शहरं
Join us  
Trending Stories
1
"सारखं फुकटात, सारखं फुकटात; सारखं माफ, कसं व्हायचं"; कर्जमाफीवरून अजित पवारांनी शेतकऱ्यांना सुनावलं
2
संजय राऊतांची प्रकृती बिघाड, २ महिने उपचार घेणार; PM नरेंद्र मोदींनी घेतली दखल, म्हणाले...
3
टोयोटा २०३० पर्यंत भारतात १५ नवीन वाहने आणणार, दोन नवीन SUV अन् एक पिकअप ट्रकचा समावेश
4
"काहीतरी गडबड आहे!" आरोपी रोहित आर्यवर कसा आला संशय?; प्रत्यक्षदर्शीने सांगितली रेस्क्यू कहाणी
5
Dularchand Yadav: दुलारचंद यादव यांचा मृत्यू गोळी लागल्याने झाला नाही, डॉक्टरांचा मोठा खुलासा!
6
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
7
मोबाईलचे जीपीएस ठरू शकते तुमच्या डिजिटल अरेस्टचे कारण; आयआयटी दिल्लीत महत्त्वाचा रिसर्च
8
बॉर्डर पार करुन एकाचा भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न; BSF जवानांनी पाकिस्तानी नागरिकाला पकडले
9
ICC T20 Rankings : टीम इंडियाचं अव्वलस्थान धोक्यात! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर दुहेरी आव्हान
10
"मी त्याला काही वर्षांपूर्वीही भेटले होते...:, रोहित आर्याबद्दल रुचिता जाधवचा खुलासा, ९ मिनिटं...
11
ऑस्ट्रेलियानं ८० चेंडूत संपवला भारताविरुद्धचा सामना! 'पॉवर प्ले'मध्ये हेजलवूडचा जलवा, अभिषेक शर्मा एकटाच लढला!
12
राजस्थानात आजपासून धर्मांतरविरोधी कायदा लागू; बुलडोझर कारवाईसह अनेक कठोर तरतुदी
13
८९ वर्षीय अभिनेते धर्मेंद्र मुंबईतील रुग्णालयात दाखल, चाहते चिंतेत; हेल्थ अपडेट आली समोर
14
Yavatmal Accident: गाडी शिकताना नियंत्रण सुटलं अन्...; एकाच कुटुंबातील ४ जण ठार
15
बॉयफ्रेंडसोबत मिळून केली आईची हत्या, मग रचलं जीवन संपवल्याचं नाटक, मुलीचं भयानक कृत्य  
16
उल्हासनगरमध्ये भाजपला मोठे खिंडार! उद्धवसेनेच्या नेत्याच्या प्रवेशावरून अंतर्गत वाद चव्हाट्यावर
17
"दगा फटका झाला तर बच्चू कडू फाशीवर जाईल" आंदोलनाचा विजय झाल्याचा दावा करत बच्चू कडूंनी सरकारला दिला इशारा
18
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांवर पोलिसांची पाळत, थेट बेडरुमध्ये घुसून हेरगिरी? आरोपामुळे खळबळ
19
Suzuki ने लॉन्च केले Access चे CNG व्हेरिएंट; जाणून घ्या मायलेज अन् किंमत...
20
भररस्त्यात पाठलाग, कारची काच फोडली... महिला पत्रकारावर मध्यरात्री हल्ला! अखेर दोघांना अटक

काँग्रेसला संजीवनी देण्याची गरज, ज्येष्ठ समाजवादी विचारवंत भाई वैद्य यांचे मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2017 16:43 IST

पिंपरी-चिंचवड शहरात यशवंत वेणू सन्मान सोहळा मंगळवारी झाला. त्यात देशातील असहिष्णूतेचा विषय चर्चिला गेला. मोदी सरकारचे नाव न घेता, समाजवादी नेते आणि काँग्रेसच्या नेत्यांनी टीका केली. ‘देशातील सध्यातील स्थिती पाहता, काँग्रेसला संजीवनी देण्याची गरज आहे.

पिंपरी - पिंपरी-चिंचवड शहरात यशवंत वेणू सन्मान सोहळा मंगळवारी झाला. त्यात देशातील असहिष्णूतेचा विषय चर्चिला गेला. मोदी सरकारचे नाव न घेता, समाजवादी नेते आणि काँग्रेसच्या नेत्यांनी टीका केली. ‘देशातील सध्यातील स्थिती पाहता, काँग्रेसला संजीवनी देण्याची गरज आहे, यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचा आधार घेऊन नवीन मांडणी करायला हवी, असे मत ज्येष्ठ समाजवादी विचारवंत भाई वैद्य यांनी व्यक्त केले. तर ‘अहिसहिष्णूता वाढीस लागली आहे. जुण्या लोकांनी केलेले काम पुसण्याचे काम केले जात आहे, अशी टीका माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केली.

चिंचवड येथील आॅटो क्लस्टर सभागृहात महाराष्टÑाचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण स्मृती दिनानिमित्त यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानाच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांना यशवंत वेणू सन्मानाने गौरविण्यात आले.  व्यासपीठावर डॉ. डी. वाय पाटील अभिमत विद्यापीठाचे अध्यक्ष डॉ. पी. डी. पाटील, माजी आमदार उल्हास पवार आदी उपस्थित होते. यावेळी मोदी सरकारचे नाव न घेता भाई वैद्य आणि शिंदे यांनी असहिष्णूतेच्या विषयावर भाष्य केले. 

भाई वैद्य म्हणाले, ‘‘मी समाजवादी विचारांचा आणि काँग्रेसविषयी कसा काय बोलतो आहे, असा प्रश्न सर्वांना पडला असेल. पंरतु मी १९४६ मध्ये काँग्रेसचा काही काळ सदस्य होतो. त्यांनतर १९४८ नंतर समाजवादी विचारांचा पुरस्कर्ता झालो. आजची परिस्थिती पाहता वित्तीय भांडवलशाही उदयास येत आहे., काँग्रेसला संजीवनी देण्याची गरज आहे. त्यासाठी सुशीलकुमार यांनी प्रयत्न करण्याची गरज आहे. शेती आणि औद्योगिकरण विकासाचा मुद्दा यशवंतरांवानी मांडला होता. या विचारांचा पुरस्कार काँग्रेसने केला नाही. विचार या यशवंतरावांच्या विचाराची कास धरून औद्योगिकधोरण आणि शेतीला महत्त्व देऊन विकास साधता येणे शक्य आहे. काँग्रेसला संजीवनी देण्याची गरज आहे.’’

असहिष्णूतेच्या मुद्यांवर सुशीलकुमार शिंदे म्हणाले, ‘‘कांग्रेस जुन्या विचाराने चालून भाजपाशी सामना करू शकणार नाही. सहिष्णु म्हणून  आपल्या राज्याची असलेली ओळख  आहे. समता, समानता, सहिष्णु अशी निर्माण केलेली ओळख पुसण्याचे काम सुरु आहे. त्यामुळे असहिष्णुता वाढत आहे.’’

टॅग्स :Indian National Congressइंडियन नॅशनल काँग्रेसPuneपुणेSushilkumar Shindeसुशीलकुमार शिंदे