शहरं
Join us  
Trending Stories
1
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
2
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
3
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
4
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
5
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
6
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
7
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
8
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
9
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
10
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
11
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
12
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
13
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
14
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
15
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
16
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
17
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
18
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
19
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
20
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?

राष्ट्रवादीची पावले तिस:या आघाडीकडे

By admin | Updated: October 17, 2014 02:12 IST

सरकार स्थापण्यात निर्णायक भूमिका वठविण्याची संधी मिळाली नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे राष्ट्रीय पातळीवर तिस:या आघाडीची मोट बांधण्यासाठी पुढाकार घेतील,

यदु जोशी ल्ल मुंबई
विधानसभा निवडणूक निकालानंतर सरकार स्थापण्यात निर्णायक भूमिका वठविण्याची संधी मिळाली नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे राष्ट्रीय पातळीवर तिस:या आघाडीची मोट बांधण्यासाठी पुढाकार घेतील, अशी दाट शक्यता आहे.
विधानसभा निवडणुकीचा निकाल रविवारी जाहीर होणार असून भाजपा हा सर्वात मोठा पक्ष असेल आणि सत्ता स्थापन करण्यासाठी या पक्षाला काही जागा कमी पडतील, असा अंदाज वर्तविला जात आहे. अशा परिस्थितीत भाजपाबरोबर सत्तेत जाण्याचा निर्णय घेऊन दुय्यम भूमिका स्वीकारण्यापेक्षा आतार्पयत भाजपापासून दूर राहत जपलेली धर्मनिरपेक्ष प्रतिमा कायम ठेवावी, असे पक्षातील अनेक नेत्यांना वाटते. काहीही करून सत्तेत राहण्याचा हव्यास पक्षाची प्रतिमा आणखीच खराब करेल. आधीच विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात आणि त्या आधीपासूनच राष्ट्रवादीची प्रतिमा भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे मलिन झालेली असताना आता धर्मनिरपेक्षतेच्या तत्वाशी तडजोड करणो म्हणजे उरलीसुरली इज्जत घालविण्यासारखे होईल, असे पक्षातील जाणत्या नेत्यांचे म्हणणो आहे. काँग्रेस आणि भाजपा वगळता इतर पक्षांची एक तिसरी आघाडी स्थापन करण्याच्या हालचाली आधीच देशात सुरू झाल्या आहेत. लालूप्रसाद यादव, नितीशकुमार हे नेते बिहारमध्ये एकत्र आले. मुलायमसिंह यादव यांच्या समाजवादी पार्टीच्या संमेलनात अलिकडे संयुक्त जनता दलाचे शरद यादव यांना आमंत्रित करण्यात आले होते. अशावेळी काँग्रेसप्रणित युपीएमधून बाहेर पडून सक्षम तिसरी आघाडी स्थापन करण्यासाठी शरद पवार महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. समाजवादी पार्टी, राजद, संयुक्त जनता दल, बिजू जनता दल, दोन्ही कम्युनिस्ट पक्ष, धर्मनिरपेक्ष जनता दल  अशा अनेक लहानमोठय़ा पक्षांना एकत्र आणून भाजपा आणि काँग्रेसचा पर्याय म्हणून उभे करण्याचा प्रयत्न होऊ शकतो. 
स्वत: पवार आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी या बाबतचे सूतोवाच या आधीच आणि विशेषत: विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यानच केले आहे. तिस:या आघाडीचा एखादा प्रस्ताव आमच्यासमोर आला तर आम्ही त्यावर गांभीर्याने विचार करू, असे पवार यांनी म्हटले आहे. तर, राष्ट्रवादी युपीएमधून बाहेर पडू शकते असे स्पष्ट संकेत पटेल यांनी दिले होते. 
 
भाजपा, काँग्रेस, शिवसेनेपेक्षाही राष्ट्रवादीला कमी जागा मिळतील, असे एक्झीट पोलमध्ये सांगितले आहे. राष्ट्रवादीचे सहा लोकसभा सदस्य आहेत. पक्षाचे मुख्य अस्तित्व महाराष्ट्रात आहे. 
 
काँग्रेसबरोबरची आघाडी तुटली असल्याने आता राष्ट्रीय पातळीवर राष्ट्रवादीला काँग्रेससोबत राहण्यात फारसा रस नसेल्यामुळे राष्ट्रवादीची पावले तिस:या आघाडीकडे वळतील, असे मानले जात आहे.