शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादी विधानसभेच्या तयारीत तर काँग्रेसमध्ये नेतृत्व बदलाच्या हालचाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2019 06:26 IST

लोकसभा निवडणुकांचे मतदान पार पडताच निकाल जाहीर होण्याची वाट न पाहता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत.

अतुल कुलकर्णी मुंबई : लोकसभा निवडणुकांचे मतदान पार पडताच निकाल जाहीर होण्याची वाट न पाहता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. काँग्रेसमध्ये मात्र विधानसभेसाठी कोणी पुढाकार घ्यायचा यावरच निर्णय होत नसल्याचे समजते.कोणते मतदारसंघ पक्षाला पूरक आहेत, मित्रपक्षांना कुठे सामावून घ्यावे लागेल, कोणत्या जागांची अदलाबदल गरजेची आहे याची स्थानिक नेत्यांशी चर्चा करून त्यांची मते जाणून घ्या, अशा सूचना पक्षाचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी दिल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी दिली. काँग्रेसशीही आमच्या चर्चा लवकरच सुरू होतील, असे ते म्हणाले.

दुसरीकडे काँग्रेसमध्ये मात्र लोकसभेच्या निकालानंतर प्रदेशाध्यक्ष बदलेल का, विरोधी पक्षनेतेपद कोणाला मिळेल, याचीच चर्चा आहे. विरोधी पक्षनेतेपदासाठी पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात यांच्या नावाची चर्चा आहे. हर्षवर्धन पाटील यांचेही नाव चर्चेत आहे.संगमनेर येथे पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी ज्याप्रमाणे थोरात यांच्या खांद्यावर हात टाकून फोटो काढत स्वत: ट्विट केले त्यावरून त्यांनी पक्षात योग्य तो संदेश दिला आहे. पक्षश्रेष्ठी एखाद्या जिल्ह्यात मुक्काम करतात तेव्हा त्यांच्यासह प्रदेशाध्यक्ष किंवा पक्षाचे प्रभारी यांच्यापैकी एक असतो. मात्र संगमनेरात दोघेही नव्हते.

विधानसभेसाठी कोणी पुढाकार घ्यायचा यावर श्रेष्ठींनी संकेत दिलेले नाहीत. निकालानंतर पक्ष पातळीवर बदल होतील, त्यानंतरच पुढील सूत्रे हलतील, असे एका ज्येष्ठ नेत्याने स्पष्ट केले. दुष्काळाचा विषय असो की अन्य कोणता, आम्हाला अमूक ठिकाणी जा, पाहणी करा, अशा सूचना अद्याप कोणी दिलेल्या नाहीत, असेही ते म्हणाले. निर्णय उशिरा घेण्याने झालेले नुकसान माहिती असूनही निर्णय होत नाहीत, अशी खंतही व्यक्त केली. राधाकृष्ण विखे यांनी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला असला तरी अद्याप विधानसभा अध्यक्षांकडे तो पोहोचलाच नाही, मग तो राजीनामा कसा, अशी टिप्पणीही त्या नेत्याने केली.

विखेंची अवस्था इकडे आड तिकडे विहीरविरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्यानंतर राधाकृष्ण विखे यांची अवस्था इकडे आड तिकडे विहीर झाली आहे. त्यांना भाजपमध्ये प्रवेश देण्याविषयी पक्षातले आमदार, मंत्री नाखूश आहेत. हे जर पक्षात आले तर जिल्ह्यातील आमचे अस्तित्वच धोक्यात येईल, अशा तक्रारी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केल्या आहेत. काँग्रेसनेदेखील त्यांचे परतीचे मार्ग बंद करून टाकले आहेत. 

टॅग्स :ElectionनिवडणूकAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019NCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेस