शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
2
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
3
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
4
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
5
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
6
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
7
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
8
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
9
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
10
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
11
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
12
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
13
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
14
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
15
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
16
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
17
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
18
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
19
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
20
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल

राष्ट्रवादीची पावले तिस:या आघाडीकडे

By admin | Updated: October 17, 2014 02:12 IST

सरकार स्थापण्यात निर्णायक भूमिका वठविण्याची संधी मिळाली नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे राष्ट्रीय पातळीवर तिस:या आघाडीची मोट बांधण्यासाठी पुढाकार घेतील,

यदु जोशी ल्ल मुंबई
विधानसभा निवडणूक निकालानंतर सरकार स्थापण्यात निर्णायक भूमिका वठविण्याची संधी मिळाली नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे राष्ट्रीय पातळीवर तिस:या आघाडीची मोट बांधण्यासाठी पुढाकार घेतील, अशी दाट शक्यता आहे.
विधानसभा निवडणुकीचा निकाल रविवारी जाहीर होणार असून भाजपा हा सर्वात मोठा पक्ष असेल आणि सत्ता स्थापन करण्यासाठी या पक्षाला काही जागा कमी पडतील, असा अंदाज वर्तविला जात आहे. अशा परिस्थितीत भाजपाबरोबर सत्तेत जाण्याचा निर्णय घेऊन दुय्यम भूमिका स्वीकारण्यापेक्षा आतार्पयत भाजपापासून दूर राहत जपलेली धर्मनिरपेक्ष प्रतिमा कायम ठेवावी, असे पक्षातील अनेक नेत्यांना वाटते. काहीही करून सत्तेत राहण्याचा हव्यास पक्षाची प्रतिमा आणखीच खराब करेल. आधीच विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात आणि त्या आधीपासूनच राष्ट्रवादीची प्रतिमा भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे मलिन झालेली असताना आता धर्मनिरपेक्षतेच्या तत्वाशी तडजोड करणो म्हणजे उरलीसुरली इज्जत घालविण्यासारखे होईल, असे पक्षातील जाणत्या नेत्यांचे म्हणणो आहे. काँग्रेस आणि भाजपा वगळता इतर पक्षांची एक तिसरी आघाडी स्थापन करण्याच्या हालचाली आधीच देशात सुरू झाल्या आहेत. लालूप्रसाद यादव, नितीशकुमार हे नेते बिहारमध्ये एकत्र आले. मुलायमसिंह यादव यांच्या समाजवादी पार्टीच्या संमेलनात अलिकडे संयुक्त जनता दलाचे शरद यादव यांना आमंत्रित करण्यात आले होते. अशावेळी काँग्रेसप्रणित युपीएमधून बाहेर पडून सक्षम तिसरी आघाडी स्थापन करण्यासाठी शरद पवार महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. समाजवादी पार्टी, राजद, संयुक्त जनता दल, बिजू जनता दल, दोन्ही कम्युनिस्ट पक्ष, धर्मनिरपेक्ष जनता दल  अशा अनेक लहानमोठय़ा पक्षांना एकत्र आणून भाजपा आणि काँग्रेसचा पर्याय म्हणून उभे करण्याचा प्रयत्न होऊ शकतो. 
स्वत: पवार आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी या बाबतचे सूतोवाच या आधीच आणि विशेषत: विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यानच केले आहे. तिस:या आघाडीचा एखादा प्रस्ताव आमच्यासमोर आला तर आम्ही त्यावर गांभीर्याने विचार करू, असे पवार यांनी म्हटले आहे. तर, राष्ट्रवादी युपीएमधून बाहेर पडू शकते असे स्पष्ट संकेत पटेल यांनी दिले होते. 
 
भाजपा, काँग्रेस, शिवसेनेपेक्षाही राष्ट्रवादीला कमी जागा मिळतील, असे एक्झीट पोलमध्ये सांगितले आहे. राष्ट्रवादीचे सहा लोकसभा सदस्य आहेत. पक्षाचे मुख्य अस्तित्व महाराष्ट्रात आहे. 
 
काँग्रेसबरोबरची आघाडी तुटली असल्याने आता राष्ट्रीय पातळीवर राष्ट्रवादीला काँग्रेससोबत राहण्यात फारसा रस नसेल्यामुळे राष्ट्रवादीची पावले तिस:या आघाडीकडे वळतील, असे मानले जात आहे.