शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
6
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
7
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
8
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
9
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
10
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
11
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
14
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
15
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
16
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
17
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
18
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
19
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
20
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला

काँग्रेसला संजीवनी देण्याची गरज, ज्येष्ठ समाजवादी विचारवंत भाई वैद्य यांचे मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2017 16:43 IST

पिंपरी-चिंचवड शहरात यशवंत वेणू सन्मान सोहळा मंगळवारी झाला. त्यात देशातील असहिष्णूतेचा विषय चर्चिला गेला. मोदी सरकारचे नाव न घेता, समाजवादी नेते आणि काँग्रेसच्या नेत्यांनी टीका केली. ‘देशातील सध्यातील स्थिती पाहता, काँग्रेसला संजीवनी देण्याची गरज आहे.

पिंपरी - पिंपरी-चिंचवड शहरात यशवंत वेणू सन्मान सोहळा मंगळवारी झाला. त्यात देशातील असहिष्णूतेचा विषय चर्चिला गेला. मोदी सरकारचे नाव न घेता, समाजवादी नेते आणि काँग्रेसच्या नेत्यांनी टीका केली. ‘देशातील सध्यातील स्थिती पाहता, काँग्रेसला संजीवनी देण्याची गरज आहे, यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचा आधार घेऊन नवीन मांडणी करायला हवी, असे मत ज्येष्ठ समाजवादी विचारवंत भाई वैद्य यांनी व्यक्त केले. तर ‘अहिसहिष्णूता वाढीस लागली आहे. जुण्या लोकांनी केलेले काम पुसण्याचे काम केले जात आहे, अशी टीका माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केली.

चिंचवड येथील आॅटो क्लस्टर सभागृहात महाराष्टÑाचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण स्मृती दिनानिमित्त यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानाच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांना यशवंत वेणू सन्मानाने गौरविण्यात आले.  व्यासपीठावर डॉ. डी. वाय पाटील अभिमत विद्यापीठाचे अध्यक्ष डॉ. पी. डी. पाटील, माजी आमदार उल्हास पवार आदी उपस्थित होते. यावेळी मोदी सरकारचे नाव न घेता भाई वैद्य आणि शिंदे यांनी असहिष्णूतेच्या विषयावर भाष्य केले. 

भाई वैद्य म्हणाले, ‘‘मी समाजवादी विचारांचा आणि काँग्रेसविषयी कसा काय बोलतो आहे, असा प्रश्न सर्वांना पडला असेल. पंरतु मी १९४६ मध्ये काँग्रेसचा काही काळ सदस्य होतो. त्यांनतर १९४८ नंतर समाजवादी विचारांचा पुरस्कर्ता झालो. आजची परिस्थिती पाहता वित्तीय भांडवलशाही उदयास येत आहे., काँग्रेसला संजीवनी देण्याची गरज आहे. त्यासाठी सुशीलकुमार यांनी प्रयत्न करण्याची गरज आहे. शेती आणि औद्योगिकरण विकासाचा मुद्दा यशवंतरांवानी मांडला होता. या विचारांचा पुरस्कार काँग्रेसने केला नाही. विचार या यशवंतरावांच्या विचाराची कास धरून औद्योगिकधोरण आणि शेतीला महत्त्व देऊन विकास साधता येणे शक्य आहे. काँग्रेसला संजीवनी देण्याची गरज आहे.’’

असहिष्णूतेच्या मुद्यांवर सुशीलकुमार शिंदे म्हणाले, ‘‘कांग्रेस जुन्या विचाराने चालून भाजपाशी सामना करू शकणार नाही. सहिष्णु म्हणून  आपल्या राज्याची असलेली ओळख  आहे. समता, समानता, सहिष्णु अशी निर्माण केलेली ओळख पुसण्याचे काम सुरु आहे. त्यामुळे असहिष्णुता वाढत आहे.’’

टॅग्स :Indian National Congressइंडियन नॅशनल काँग्रेसPuneपुणेSushilkumar Shindeसुशीलकुमार शिंदे