शहरं
Join us  
Trending Stories
1
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
2
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
3
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
4
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
5
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
6
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
7
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
8
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
9
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
10
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
11
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
12
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
13
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
14
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
15
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
16
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक
17
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
18
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप
19
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
20
इंडिया आघाडीला मोठा धक्का, बड्या पक्षाने सोडली साथ, विरोधी पक्षांचं ऐक्य कमकुवत होणार?  

राष्ट्रवादीची पावले तिस:या आघाडीकडे

By admin | Updated: October 17, 2014 02:12 IST

सरकार स्थापण्यात निर्णायक भूमिका वठविण्याची संधी मिळाली नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे राष्ट्रीय पातळीवर तिस:या आघाडीची मोट बांधण्यासाठी पुढाकार घेतील,

यदु जोशी ल्ल मुंबई
विधानसभा निवडणूक निकालानंतर सरकार स्थापण्यात निर्णायक भूमिका वठविण्याची संधी मिळाली नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे राष्ट्रीय पातळीवर तिस:या आघाडीची मोट बांधण्यासाठी पुढाकार घेतील, अशी दाट शक्यता आहे.
विधानसभा निवडणुकीचा निकाल रविवारी जाहीर होणार असून भाजपा हा सर्वात मोठा पक्ष असेल आणि सत्ता स्थापन करण्यासाठी या पक्षाला काही जागा कमी पडतील, असा अंदाज वर्तविला जात आहे. अशा परिस्थितीत भाजपाबरोबर सत्तेत जाण्याचा निर्णय घेऊन दुय्यम भूमिका स्वीकारण्यापेक्षा आतार्पयत भाजपापासून दूर राहत जपलेली धर्मनिरपेक्ष प्रतिमा कायम ठेवावी, असे पक्षातील अनेक नेत्यांना वाटते. काहीही करून सत्तेत राहण्याचा हव्यास पक्षाची प्रतिमा आणखीच खराब करेल. आधीच विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात आणि त्या आधीपासूनच राष्ट्रवादीची प्रतिमा भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे मलिन झालेली असताना आता धर्मनिरपेक्षतेच्या तत्वाशी तडजोड करणो म्हणजे उरलीसुरली इज्जत घालविण्यासारखे होईल, असे पक्षातील जाणत्या नेत्यांचे म्हणणो आहे. काँग्रेस आणि भाजपा वगळता इतर पक्षांची एक तिसरी आघाडी स्थापन करण्याच्या हालचाली आधीच देशात सुरू झाल्या आहेत. लालूप्रसाद यादव, नितीशकुमार हे नेते बिहारमध्ये एकत्र आले. मुलायमसिंह यादव यांच्या समाजवादी पार्टीच्या संमेलनात अलिकडे संयुक्त जनता दलाचे शरद यादव यांना आमंत्रित करण्यात आले होते. अशावेळी काँग्रेसप्रणित युपीएमधून बाहेर पडून सक्षम तिसरी आघाडी स्थापन करण्यासाठी शरद पवार महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. समाजवादी पार्टी, राजद, संयुक्त जनता दल, बिजू जनता दल, दोन्ही कम्युनिस्ट पक्ष, धर्मनिरपेक्ष जनता दल  अशा अनेक लहानमोठय़ा पक्षांना एकत्र आणून भाजपा आणि काँग्रेसचा पर्याय म्हणून उभे करण्याचा प्रयत्न होऊ शकतो. 
स्वत: पवार आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी या बाबतचे सूतोवाच या आधीच आणि विशेषत: विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यानच केले आहे. तिस:या आघाडीचा एखादा प्रस्ताव आमच्यासमोर आला तर आम्ही त्यावर गांभीर्याने विचार करू, असे पवार यांनी म्हटले आहे. तर, राष्ट्रवादी युपीएमधून बाहेर पडू शकते असे स्पष्ट संकेत पटेल यांनी दिले होते. 
 
भाजपा, काँग्रेस, शिवसेनेपेक्षाही राष्ट्रवादीला कमी जागा मिळतील, असे एक्झीट पोलमध्ये सांगितले आहे. राष्ट्रवादीचे सहा लोकसभा सदस्य आहेत. पक्षाचे मुख्य अस्तित्व महाराष्ट्रात आहे. 
 
काँग्रेसबरोबरची आघाडी तुटली असल्याने आता राष्ट्रीय पातळीवर राष्ट्रवादीला काँग्रेससोबत राहण्यात फारसा रस नसेल्यामुळे राष्ट्रवादीची पावले तिस:या आघाडीकडे वळतील, असे मानले जात आहे.