वैद्य म्हणाले, ‘‘मी समाजवादी विचारांचा आणि काँग्रेसविषयी कसा काय बोलतो आहे, असा प्रश्न सर्वांना पडला असेल. पंरतु मी १९४६ मध्ये काँग्रेसचा काही काळ सदस्य होतो. त्यांनतर १९४८ नंतर समाजवादी विचारांचा पुरस्कर्ता झालो. आजची परिस्थिती पाहता वित्तीय भांडवलशाही उदयास येत आहे., काँग्रेसला संजीवनी देण्याची गरज आहे. त्यासाठी सुशीलकुमार यांनी प्रयत्न करण्याची गरज आहे. शेती आणि औद्योगिकरण विकासाचा मुद्दा यशवंतरांवानी मांडला होता. या विचारांचा पुरस्कार काँग्रेसने केला नाही. विचार या यशवंतरावांच्या विचाराची कास धरून औद्योगिकधोरण आणि शेतीला महत्त्व देऊन विकास साधता येणे शक्य आहे. काँग्रेसला संजीवनी देण्याची गरज आहे.’’

असहिष्णूतेच्या मुद्यांवर सुशीलकुमार शिंदे म्हणाले, ‘‘कांग्रेस जुन्या विचाराने चालून भाजपाशी सामना करू शकणार नाही. सहिष्णु म्हणून  आपल्या राज्याची असलेली ओळख  आहे. समता, समानता, सहिष्णु अशी निर्माण केलेली ओळख पुसण्याचे काम सुरु आहे. त्यामुळे असहिष्णुता वाढत आहे.’’

टॅग्स :Indian National Congressइंडियन नॅशनल काँग्रेसPuneपुणेSushilkumar Shindeसुशीलकुमार शिंदे